शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

३० हजार हेक्टरवर दुबार पेरणीचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2017 12:03 AM

रोहिणी व मृग नक्षत्रात मान्सूनपूर्व पाऊस झाला. हवामान खात्यानेही मान्सून वेळेवर व समाधानकारक असल्याचा ....

पाऊस बेपत्ता : शेतकऱ्यांसमोर नवे संकटलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : रोहिणी व मृग नक्षत्रात मान्सूनपूर्व पाऊस झाला. हवामान खात्यानेही मान्सून वेळेवर व समाधानकारक असल्याचा दुजोरा दिल्याने जिल्ह्यातील ३८ हजार ७४४ शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी केली. मात्र, मृग नक्षत्र कोरडे गेल्याने शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत. संरक्षित सिंचनाची सुविधा असणारे क्षेत्र वगळता किमान ३० हजार हेक्टर क्षेत्रातील पेरण्यांवर मोड येण्याची शक्यता आहे.यंदाच्या खरिपासाठी जिल्ह्यात सात लाख २८ हजार हेक्टर क्षेत्राचे नियोजन आहे. मृग नक्षत्रापूर्वी शेतकऱ्यांनी खरिपपूर्व मशागत केली. पावसाच्या अपेक्षेने पेरणी केली. राज्यात मान्सूनचे आगमन देखील झाले. विदर्भाच्या उंबरठ्यावर तो पोहोचला. अगदी बुलडाण्यापर्यंत आल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पेरणी केली. नंतर मात्र त्याचा प्रवास थबकला.२३ दिवसांत फक्त ६९ मिमी पाऊसअमरावती : जमिनीत पुरेसा ओलावा नसल्याने बिजांकुरण झालेच नाही. त्यामुळे बियाणे कुजू लागले. जेथे बिजांकुरण झाल, त्याठिकाणी उगवलेली इवलीशी रोपे करपू लागली. त्यामुळे आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे ठाकले आहे. यंदाच्या हंगामासाठी जिल्ह्यात सात लाख २८ हजार १०२ हेक्टरक्षेत्राचे नियोजन आहे. यापैकी ३८ हजार ७४४ हेक्टरक्षेत्रात गुरूवारपर्यंत पेरणी झाली. यामध्ये सर्वाधिक १८ हजार ७१३ हेक्टर क्षेत्र कपाशीचे आहे. धान दोन हजार ८७९ हेक्टर, ज्वारी दोन हजार ९६ हेक्टर, मका दोन हजार ४६५ हेक्टर, असे एकूण सात हजार ४५० हेक्टर तृणधान्य, तसेच तूर पाच हजार एक हेक्टर, १५ हेक्टर मूग, उडिद दोन हेक्टर, असे एकूण पाच हजार १८ हेक्टर कडधान्य व सात हजार ४९४ हेक्टर सोयाबीन, भुईमूग २२ हेक्टर, असे एकूण सात हजार ५१६ हेक्टर गळित धान्य व कापूस १८ हजार ७१३ हेक्टर तसेच ऊस व अन्य पिकांची पेरणी झाली आहे. यापैकी किमान ३० हजार हेक्टरक्षेत्रात पावसाअभावी दुबार पेरणीची शक्यता आहे.जिल्ह्यात १ ते २३ जून दरम्यान १११.९ मिमी सरासरी पाऊस पावसाची सरासरी अपेक्षित असताना प्रत्यक्ष ६९.२ मिमी पाऊस पडला आहे. ही ६१.८ टक्केवारी आहे. आतापर्यंत अमरावती तालुक्यात ७१.२, भातकुली ७१.२, नांदगाव ८६.६,चांदूररेल्वे ६९.५, धामणगाव रेल्वे ७८.८, तिवसा ६९, मोर्शी ७२.६, वरुड ४५.६,अचलपूर ५९.७, चांदूरबाजार ५४.९, दर्यापूर ७६.६, अंजनगाव सुर्जी ५९.८, धारणी ७१.२, व चिखलदरा तालुक्यात १०२ मिमी पाऊस पडला आहे.अशी आहे तालुकानिहाय पेरणीजिल्ह्यात सद्यस्थितीत ३८,७४४ हेक्टरक्षेत्रात पेरणी झाली आहे. यामध्ये सर्वाधिक ४१ टक्के म्हणजे १८,९२९ हेक्टरमध्ये धारणी तालुक्यात पेरणी झाली आहे. अमरावती ४१४ हेक्टर, भातकुली २४५ हेक्टर, नांदगाव खंडेश्वर ३०८ हेक्टर, चांदूररेल्वे १३० हेक्टर, तिवसा २८४ हेक्टर, मोर्शी २,९२९ हेक्टर, वरूड ३,०९३ हेक्टर, दर्यापूर १२ हेक्टर,अंजनगाव सुर्जी ४९० हेक्टर, अचलपूर ७७६ हेक्टर,चांदूरबाजार १,१३१ हेक्टर व धामणगाव रेल्वे तालुक्यात १० हजार तीन हेक्टरमध्ये पेरणी झाली आहे. यामधील किमान ३० हजार हेक्टरक्षेत्रात दुबार पेरणीचे सावट आहे.