शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Date: महाराष्ट्राच्या महासंग्रामाचा शंखनाद! विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात; २० नोव्हेंबरला मतदान, तर निकाल...
2
पेजर हॅक केलं जाऊ शकतं, मग ईव्हीएम का नाही? मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले...
3
"तुमचा सुपडा साफ केल्याशिवाय..."; फडणवीसांचं नाव घेत मनोज जरांगे काय बोलले?
4
यूपी, बंगालसह १५ राज्यांतील विधानसभेच्या ४८ जागांसाठी रंगणार पोटनिवडणूक, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला  
5
महाराष्ट्राबरोबरच झारखंडमध्येही वाजलं निवडणुकीचं बिगुल, दोन टप्प्यांत होणार मतदान 
6
Rohit Sharma Records, IND vs NZ 1st Test: रोहित शर्माचे फक्त ५ षटकार अन् बनणार भारताचा 'सिक्सर किंग'; या दिग्गजाचा विक्रम धोक्यात
7
Nanded Lok Sabha Bypoll 2024 Date: नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीची घोषणा; निकाल कधी?     
8
आचारसंहिता म्हणजे काय? नियम आणि कधीपासून लागू होते? जाणून घ्या सविस्तर...
9
निवडणूक घोषित होताच अजित पवारांना धक्का; माजी आमदारानं साथ सोडली, महायुतीला फटका
10
100 KM वेगाने धावणाऱ्या ट्रेनच्या आपत्कालीन खिडकीतून चिमुकली बाहेर उडून पडली; पुढे...
11
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून खास रणनीती, या नेत्यांकडे सोपवली विभागनिहाय जबाबदारी 
12
अभिनेते अतुल परचुरे अनंतात विलीन, मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांनी साश्रूनयनांनी दिला निरोप
13
“विधानसभेलाही मराठवाड्यात मनोज जरांगेंचा इफेक्ट दिसेल, मविआ उमेदवार जिंकतील”: बजरंग सोनावणे
14
Kojagiri Purnima 2024: कोजागरीला गजपूजाविधी व्रत केल्याने होते ऐश्वर्यप्राप्ती; जाणून घ्या विधी!
15
Waaree Energies IPO: ३४ वर्ष जुन्या कंपनीचा IPO येणार; ऊर्जा क्षेत्रात वर्चस्व; कधीपासून गुंतवणूक करता येणार, जाणून घ्या
16
चीन आणि तैवानमध्ये संघर्ष वाढला; १५३ फायटर जेट विमानं तैनात, युद्धासाठी आव्हान
17
Vastu Shastra: श्रीमंतांच्या घरात हमखास सापडतील 'या' सात वस्तू; धनवृद्धीसाठी आजच आणा!
18
मोठी घडामोड! पन्नूच्या हत्येचा प्रयत्न करणाऱ्या अधिकाऱ्याला भारताने केली अटक; अमेरिकेलाही कळविले
19
कौतुकास्पद! सहावीत नापास झाली, पण हार नाही मानली; कोचिंगशिवाय पहिल्याच प्रयत्नात IAS
20
अपंगत्वाच्या आधारावर MBBS मध्ये प्रवेश रोखता येणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

भूखंड प्रमाणपत्र न मिळाल्याने लाभार्थी लाभापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2018 10:14 PM

तालुक्यातील येरड येथील एका दिव्यांग प्रकल्पग्रस्ताला अमरावतीचे जिल्हा पुनर्वसन अधिकारी अजय लहाने यांनी भूखंड प्रमाणपत्र न दिल्यामुळे ते लाभार्थी विशेष घटक योजनेपासून वंचित राहिल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. जिल्हा पुनर्वसन अधिकाऱ्यांच्या अशा प्रतापामुळे लाभार्थ्यांमध्ये तीव्र असंतोष खदखदत आहे. 

