शहरं
Join us  
Trending Stories
1
"वर्षभर वेळ मागितला, तरी दिला नाही; मातोश्रीवर गेलो तिथे ६ तास थांबवलं अन् २ मिनिटे भेटले"
2
भारत-चीन सैन्य मागे घेण्यास सुरुवात; येत्या तीन दिवसांत टेंट, शेड अन् इमारती हटवल्या जाणार
3
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील शूटरला देश सोडण्यासाठी पासपोर्ट देण्याचं दिलेलं आश्वासन
4
आदित्य ठाकरेंकडे ५३५ हिरे लगडलेले कडे, दीड किलो सोने...; प्रतिज्ञापत्रात उद्धव ठाकरेंचेही उत्पन्न केले जाहीर
5
विधानसभा निवडणुकीत महायुतीचा स्ट्राइकरेट कसा असेल? मुख्यमंत्री शिंदे यांनी एका वाक्यात सांगितलं 
6
Maharashtra Assembly Election 2024: दिनकर पाटलांमुळे भाजपला फटका? नाशिकमध्ये समीकरण बदललं!
7
"राहुल गांधींच्या विधानाची मोडतोड करून फेक नरेटिव्ह पसरवण्याचा भाजपाचा प्रयत्न’’, नाना पटोले यांचा आरोप
8
कुणीही कितीही काहीही केले तरी लाडकी बहिण योजना बंद होणार नाही, CM शिंदेंचा जनतेला विश्वास
9
सर्वाधिक मताधिक्याने जिंकलेल्या अपक्ष आमदाराला महायुती, मविआत प्रवेश बंदी, काय घडलं?
10
IND vs NZ : कॅप्टन Tom Latham ची बॅट तळपली; न्यूझीलंडनं घेतलीये ३०१ धावांची आघाडी
11
दिल्लीत जाताच मविआचा फॉर्म्युला बदलला; ठाकरे सेनेच्या जागा ९० झाल्या, थोरात म्हणाले...
12
काय सांगता? महिन्याला १ लाख रुपये कमवतात भिकारी; स्मार्टफोनसह पॅनकार्डचाही करतात वापर
13
Maharashtra Assembly 2024: मेघना बोर्डीकर विरुद्ध विजय भांबळे; जिंतूरमध्ये राजकीय गणित कसं?
14
पुण्यात पोलिसांच्या नाकाबंदीत १३८ कोटींचं सोनं पकडलं; सोनं आलं कुठून? तपास सुरु...
15
Sonu Sood : "आपला देश सुरक्षित"; बॉलिवूडवरील गँगस्टरच्या दहशतीवर सोनू सूद रोखठोक बोलला!
16
कोकणात मविआमध्ये बंडखोरी, सावंतवाडीत अर्चना घारे-परब यांनी भरला उमेदवारी अर्ज
17
नाशिक शहरात एकही जागा काँग्रेसला नाही; इच्छुक ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात अपक्ष लढणार
18
रोहितच्या नावे लाजिरवाणा विक्रम; धोनी-विराटच्या कॅप्टन्सीत असं कधीच नाही घडलं
19
दलित वसाहतीला आग लावणाऱ्या 101 जणांना न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा...
20
एकेकाळी वेटर म्हणून काम केलं; आता अदानी-अंबानींच्या कंपन्यांनाही टाकलंय मागे

जि. प. इमारतीचा खर्च ६९ कोटीवर; कॉस्ट वाढली आणि मान्यताही अडली

By जितेंद्र दखने | Published: April 27, 2023 6:39 PM

मात्र, हा प्रस्तावही मान्यतेसाठी मंत्रालयात अडकला आहे.

जितेंद्र दखने, अमरावती : जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीसाठी तत्कालीन सत्ताधारी पक्षाने महाविकास आघाडी सरकारकडे पाठपुरावा करून सुमारे ५८ कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला. त्याला मंजुरी मिळाली होती. मात्र, त्यानंतर या कामासाठी निधी टोकनही न मिळाल्याने झेडपीच्या नवीन बिल्डिंगचे स्वप्न अपुरे राहिले आहे. अशातच ३ फेब्रुवारी २०२३ रोजी नवीन इमारतीचा सुधारित ६९ कोटी ८५ लाखाचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे. मात्र, हा प्रस्तावही मान्यतेसाठी मंत्रालयात अडकला आहे.

सध्या जिल्हा परिषदेचे मुख्यालय असलेली ब्रिटिशकालीन इमारत ही सन १९१५ मधील आहे. ही इमारत प्रशासकीय कामकाजाच्या दृष्टीने अपुरी पडत आहे. या ठिकाणी १४ विविध विभागांची मुख्यालये या इमारतीमध्ये असल्याने नवीन जागेचा शोध घेण्यात येत होता. अशातच गर्ल्स हायस्कूल परिसरात जिल्हा परिषदेच्या जागेवर चार मजली नवीन प्रशासकीय इमारती बांधकाम करण्याचे नियोजन करण्यात आले, त्यासाठीचा आराखडाही तयार केला. त्यानुसार सदर आराखडा २२ जुलै २०२१ रोजी शासनाकडे सादर करण्यात आला.

तत्कालीन पालकमंत्री यांच्या माध्यमातून त्यावेळी पदाधिकारी यांनी सतत पाठपुरावा करीत तत्कालीन महाविकास आघाडी सरकारकडून ५८ कोटींच्या जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीला मान्यतासुद्धा दिली होती. त्यानुसार नवीन प्रशासकीय इमारतीचे काम लवकरच सुरू होईल, अशी अपेक्षा असताना काम सुरू करण्यासाठी शासनाकडून निधीचे टोकनसुध्दा उपलब्ध करून दिले नाही. परिणामी काम सुरू होऊ शकले नाही. अशातच राज्यात सत्ताबदल झाला. महाविकास आघाडी सरकार पायउतार होऊन नवीन शिंदे - फडणवीस यांच्या नेतृत्त्वातील सरकार आले. त्यामुळे पुन्हा नवीन प्रशासकीय इमारतीसाठी सुधारित प्रस्ताव सादर केला आहे. पूर्वी ५८ कोटीचा असलेला हा प्रस्ताव आता जीएसटी व सीएसआरमुळे तब्बल ६९ कोटी ८५ लाखांवर पोहोचला आहे.

प्रस्ताव मंत्रालयात पडून

जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचा सुधारित प्रस्ताव प्रशासनाने गत फेब्रुवारी महिन्यात शासनाकडे सादर केला आहे. या प्रस्तावाबाबत जिल्ह्याचे विद्यमान पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे काही महिन्यांपूर्वीच संक्षिप्त टिप्पणी दिलेली असल्याचे सुत्रांनी सांगितले. मात्र, तेव्हापासून नवीन इमारतीला मान्यताच मिळाली नसल्याने सध्यातरी हा विषय रखडून पडला आहे.

लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

ग्रामविकासाचा केंद्रबिंदू असलेल्या जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचा प्रस्ताव शासन दरबारी पुन्हा नव्याने सादर करण्यात आला आहे. मात्र, हा प्रस्ताव शासन दरबारी पडून आहे, असे असताना जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने ग्रामीण जनतेचे प्रतिनिधीत्व करीत असलेल्या लोकप्रतिनिधीचेही याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Amravatiअमरावती