शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची १६ जणांची तिसरी उमेदवार यादी जाहीर; मुंबईतील २ मतदारसंघाचा समावेश
2
पुण्यात भाजपाला बसणार मोठा फटका?; कसबा पेठ उमेदवार निवडीवरून पसरली नाराजी
3
दहिसर मतदारसंघात ठाकरेंचा ट्विस्ट; आधी तेजस्वी घोसाळकरांना उमेदवारी, पण आता...
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: तिकिट कापल्याने भाजपा आमदाराला अश्रू अनावर
5
शिंदेंच्या शिवसेनेत गेलेल्या बच्चू कडूंच्या आमदाराचा महायुतीत पत्ता कट
6
NCP नेते बाबा सिद्दीकी हत्याकांडात नवा खुलासा; हत्येआधी शूटरच्या संपर्कात अन्...
7
मनसेची १५ उमेदवारांची पाचवी यादी जाहीर; सोलापूर, कोल्हापूर, बीडमध्ये कोणाला संधी?
8
नवाब मलिक मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघात लढणार; भाजपा काय भूमिका घेणार?
9
कोरेगावची जागा राष्ट्रवादीला दिली, सातारा मतदारसंघातून ठाकरे गट लढणार; संजय राऊतांची माहिती
10
अपक्ष आमदार किशोर जोरगेवार भाजपात प्रवेश करणार; सुधीर मुनगंटीवारांची नाराजी दूर?
11
गौतम गुरुजींचं नशीब फुटकं! आधी खेळाडू अन् आता कोचिंगमध्ये टीम इंडियावर आली 'गंभीर' वेळ
12
Harun Khan: ठाकरेंनी उतरवला अल्पसंख्याक उमेदवार, कोण आहेत हारुन खान?
13
Sanjay Singh : "भाजपाने केला केजरीवालांना मारण्याचा प्रयत्न, द्वेषाच्या राजकारणाने..."; आप नेत्याचा गंभीर आरोप
14
'बटेंगे तो कटेंगे': भाजपच्या भूमिकेवर RSS चं पहिल्यांदाच भाष्य; होसबळे म्हणाले...
15
नेत्रदिपक कामगिरी! CA चं शिक्षण घेतल्यानंतर 'तो' शेतीकडे वळला; आता ५५ लाखांचा टर्नओव्हर
16
बंडोबा झाले थंड! उल्हासनगरमध्ये आयलानी व कलानी लढतीकडे सगळ्यांचे लक्ष का?
17
"आम्हाला टोलमाफीचे गाजर नको", सुमीत राघवनचा संताप, शिंदे-फडणवीसांना टॅग करत म्हणाला...
18
नेटकऱ्यांनी रोहित-विराटला दाखवला 'आरसा'; सचिनच्या चाळीशीतील 'त्या' व्हिडिओचाही दिला दाखला
19
मोठी बातमी: भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर; जतमधून पडळकर, खडकवासल्यातून पुन्हा तापकीर!
20
पोटनिवडणुकीत पराभव तरी भाजपने दिली पुन्हा संधी! हेमंत रासनेंनी कसं जुळवलं गणित?

देशातील प्रत्येक जिल्हा होणार पाणीदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2022 8:45 AM

Amravati News केंद्र सरकारने अमृत सरोवर योजनेतून देशातील २८ राज्ये पाणीदार करण्याचा संकल्प सोडला आहे. या याेजनेतून मृतप्राय तलावांना पुनर्जिवीत करणे अथवा नवीन जलाशय निर्माण करण्यात येणार आहेत.

ठळक मुद्देअमृत सरोवर योजनेतून प्रत्येक जिल्ह्यात ७५ तलाव निर्मितीचे उद्दिष्ट

गणेश वासनिक

अमरावती : ब्रिटीशकालीन तलाव, जलाशय हे नियोजनाअभावी मृतप्राय झाले आहेत. परिणामी अलीकडे गाव, खेड्यात पाण्याचे भीषण दुर्भीक्ष्य जाणवू लागले आहे. मात्र, आता केंद्र सरकारने अमृत सरोवर योजनेतून देशातील २८ राज्ये पाणीदार करण्याचा संकल्प सोडला आहे. या याेजनेतून मृतप्राय तलावांना पुनर्जिवीत करणे अथवा नवीन जलाशय निर्माण करण्यात येणार आहेत.

