शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

क्यूरिंगअभावी महामार्गाची कामे धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 22:26 IST

पावसाळा तोंडावर आला असून तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गाचे काम जोरात सुरू आहे. त्यात पिवळ्या मातीचे खनन करता येणार नाही, तसेच रस्त्यावर टाकलेल्या मातीवर पाऊस पडल्यास अपघातात वाढ होईल. त्यामुळे कंत्राटदारातर्फे काँक्रिट रस्त्यावर (क्यूरिंग)पाणी न टाकताच रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. तयार झालेला काँक्रिट रास्ता निकृष्ट दर्जाचा बनत आहे.

ठळक मुद्देकंत्राटदाराची मनमानी : पाणी टँकर वाढविण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कचांदुर बाजार : पावसाळा तोंडावर आला असून तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गाचे काम जोरात सुरू आहे. त्यात पिवळ्या मातीचे खनन करता येणार नाही, तसेच रस्त्यावर टाकलेल्या मातीवर पाऊस पडल्यास अपघातात वाढ होईल. त्यामुळे कंत्राटदारातर्फे काँक्रिट रस्त्यावर (क्यूरिंग)पाणी न टाकताच रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. तयार झालेला काँक्रिट रास्ता निकृष्ट दर्जाचा बनत आहे.परतवाडा ते मोर्शी मार्गावर सुरू असलेल्या चांदूर बाजार भागातील राष्ट्रीय महामार्गाच्या कंत्राट एच. जी. इन्फ्रा कंपनीने घेतला आहे. कंत्रातदारातर्फे प्रचंड खनन करून परिसरातील पिवळी माती रास्ता बांधकामत वापरण्यात येत आहे. मात्र, या मातीच्या नागरिकांच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत असताना कंत्रातदारातर्फे घाईने काँक्रीटचा मलमा चढविण्यात येत आहे. या रस्त्यावर पाणीचे क्यूरिंग केले जात नासल्याने हे काँक्रिट कच्चे राहिले आहे. या निकृष्ट काँक्रिट रस्त्यावरून कोणीही वाहतूक करू नये, याकरिता रस्त्यावर काटेरी झाडे टाकण्यात आले आहे. या महामार्गाचे काँक्रिटचा पहिलाच थर निकृष्ट झाला आहे. याकडे राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाने वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे. चांदूर बाजार ते परतवाडा मार्गावरील बांधकामात फक्त ३ पाण्याचे टँकर सुरू असून, केवळ रस्त्यावरील पिवळी माती उडू नये या करिता वापरले जात आहे. या करिता शेतकऱ्याचा शेतातील पाणी बोअरवेलने घेऊन टँकरच्या मदतीने मातीवर पाणी टाकले जात आहे. त्यामुळे केवळ मातीवर पाणी मारल्याने हा काँक्रिट रस्ता दर्जेदार कसा बनणार, असा प्रश्न रस्त्यावरून वाहतूक करणारे नागरिकांतर्फे केला जात आहे.काँक्रिट रस्त्याची पोत टिकविण्यासाठी त्या काँक्रिट रस्त्यावर पाणी टाकणे आवश्यक आहे. मात्र, कंत्राटदाराचा मनमानी कारभार व राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाच्या हेतुपुरस्सर दुर्लक्षामुळे शासनाच्या पैशाची उधळपट्टी होत असल्याचा आरोप परिसरातील नागरिकांतर्फे होत आहे. राजकीय वरदहस्त असलेल्या एच.जी. इन्फ्रा या कंत्राटदार कंपनीचे शासकीय अधिकाºयांशी साटेलोटे असल्याने कंत्राटदार व त्यांचे कर्मचारी आपला कारभार चालवीत असल्याचा आरोप परिसरातील नागरिकांतर्फे करण्यात येत आहे.