शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मनसेची सातवी यादी जाहीर; इंदापूर, पारनेरमध्ये उमेदवार दिले
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : माढ्यात शरद पवारांचा मोठा ट्विस्ट; राष्ट्रवादी काँग्रेसकडून अभिजीत पाटलांना दिला एबी फॉर्म
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : कोल्हापूरात काँग्रेसने उमेदवार बदलला,उत्तर विधानसभेत मधुरिमाराजे छत्रपतींना उमेदवारी; लाटकर समर्थकांत नाराजी
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : काँग्रेसची पाचवी यादी जाहीर; कोल्हापूर उत्तरमध्ये मोठा बदल,अकोला, कुलाबामध्ये उमेदवार जाहीर
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिंदे गटाची तिसरी यादी जाहीर, कन्नडमधून संजना जाधव, बार्शीमध्ये राजेंद्र राऊत यांना उमेदवारी जाहीर
6
भाजपानं 'या' ४ जागा मित्रपक्षांना सोडल्या; महादेव जानकर पुन्हा महायुतीत? 
7
'व्होट जिहादमुळे लोकसभेला नुकसान, पण आता विधानसभेला नाही', देवेंद्र फडणवीस स्पष्ट बोलले
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "आईनं असं काही भाष्य केलेलं नाही, ते असं का बोलले..."; अजितदादांना श्रीनिवास पवारांचं प्रत्युत्तर
9
वरवंड परिसरामध्ये दोन एसटी बसचा अपघात भीषण; दोन जण ठार : तीनजण गंभीर जखमी
10
"माझ्या प्रामाणिकपणाचं असं फळ मिळालं..?"; आमदार श्रीनिवास वनगा धाय मोकलून रडले
11
उमेदवाराच्या माघारीने उद्धवसेनेवर नामुष्की; 'औरंगाबाद मध्य'साठी तत्काळ दुसरा उमेदवार घोषित
12
Shrinivas Vanga News उमेदवारी न मिळाल्याने शिंदे गटाचा आमदार आत्महत्या करण्याच्या विचारात; कुटुंबाचा दावा
13
Zeeshan Siddique : बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर सलमानला लागली नाही झोप, झिशान म्हणतात, "रोज रात्री मला फोन..."
14
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी वंचितचा उमेदवार ठरला; पुन्हा त्याच चेहऱ्याला संधी
15
आई सांगत होती, माझ्या दादाविरोधात फॉर्म भरू नका, पण तरीही...; बारामतीत अजितदादांना अश्रू अनावर!
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सांगलीत महायुतीला धक्का! भाजपा उमेदवाराविरोधात भरला अपक्ष अर्ज,माघार घेणार नसल्याचेही केले जाहीर
17
बोरिवलीच्या उमेदवारीवरून भाजपात नाराजी; माजी खासदार गोपाळ शेट्टी स्पष्टच बोलले
18
Priyanka Gandhi : "जेव्हा मदर तेरेसा माझ्या घरी आल्या..."; प्रियंका गांधींनी सांगितला 'तो' हृदयस्पर्शी क्षण
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून चौथी यादी जाहीर; काटोल विधानसभेतून सलील देशमुखांना उमेदवारी
20
शरद पवार गटात बंडखोरी; धनंजय मुंडेंविरोधात 'हा' नेता अपक्ष निवडणूक लढवणार

शेतकऱ्यांचे पशुधन इतिहासजमा

By admin | Published: April 02, 2016 12:14 AM

भारत हा कृषिप्रधान देश आहे. शेतीसोबत पशुपालन व्यवसायही येथे चालतो. मात्र, ३-४ वर्षांपासून सततची नापिकी व दुष्काळामुळे येथील शेतकऱ्यांना शेती करणे कठीण झाले आहे.

सततच्या दुष्काळाने चाऱ्याचीही कमतरता : शेतीसाठी धोक्याची घंटा सुनील देशपांडे अचलपूरभारत हा कृषिप्रधान देश आहे. शेतीसोबत पशुपालन व्यवसायही येथे चालतो. मात्र, ३-४ वर्षांपासून सततची नापिकी व दुष्काळामुळे येथील शेतकऱ्यांना शेती करणे कठीण झाले आहे. त्याचा परिणाम पशुपालन व्यवसायावर होत असून जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होत आहे. जनावरांच्या वैरणाचे भाव गगनाला भिडले आहेत. यामुळे शेतकरी पशुधन कवडीमोल भावात विकत आहेत. पर्जन्यमान अनिश्चित आहे. पाऊस वेळी-अवेळी बरसत असल्याने शेतीपिकांची नासाडी होत आहे. अगोदरच नापिकी असताना अवकाळी पाऊस उरले सुरले पिकही वाहून नेतो. दुष्काळात तेरावा महिना अशी परिस्थिती तालुक्यातील शेतकऱ्यांची झाली आहे. शेतकऱ्यांना शेती करणे परवडत नसल्याने मागील १२ वर्षात १०० पेक्षा अधिक आत्महत्या शेतकऱ्यांनी तालुक्यात केल्या आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी जोडधंदा म्हणून पशुपालन करावे, असा सल्ला राजकीय पुढारी देत असले तरी या जोडधंद्यासाठी लागणारा चाराही शेतकऱ्यांच्या शेतात उगवत नाही, याची माहिती स्वत:ला शेतकऱ्याची पोर म्हणविणाऱ्या पुढाऱ्यांनाही नाही. अजूनही निम्म्यापेक्षा जास्त शेतकरी शेतीच्या मशागतीकरिता बैलांचा वापर करतात. बैलांना शेतकऱ्यांचा सखा म्हणून संबोधले जाते. दोघांच्या मेहेनतीने अन्नाची निर्मिती होते. पण, आज पोशिंद्यावरच उपासमारीची वेळ आली आहे. गाय हिंदू धर्मात गोमाता म्हणून ओळखली जाते. तिच्यावर लोकांची श्रद्धा आहे. त्यामुळे गोधन शेतकऱ्यांच्या घरी असणे म्हणजे श्रद्धा आणि सधनतेचे लक्षण समजले जाते. मात्र विज्ञानाच्या प्रगतीमुळे आता शेतीपयोगी येणारे वखर नांगर, डवरा इत्यादी संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहेत.परिणामी मागील आठ-दहा वर्षापासून बैलाची दावण दिसणे देखील कठीण झाले आहे. अचलपूर तालुक्यात परतवाडा येथे दर गुरूवारी जनावरे विक्रीसाठी येत असतात. त्यात बैलांची संख्या अधिक असते आणि खरेदीदार कमी असतात. या बैलांची कवडीमोल भावात विक्री होते. विक्री केलेले बैल शेतीच्या उपयोगासाठी नेले जातात की अवैध कत्तलखान्याकडे नेले जातात, हाच सर्वात मोठा प्रश्न आहे. दिवसेंदिवस कमी होत असलेली बैल आणि गार्इंची संख्या पर्यावरण विकासाच्या दृष्टीने धोक्याची घंटा आहे, असे जातीवंत शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. पशुपालकांना दिलासा देण्याची गरज आहे.