शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly election 2024: काटोलमध्ये महाविकास आघाडीत, तर उमरेडमध्ये महायुतीत बंडखोरी
2
कागलमध्ये राडा! मुश्रीफ आणि घाटगे समर्थक भिडले; एकमेकांची कॉलर पकडून हाणामारी
3
महायुतीत भाजपच मोठा भाऊ! साताऱ्यातील आणखी एक मतदारसंघ मिळण्याचे प्रयत्न
4
मनसेकडून पाच नावांची घोषणा, चौथ्या यादीत कोणत्या मतदारसंघात उतरवले उमेदवार?
5
आता खरी 'कसोटी'! बंगळुरू-पुणे मार्गावर खडतर प्रवास; भारत WTC फायनलमध्ये पोहोचणार?
6
महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? 'या' 12 जागांचा वाद कायम, तिन्ही पक्षांचा दावा...
7
भायखळ्यात यामिनी जाधवांविरोधात ठाकरेंचा शिलेदार ठरला; कोण आहेत मनोज जामसुतकर?
8
"आम्हाला ५ जागा द्या, अन्यथा २५ जागांवर लढणार’’, मित्रपक्षाचा मविआला इशारा 
9
मृत्यू केव्हा गाठणार? एका रिपोर्टवर AI टूल करते भविष्यवाणी; लोकांच्या हॉस्पिटलमध्ये लागल्यात रांगा
10
जबरदस्त! Whatsapp मध्ये येणार कमाल फीचर; मोबाईल न वापरता मॅनेज करू शकता कॉन्टॅक्ट्स
11
Maharashtra Assembly Election: दिंडोशीत सुनील प्रभूंविरोधात शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार कोण?
12
हॉकीच्या 'राणी'ला निरोप! "देशातील प्रत्येक मुलीचा आत्मविश्वास वाढवला", IAS अधिकारी भारावली
13
Maharashtra Assembly election 2024: अंधेरी पूर्वची जागा शिंदेंच्या शिवसेनेला की, भाजपला?
14
"वर्षभर वेळ मागितला, तरी दिला नाही; मातोश्रीवर गेलो तिथे ६ तास थांबवलं अन् २ मिनिटे भेटले"
15
अभिनेता पृथ्वीक प्रतापने साधेपणाने लग्न का केलं? कारण वाचून तुम्हीलाही वाटेल हेवा!
16
भारत-चीन सैन्य मागे घेण्यास सुरुवात; येत्या तीन दिवसांत टेंट, शेड अन् इमारती हटवल्या जाणार
17
पतीसह पिकनिकला गेलेल्या महिलेवर सामूहिक बलात्कार, व्हिडीओही बनवले, गुन्हा नोंदवण्यासाठी पीडितांची वणवण
18
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील शूटरला देश सोडण्यासाठी पासपोर्ट देण्याचं दिलेलं आश्वासन
19
आदित्य ठाकरेंकडे ५३५ हिरे लगडलेले कडे, दीड किलो सोने...; प्रतिज्ञापत्रात उद्धव ठाकरेंचेही उत्पन्न केले जाहीर

तेलबियाकडे शेतकऱ्यांची पाठ, रब्बीत गहू, हरभऱ्याकडेच कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2022 5:04 PM

यंत्रणेच्या उदासीनतेचा फटका; करडई, जवस, तीळ, सूर्यफुलाचे नाममात्र क्षेत्र

अमरावती : रब्बी हंगामाची लगबग सध्या सुरू आहे. यामध्ये शेतकऱ्यांचा कल गहू व हरभरा पेरणीकडे जास्त आहे. याशिवाय गळीत धान्य यामध्ये सूर्यफूल, जवस, तीळ व करडई या पिकांकडे पाठ असल्याचे दिसून येते. यंत्रणेची उदासीनता, शेतकऱ्यांमध्ये जागृतीचा अभाव याशिवाय अन्य कारणांमुळे तेलबियांचे क्षेत्र या दशकात कालबाह्य ठरत आहे.

यंदाच्या पावसाळ्यात पश्चिम विदर्भात सरासरीपेक्षा अधिक पावसामुळे जमिनीत आर्द्रता जास्त आहे. याशिवाय सिंचन प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहे. त्यामुळे रब्बीसाठी आठ ते बारा पाळ्यांमध्ये सिंचनासाठी पाणी देण्याचे नियोजन जलसंपदा विभागाने केलेले आहे. याशिवाय भूजलस्तरात वाढ झाल्याने विहिरींद्वारेही सिंचन होणार आहेत. त्यामुळे रब्बीच्या क्षेत्रात किमान दहा टक्क्यांनी वाढ होणार असल्याचा अंदाज आहे. मात्र यामध्ये किमान ९० टक्के क्षेत्रात गहू व हरभराची पेरणी होत असल्याने अन्य पिके कालबाह्य ठरू लागली आहे.

विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाचे माहितीनुसार यंदाच्या रब्बी हंगामासाठी ७,२८,८४९ हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. त्यातुलनेत सद्यस्थितीत ५,६३,४०९ हेक्टर क्षेत्रात पेरणी झालेली आहे. ही ७७.३० टक्केवारी आहे.

ही आहेत कारणे

सिंचनासाठी अधिक पाणी लागणे, मजूर न मिळणे, कीड व रोगांचा प्रादुर्भाव, हंगामात भाव पडणे, सामूहिक पेरणी होत नसल्याने पक्ष्यांचा उपद्रव, उत्पादन खर्च अधिक असणे, अवकाळीमुळे नुकसान याशिवाय अन्य कारणांमुळे तेलबियांचे क्षेत्र होत असल्याचे कृषी विभागाने सांगितले.

असे आहे तेलबियांचे क्षेत्र

विभागात सद्यस्थितीत करडईची १,०८८ हेक्टरमध्ये पेरणी झालेली आहे. याशिवाय जवस ४३ हेक्टर, तीळ ४७ हेक्टर, सूर्यफूल ४३ हेक्टर क्षेत्रात पेरणी झालेली आहे. खरीप हंगामातदेखील तेलबियांमध्ये फक्त सोयाबीन वगळता बाकी पिकांचे क्षेत्र देखील कमी झालेले आहे.

गहू, हरभराकडेच शेतकऱ्यांचा कल

विभागात सद्यस्थितीत ४,६०,१२८ हेक्टरमध्ये हरभरा व ८४,३५७ हेक्टरमध्ये गव्हाची पेरणी झालेली आहे. रब्बीत ९० टक्के क्षेत्र या दोन पिकांचे राहणार आहे. याशिवाय ज्वारी ८.०१८ व मक्याची ८,३०४ हेक्टरमध्ये पेरणी झालेली आहे. तेलबिया फक्त १,६३२ हेक्टरमध्ये आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी