शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी अमरावतीमध्ये प्रयत्न सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2024 12:10 IST

Amravati : जिल्ह्यात ५ जुलैपासून शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्यातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी दरवर्षी शिक्षण विभागाकडून शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करण्यात येते. तसेच सापडलेल्या शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा प्रयत्न केला जातो. यंदाही प्राथमिक शिक्षण संचालकांच्या निर्देशानुसार जिल्ह्यात शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे ५ ते २० जुलै दरम्यान सर्वेक्षण केले जाणार आहे. याच अनुषंगाने २८ जून रोजी निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन बैठक पार पडली. यावेळी शिक्षणाधिकारी, महिला व बालकल्याण विभागाचे अधिकारी व अन्य संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यासह राज्यात विविध कारणांमुळे बालके शाळाबाह्य होत असतात. तसेच विविध प्रकारच्या कामानिमित्त कामगारांचे वेगवेगळ्या ठिकाणी स्थलांतर होत असते. अशा शाळाबाह्य होणाऱ्या व स्थलांतरित होणाऱ्या कामगारांच्या मुलांना शोधून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात दाखल करून घेत शिक्षण अबाधित राखण्यासाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयाने ५ ते २० जुलै दरम्यान सर्वेक्षण राबविण्याचे निश्चित आहे. शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण हे महत्त्वपूर्ण सामाजिक काम केवळ शासनाच्या एकाच विभागाकडून पूर्णत्वास नेणे अशक्यप्राय आहे. त्यामुळे यात शासनाच्या संबंधित विभागांचा सहभागही तेवढाच महत्त्वाचा असल्याने सर्व विभागांनी एकजुटीने काम करणे गरजेचे आहे.

यामध्ये प्रामुख्याने महसूल, ग्रामविकास, नगरविकास, सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग, महिला व बालविकास विभाग, दिव्यांग कल्याण आयुक्तालय, साखर आयुक्तालय, कामगार विभाग, आदिवासी विकास विभाग, अल्पसंख्याक विकास विभाग आणि सार्वजनिक आरोग्य व गृह विभाग या विभागांचा सहभाग आवश्यक आहे. त्या अनुषंगानेच शाळाबाह्य मुलांच्या शोध मोहिमेसाठी वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार शिक्षण विभागाने नियोजन केले आहे. 

याठिकाणी राबविणार शोधमोहीमजिल्ह्यात ५ ते २० जुलै दरम्यान शाळाबाह्य अनियमित व स्थलांतरित बालकांच्या नोंदी घरोघरी जाऊन घेतल्या जाणार आहेत. याशिवाय बसस्थानक, रेल्वे स्थानक, सिग्नल, हॉटेल, खानावळ, सार्वजनिक ठिकाणे, बाजारतळ, वीटभट्ट्या व अन्य महत्त्वाच्या ठिकाणी शाळाबाह्य व अनियमित तसेच स्थलांतरित मुलांची शोधमोहीम राबविली जाणार आहे.

येत्या ५ ते २० जुलै दरम्यान शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणासाठी शोधमोहीम राबविली जाणार आहे. या अनुषंगाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनात शिक्षण विभागामार्फत नियोजन केले आहे.- बुद्धभूषण सोनवणे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रEducationशिक्षणAmravatiअमरावती