केंद्र सरकारच्या जल, वायू प्रदूषण विभागाने प्रत्येक जिल्हा पाणीदार होण्यासाठी सूक्ष्म नियोजन सुरु केले आहे. त्या अनुषंगाने ब्रिटीशकालीन मृतप्राय तलाव अथवा जलाशय पुनर्जिवीत करण्यासाठीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्याबाबतचे पत्र जारी केले आहे. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून प्रत्येक जिल्ह्यात ७५ तलाव साकारले जाणार आहेत. यात वन विभाग, जल संधारण, कृषी, ग्रामविकास, सिंचन, महसूल विभागाला ब्रिटीशकालीन तलाव, जलाशये शोधावी लागणार आहेत. गावाशेजारी असलेले जलाशय, तलाव पुनर्जिवीत करण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. मात्र, ज्या ठिकाणी मृतप्राय तलाव अथवा जलाशय नसेल तेथे आवश्यकतेनुसार नव्याने साकारले जाणार आहे.

७७३ जिल्ह्यात साकारणार ५७ हजार ९७५ तलाव

देशातील २८ राज्ये पाणीदार करण्यासाठीचे केंद्र सरकारचे धोरण आहे. त्यानुसार अमृत योजनेतून ७७३ जिल्ह्यात ५७,९७५ तलाव, जलाशय साकारले जाणार आहेत. राज्य शासनाकडून तसे प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. प्राप्त प्रस्तावानुसार केंद्र सरकार राज्यांना अंदाजपत्रकानुसार निधी वितरित करणार असल्याचे केंद्र सरकारच्या जल, वायू प्रदूषण विभागाच्या पत्रात नमूद आहे.

बोअरवेलची स्पर्धा, पाण्याची पातळी गेली खोल

एकिकडे मृतप्राय तलाव, जलाशय नियोजनाअभावी मृतप्राय झाले आहेत. तर दुसरीकडे शहर, ग्रामीण भागात बोअरवेल करण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. बोअरवेल करताना जमिनीत छिद्र करण्यासाठी २०० फुटांची नियमावली आहे. मात्र, अनेक ठिकाणी पाण्याची पातळी खोल गेल्याने ४०० ते ५०० फुटांपर्यंत बोअरवेल करण्यात येत आहेत. जमीन आतून ठिसूळ झाली आहे. अशा भागात भूर्गभाची खोली वाढत गेल्याने भूकंपाची दाट शक्यता असल्याचे भूगर्भ शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

तलावातील गाळ शेतकऱ्यांना देणार

ब्रिटिशकालीन तलाव अथवा जलाशय पुनर्जीवित करताना गाळ काढण्यात येणार आहे. तलावातून निघणारा गाळ शेतीसाठी दिला जाईल. तलावाचा उपसा करून पाणीसाठा वाढविण्यावर भर असेल. गाव, शहरानजीक असलेल्या तलाव व जलाशयातून भविष्यात पाणीपुरवठा करण्याचे नियाेजन आहे. भूर्गभात पाण्याची पातळी वाढावी, हेच अमृत सरोवर योजनेचे फलित असेल.

केंद्र सरकारच्या अमृत योजनेतून प्रत्येक जिल्ह्यात ७५ तलाव, जलाशय साकारण्याचे उद्दिष्ट आहे. त्यानुसार अमरावती जिल्ह्यात अशा स्थळांचे मॅपिंग सुरू आहे. ऑनलाईन पोर्टलवर छायाचित्र अपलोड केले जात आहे. पंचायत समिती स्तरावर ही कामे सुरू आहेत. जलसंधारण, नरेगाअंतर्गत तलाव, जलाशय पुनर्जीवित केले जातील. आतापर्यंत ७६ छायाचित्र अपलोड झाली आहेत.

- अविश्यांत पंडा, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अमरावती

टॅग्स :Waterपाणी