ठळक मुद्देजिल्हा पुनर्वसन अधिकाऱ्यांचा प्रताप : लाभार्थी शंकर उईके यांची कारवाईची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर रेल्वे : तालुक्यातील येरड येथील एका दिव्यांग प्रकल्पग्रस्ताला अमरावतीचे जिल्हा पुनर्वसन अधिकारी अजय लहाने यांनी भूखंड प्रमाणपत्र न दिल्यामुळे ते लाभार्थी विशेष घटक योजनेपासून वंचित राहिल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. जिल्हा पुनर्वसन अधिकाºयांच्या अशा प्रतापामुळे लाभार्थ्यांमध्ये तीव्र असंतोष खदखदत आहे. सन २०१८-२०१९ आर्थिक वर्षात विशेष घटक योजनेंतर्गत ७५ टक्के अनुदानावर अनुसूचित जाती-जमाती व नवबौद्ध लाभार्थ्यांकरिता ३० जुलैपर्यंत अर्ज मागविण्यात आले. या योजनेमधून शासनाच्या सहाय्याने स्वयंरोजगार उभा करण्यासाठी शेळीच्या लाभाकरिता चांदूर रेल्वे तालुक्यातील येरड (बाजार) येथील शंकर जगदेव उईके यांनी भूखंड प्रमाणपत्र वगळता इतर सर्व कागदपत्रे जमा केली. त्यानंतर ते भूखंड प्रमाणपत्राकरिता २४ जुलैला दिव्यांग प्रकल्पग्रस्त संजय विठ्ठलराव डगवार यांच्यासमवेत जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा पुनर्वसन अधिकारी (उपजिल्हाधिकारी, पुनर्वसन) यांच्या कार्यालयात गेले होते. मात्र, भूखंडाचे पैसे भरल्याशिवाय भूखंड प्रमाणपत्र मिळणार नसल्याचे फर्मान जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांनी सोडले. परंतु, यापूर्वी आपल्या कार्यालयाकडून सर्व प्रकल्पग्रस्तांना पैसे न भरता भूखंड प्रमाणपत्र दिल्याचे अजय लहाने यांच्या लक्षात आणून दिले. यापूर्वी भूखंडाची रक्कम भरण्यास प्रकल्पग्रस्तांना कोणतीही पूर्वसूचना दिली नाही. ग्रामपंचायत कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर पुनर्वसन विभागाने अशी नोटीससुद्धा लावली नाही.भूखंड प्रमाणपत्र अतिआवश्यक असल्याने ते देण्याची वारंवार विनंती केल्याचे शंकर उईके यांनी सांगितले. मात्र, त्यांनी दमदाटी करीत भूखंड जप्तीची धमकी दिल्याचा आरोप उईके यांनी केला आहे. जिल्हा पुनर्वसन अधिकाºयाने भूखंड प्रमाणपत्र न दिल्यामुळे मला योजनेचा अर्ज सादर करता आला नाही व मी विशेष घटक योजनेपासून वंचित राहिल्याचे शंकर उईके यांनी म्हटले. विविध शासकीय योजनेपासून लाभार्थी वंचित राहता कामा नये, असे सरकारचे आदेश असताना प्रशासनाची जबाबदार अधिकारी अशाप्रकारे कागदपत्रांची अडवणूक करीत असल्याने सदर लाभार्थी वंचित राहिले. जिल्हा पुनर्वसन अधिकाºयांच्या या प्रतापामुळे आधीच हलाखीत जीवन जगत असलेल्या शंकर उईके यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. शंकर उईके यांना न्याय मिळेल का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.अजय लहानेेंंवर कारवाईची मागणीजिल्हा पुनर्वसन अधिकारी अजय लहाने यांच्यावर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे. मी लाभापासून वंचित राहिलो असून, यापुढे अशी वेळ कुणावरही येऊ शकते. त्यामुळे वरिष्ठांनी अशा बेजबाबदार अधिकाºयांवर कठोर कारवाई करून धडा शिकवावा, अशी मागणी शंकर उईके यांनी केली. प्रकल्पग्रस्तांसोबत दबंगगिरीजिल्हा पुनर्वसन अधिकारी अजय लहाने यांच्याकडून अशाप्रकारे बोलण्याची अपेक्षाही केली नव्हती. या अधिकाऱ्याला प्रकल्पग्रस्तांसोबत कसे बोलावे, हे जर समजत नसेल तर त्यांना त्या पदावर राहण्याचा अधिकार नाही. आमच्यासोबत दबंगगिरी करीत भूखंड जप्त करण्याची धमकी दिल्याने आमच्यावर हे अन्याय नव्हे काय, असा सवाल दिव्यांग प्रकल्पग्रस्त संजय डगवार यांनी केला आहे.