शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

अर्ज करुनही शेतकऱ्यांना वीज जोडणीची प्रतीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2024 13:08 IST

Amravati : नवीन कनेक्शनकडे दुर्लक्ष, वाढोणा रामनाथ परिसरातील शेती ओलितापासून वंचित

लोकमत न्यूज नेटवर्कवाढोणा रामनाथ : शेतात विहीर आहे. काहींकडे बोअरवेल आहे. त्याला मुबलक पाणी आहे. त्यामुळे शेतात दुबार पीक घेऊन उत्पन्न वाढविण्याची, त्यासाठी परिश्रम घेण्याची शेतकऱ्यांची तयारी असली तरी वीज जोडणीसाठी त्यांना प्रतीक्षा करावी लागत आहे. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील वाढोणा रामनाथ परिसरातील शेतकऱ्यांची ही व्यथा आहे.

काही शेतकऱ्यांकडे शेतामध्ये विहिरी आहेत. त्यामध्ये मुबलक पाणी आहे. परंतु, नवीन वीज जोडणी गेल्या दोन वर्षांपासून शेतकऱ्यांना देणे बंद करण्यात आल्याने पाणी असूनही ओलिताची पिके घेता येत नाहीत. गेल्या दोन वर्षांपासून शेतकऱ्यांनी वीज कनेक्शनकरिता महावितरणकडे अर्ज केला. परंतु, त्यावर आजपर्यंत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. वाढोणा येथील शेतकरी प्रफुल्ल वडवाले यांनी सन २०१६ मध्ये महावितरणकडे वीजपुरवठ्यासाठी ६२०० रुपयांचा भरणा केला होता. त्यांनी अनेक चकरा महावितरण कार्यालयाकडे मारल्या. परंतु त्याचा काही उपयोग झालेला नाही. बागायती शेती करण्यापासून महावितरणने वंचित ठेवल्याचा त्यांचा आक्षेप आहे.

सौरऊर्जेची सक्तीशेतकऱ्यांनी शेतामध्ये सौरऊर्जाचलित वीजपुरवठा घेऊन ओलिताची शेती करावी, असा अलिखित नियम महावितरणकडे आहे. परंतु, माकडे व इतर वन्यप्राण्यांच्या उपद्रवामुळे सोलर पॅनलची तूटफूट होते आणि वीजपुरवठा खंडित होतो. त्यामुळे हा पर्याय महागडा ठरत आहे. महावितरणकडे वीज जोडणीबाबत विचारणा केल्यास, सौरऊर्जा संयंत्रावर ९० टक्के अनुदान आहे, ते घ्या, असा धोशा लावला जात असल्याचे शेतकयांचे म्हणणे आहे.

३० ऑगस्ट २०२३ पर्यंत ज्या शेतकऱ्यांनी पैसे भरलेले आहेत, त्यांनाच वीज कनेक्शन देण्यात येत आहे. त्यानंतर येणाऱ्या अर्जासाठी फंड नसल्यामुळे वीज पुरवठा करणे बंद आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त सौरऊर्जेचा वापर करावा.- सुनील शिंदे, अधीक्षक अभियंता, महावितरण 

टॅग्स :electricityवीजFarmerशेतकरीfarmingशेतीAmravatiअमरावती