शहरं
Join us  
Trending Stories
1
हमास, हिजबुल्लाहनंतर आता हुती बंडखोरांवर इस्राइलची एअरस्ट्राईक, येमेनमधील अनेक अड्डे केले नष्ट   
2
"कोणत्याही परिस्थितीत हे सरकार उलथून टाकायचंच’’, विदर्भातून उद्धव ठाकरेंचा निर्धार
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला मल्लिकार्जुन खर्गेंना फोन, प्रकृतीची केली विचारपूस
4
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
5
Akola: किरकाेळ वादातून आमदार नितीन देशमुख यांच्या पुत्राला मारहाण, पाेलिसांत तक्रार दाखल
6
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
7
पंढरीनाथ उर्फ पॅडी कांबळे बिग बॉसमधून बाहेर! ९ आठवड्यांचा प्रवास संपला, सर्वांचे चेहरे पडले
8
Ratnagiri: गणपतीपुळे समुद्रात तिघे बुडाले; दाेघांचा मृत्यू, एकाला वाचविण्यात यश ​​​​​​​
9
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
10
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
11
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
13
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
14
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
15
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
16
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
17
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
18
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
19
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
20
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या

महागाई विरोधात जिल्हा काँग्रेसची सायकली रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 4:10 AM

अमरावती : गत काही महिन्यापासून पेट्रोल, डिझेल, गॅस सिंलिंडरचे दर गगनाला भिडले आहे. यामुळे सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. ...

अमरावती : गत काही महिन्यापासून पेट्रोल, डिझेल, गॅस सिंलिंडरचे दर गगनाला भिडले आहे. यामुळे सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. केंद्रातील मोदी सरकारचे जनहित विरोधी धोरण याला कारणीभूत आहे. शुक्रवारी जिल्हा ग्रामीण काँग्रेसच्यावतीने पालकमंत्री यशोमती ठाकूर, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बबलू देशमुख, माजी आमदार वीरेंद्र जगताप, आमदार बळवंत वानखडे आदीच्या नेतूत्वात जिल्हा परिषदेपासून ते विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत सायकल मोर्चा रॅली काढण्यात आली. यावेळी मोदी सरकारविरोधात घोषणाबाजीने परिसर दाणाणून सोडला.

महागाई विरोधात जे आंदोलन करत होते. तेच सरकार आज केंद्रात ७ वर्षांपासून सत्तेवर आहे. तेव्हा पेट्रोल, डिझेल, केरोसीन आणि गॅस सिंलिडरचे दर होते. तेच दर आजघडीला गगनाला भिडले आहे. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनतेला जगण्याचा अधिकार द्यायचा आहे, केंद्रात सत्तासुख भोगत असलेल्या भाजप सरकारला आता सत्तेतून हटविण्याची वेळ आल्याचे प्रतिपादन पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी केले. त्या जिल्हा ग्रामीण काँग्रेसतर्फे आयोजित सायकल रॅलीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होत्या. यावेळी जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी मोदी सरकारवर रोष व्यक्त करीत कधी नव्हे एवढी इंधन दरवाढ आणि सिंलिडरचे दर सर्वसामान्याना दाखविण्याचे काम केंद्र सरकार करीत आहे. अच्छे दिनाचे स्वप्न दाखवून बुरे दिन जनतेला पाहावे लागत आहेत. त्यामुळे मोदी सरकारला धडा शिकविण्याची वेळ आल्याचे ते म्हणाले. यावेळी विभागीय आयुक्त यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. रॅलीत सुधाकर भारसाकळे, बाळासाहेब हिंगणीकर, जयंत देशमुख, हरिभाऊ माेहोड, संजय मार्डीकर, प्रकाश काळबांडे, दयाराम काळे, महेंद्रसिंग गैलवार, सुरेश निमकर, गणेश आरेकर, मोहन सिंगवी, नितीन दगडकर, नितीन गोंडाणे, प्रमोद दाळू, बबलू काळमेघ, सुधाकर खारोडे, प्रशांत वानखडे, सुरेश आडे, अनंत साबळे, प्रदीप देशमुख, गिरीश कराळे, राहुल येवले, सागर देशमुख, पंकज मोरे आदी सहभागी झाले होते.

बॉक्स

झेडपी सभापतीस पोलिसात तू-तू, मै-मै

विभागीय आयुक्त कार्यालयात सायकल रॅली पोहोचताच आयुक्ताकडे निवेदन देण्यास गेलेल्या निवडक शिष्टमंडळाला पोलिसांनी गेटमधून सोडले. परंतु काही पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी रोखल्यावरून वातावरण तापले. अशातच झेडपी सभापती बाळासाहेब हिंगणीकर व गाडगेनगरचे पाेलीस अधिकारी चोरमले यांच्या शाब्दिक बाचाबाची झाली. याप्रकरणी ना. यशोमती ठाकूर, जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी मध्यस्थी केली.