शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मनसेची सातवी यादी जाहीर; इंदापूर, पारनेरमध्ये उमेदवार दिले
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : माढ्यात शरद पवारांचा मोठा ट्विस्ट; राष्ट्रवादी काँग्रेसकडून अभिजीत पाटलांना दिला एबी फॉर्म
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : कोल्हापूरात काँग्रेसने उमेदवार बदलला,उत्तर विधानसभेत मधुरिमाराजे छत्रपतींना उमेदवारी; लाटकर समर्थकांत नाराजी
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : काँग्रेसची पाचवी यादी जाहीर; कोल्हापूर उत्तरमध्ये मोठा बदल,अकोला, कुलाबामध्ये उमेदवार जाहीर
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिंदे गटाची तिसरी यादी जाहीर, कन्नडमधून संजना जाधव, बार्शीमध्ये राजेंद्र राऊत यांना उमेदवारी जाहीर
6
भाजपानं 'या' ४ जागा मित्रपक्षांना सोडल्या; महादेव जानकर पुन्हा महायुतीत? 
7
'व्होट जिहादमुळे लोकसभेला नुकसान, पण आता विधानसभेला नाही', देवेंद्र फडणवीस स्पष्ट बोलले
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "आईनं असं काही भाष्य केलेलं नाही, ते असं का बोलले..."; अजितदादांना श्रीनिवास पवारांचं प्रत्युत्तर
9
वरवंड परिसरामध्ये दोन एसटी बसचा अपघात भीषण; दोन जण ठार : तीनजण गंभीर जखमी
10
"माझ्या प्रामाणिकपणाचं असं फळ मिळालं..?"; आमदार श्रीनिवास वनगा धाय मोकलून रडले
11
उमेदवाराच्या माघारीने उद्धवसेनेवर नामुष्की; 'औरंगाबाद मध्य'साठी तत्काळ दुसरा उमेदवार घोषित
12
Shrinivas Vanga News उमेदवारी न मिळाल्याने शिंदे गटाचा आमदार आत्महत्या करण्याच्या विचारात; कुटुंबाचा दावा
13
Zeeshan Siddique : बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर सलमानला लागली नाही झोप, झिशान म्हणतात, "रोज रात्री मला फोन..."
14
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी वंचितचा उमेदवार ठरला; पुन्हा त्याच चेहऱ्याला संधी
15
आई सांगत होती, माझ्या दादाविरोधात फॉर्म भरू नका, पण तरीही...; बारामतीत अजितदादांना अश्रू अनावर!
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सांगलीत महायुतीला धक्का! भाजपा उमेदवाराविरोधात भरला अपक्ष अर्ज,माघार घेणार नसल्याचेही केले जाहीर
17
बोरिवलीच्या उमेदवारीवरून भाजपात नाराजी; माजी खासदार गोपाळ शेट्टी स्पष्टच बोलले
18
Priyanka Gandhi : "जेव्हा मदर तेरेसा माझ्या घरी आल्या..."; प्रियंका गांधींनी सांगितला 'तो' हृदयस्पर्शी क्षण
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून चौथी यादी जाहीर; काटोल विधानसभेतून सलील देशमुखांना उमेदवारी
20
शरद पवार गटात बंडखोरी; धनंजय मुंडेंविरोधात 'हा' नेता अपक्ष निवडणूक लढवणार

उड्डाण पुलासाठी बोअरवेल खोदल्याने विहिरींची पातळी खालावली

By admin | Published: April 07, 2016 12:10 AM

महानगरपालिकेतर्फे राजापेठ येथील उड्डाण पूल निर्मितीसाठी ‘सिमेंट मिक्सिंग प्लांट’करिता एका कंपनीला ...

अमरावती : महानगरपालिकेतर्फे राजापेठ येथील उड्डाण पूल निर्मितीसाठी ‘सिमेंट मिक्सिंग प्लांट’करिता एका कंपनीला शंकरनगरातील कँसर फाऊंडेशनच्या बाजूला स्मशानभूमी परिसराची जागा देण्यात आली आहे. येथे कंपनीने दोन बोअरवेल खोदून २४ तास पाण्याचा उपसा सुरू असल्यामुळे परिसरातील विहिरींची पातळी झपाट्याने खालावली आहे. शंकरनगरातील नागरिकांनी याबाबत ‘लोकमत’कडे तक्रर केली असून युवा स्वाभिमानी संघटनेने याबाबत महापालिकेच्या बांधकाम विभागाला निवेदन दिले आहे. महापालिकेच्यावतीने राजापेठ येथील उड्डाण पूल बांधकामाचे ४० कोटी ५३ लक्ष रूपयांची वर्कआॅर्डर नागपूर येथील ‘चाफेकर अँड सन्स कंस्ट्रक्शन कंपनी’ला दिली आहे. हे काम सप्टेंबर २०१५ रोजी सुरू झाले असून ते सप्टेंबर २०१७ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. याकामाकरिता २ वर्षांपूर्वी १० कोटींचा निधी प्राप्त झाला होता. हा पूल पूर्णत्वास आल्यानंतर भविष्यात वाढत्या वाहतुकीची समस्या सुटेल. पुलाच्या बांधकामासाठी सिमेंट, गिट्टी मिक्सिंग व इतर साहित्य तयार करण्याच्या प्लांटसाठी या कंपनीसोबत महापालिकेने दोन वर्षांच्या करारावर सिंधी समाज स्मशानभूमीजवळ जागा दिली आहे. येथून १०० फुटांवरच शंकरनगर सहकारी गृहनिर्माण संस्थेची मोठी सार्वजनिक विहीर आहे. या विहिरीतूनच मागील अनेक वर्षांपासून १५० ते २०० कुटुंबीयांना घरगुती वापरासाठी पाणीपुरवठा करण्यात येतो. कंपनीला महापालिकेने एक बोअरवेल खोदण्याची परवानगी दिली होती. परंतु तेथे पाणी लागले नसल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे २०० फुटांवर दुसरी बोरअरवेल खोदून त्यातून २४ तास पाण्याचा उपसा सुरू असल्याने अनेक वर्षात पहिल्यांदाच गृहनिर्माण सोसायटीच्या विहिरीच्या पाण्याची पातळी घसरली आहे. झरे आटत आहेत. त्यामुळे कंपनीने पाण्याची पर्यायी व्यवस्था करावी, अशी नागरिकांची मागणी आहे. याच ठिकाणी कंपनीचे ५० ते ६० कामगार राहात आहेत. त्यांनाही बोअरवेलमधून पाणीपुरवठा करण्यात येतो. प्लांटसाठी दोन बोअरवेल खोदण्याची महानगरपालिकेने परवानगी दिल्याचे शहर अभियंता जीवन सदार यांनी सांगितले. शंकरनगरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. (प्रतिनिधी)४० कोटी ५३ लक्ष रुपयांच्या निधीतून राजापेठ उड्डाण पुलाचे बांधकाम करण्यात येत आहे. कंपनीला कंम्पलिट मिक्सिंग प्लांटसाठी करारावर जागा देण्यात आली. दोन बोअरवेल खोदण्याची परवानगी त्यांनी घेतली आहे. - जीवन सदारअति.शहर अभियंता, महानगरपालिका.