शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

अमरावती: पांढरी खानमपूर येथे स्वागत कमानला नाव देण्यावरुन दोन समाजात वाद

By उज्वल भालेकर | Updated: March 6, 2024 13:09 IST

अंजनगाव सुर्जी तालुक्यातील पांढरी खानमपूर येथील स्वागत प्रवेशद्वार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याची मागणी गावातील बौद्ध बांधवांनी केली होती.

अमरावती: अंजनगाव सुर्जी तालुक्यातील पांढरी खानमपूर येथील स्वागत प्रवेशद्वार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याची मागणी गावातील बौद्ध बांधवांनी केली होती. तसा ठराव देखील ग्रामपंचायतीने घेतला होता. परंतु याला काही इतर समाजबांधवांनी विरोध दर्शविल्याने गावामध्ये दोन समाजामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच बुधवारी गावातील दीडशे ते दोनशे बौद्ध बांधवांनी गाव सोडले असून ते जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार असल्याची प्राथमिक माहिती आहे. गावातील तणावाचे वातावरण लक्षात घेता, मंगळवारी रात्रीपासूनच गावामध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

पांढरी खानमपूर ग्रामपंचायतीने २६ जानेवारी २०२० रोजी गावामध्ये प्रवेशद्वार उभारुन त्याला विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार असे नाव देण्याचा ठराव ग्रामसभेत घेतला होता. परंतु याच कालावधीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने प्रवेशद्वाराचे काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे २६ जानेवारी २०२४ रोजी पुन्हा एकदा ठराव घेऊन डॉ. प्रवेशद्वाराच्या अंमलबजावणीवर कोणीही आक्षेप घेणार नाही असाही ठराव पारीत करण्यात आला होता. तसेच खानमपूर गावामध्ये जाणाऱ्या रस्त्यावर बांधकाम करणे करिता कार्यकारी अभियंता राष्ट्रीय राज्य महामार्ग विभाग अकोला यांच्याकडूनही २२ फेब्रुवारी २०२४ ला प्रवेशद्वाराच्या बांधकामासाठी ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त देण्यात आले होते. या सर्व प्रशासकीय बाबींची पूर्तता केल्यानंतर मात्र गावातील काही समाजबांधवांकडून या प्रवेशद्वाराला विरोध करण्यात आला.

तसेच गावातील बौद्ध बांधवावर बहिष्कार टाकल्याची तक्रारही देण्यात आली. या सर्व प्रकारामुळे गावातील दिडशे ते दोनशे बौद्ध बांधवांनी बुधवारी गाव सोडून मंत्रालयावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्व प्रकारामुळे सामाजिक सलोखा कायम रहावा तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी गावामध्ये ८ मार्च पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली असून मोठ्या संख्येने पोलिसांचा गावामध्ये बंदोबस्त दिसून येत आहे. गाव सोडलेले शेकडो बांधव हे अंजनगाव सुर्जी, दर्यापूर मार्गे अमरावतीमध्ये येऊन जिल्हाधिकारी तसेच विभागीय आयुक्तांना निवेदन देणार आहेत, त्यानंतर येथून सर्व मुंबई मत्रालयाच्य दिशेने पुढील प्रवास सुरु करणार असल्याची प्राथमिक माहिती आहे.