शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’चे पैसे पोहोचले भावांच्या खात्यात; आणखी एक फ्रॉड, हडपले लाखो रुपये
2
जुन्या सरकारांमुळे महाराष्ट्राचे नुकसान; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मविआवर टीका
3
‘किल्लारी’नंतर ३१ वर्षांत भूकंपाचे तब्बल १२५ धक्के; भूगर्भातून आवाज येण्याचे प्रमाणही वाढले 
4
‘मन की बात’ म्हणजे देवदर्शन; पंतप्रधान नरेंद्र मोदी; देशातील लोक सकारात्मक माहितीसाठी भुकेले 
5
भारतीय महिलांचा परदेशात होतोय हुंड्यासाठी छळ; पती होतोय गायब
6
यूपीत ११ जिल्ह्यांना पुराचा वेढा; २० लोकांचा मृत्यू, बिहारच्या १३ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती
7
काेचिंग क्लास चालक तीन भावांचा मुलीवर अत्याचार; तिघांनाही अटक
8
राजू शेट्टी पवईतून ठरले ‘विजयी’; म्हाडाच्या लॉटरीत अभिनेत्री संस्कृती बालगुडे अपात्र
9
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
10
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
11
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
13
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
14
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
15
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
16
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
17
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
18
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
19
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
20
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या

पतंग उडवा,पण वीजवाहिन्यांपासून दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 4:11 AM

अमरावती : मकरसंक्रांतीनिमित्त सर्वत्र पतंग उडविली जातात. त्या पार्श्वभूमीवर पतंग उडवा, पण वीजवाहिन्यांपासून दूर, असे आवाहन महावितरणने केले ...

अमरावती : मकरसंक्रांतीनिमित्त सर्वत्र पतंग उडविली जातात. त्या पार्श्वभूमीवर पतंग उडवा, पण वीजवाहिन्यांपासून दूर, असे आवाहन महावितरणने केले आहे. पतंगबाजी दरम्यान वीजवाहिन्यांवर मांजा अडल्यास किंवा अनावधानाने पतंगबाज वीजवाहिन्यांच्या संपर्कात आल्यास जिवितहानीबरोबरच वित्तहानी होण्याचा धोका आहे. त्यामुळे पतंग उडविताना सर्तक रहा, असे महावितरणे स्पष्ट केले. महापारेषणच्या उच्चदाब वीजवाहिन्यांचे जाळे हजारो किलोमीटरचे असून महावितरणच्या लघु व मध्यम वीजवाहिन्यांचे जाळेही मोठ्या प्रमाणात आहे. खांबावरून टाकलेल्या वीज वाहिन्यांतून वीजप्रवाह सुरू असतो. त्यामुळे वीज वाहिन्यांच्या परिसरात पतंग उडविताना अनेकदा मांजा, पतंग वीज वाहिन्यांना अडकण्याचे प्रकार घडतात, सदर पतंग काढण्यासाठी मुलांसह नागरिकांकडून लोखंडी रॉड, पाईप किंवा लांब तारेचा वापर केला जातो. त्यावेळी वीजपुरवठा सुरू असेल तर विजेचा धक्का बसून जिवितहानी होते. तसेच वाहिन्यांवर अडकलेला मांजा खेचल्यास वीजवाहिन्या एकमेकांच्या संपर्कात येऊ, आग लागणे, वीजपुरवठा खंडित होणे, अशा घटना घडतात. त्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून पतंग उडविताना विशेष काळजी घ्यावी, वीजवाहिन्यांवर अडकलेले पतंग काढण्याचा प्रयत्न करू नये, असे महावितरणने स्पष्ट केले आहे.

बॉक्स

मोकळ्या मैदानात पतंग उडवा

पतंग उडवण्यासाठी तरुणांनी वीजवाहिन्या किंवा गच्चीवरून पतंग उडविण्याऐवजी मोकळ्या मैदानात पतंगबाजीचा आनंद घ्यावा, आपण पतंगबाजीचा आनंद लुटताना इतरांची गैरसोय होऊ नये याचीही जाणीव ठेवावी, असेही महावितरणने म्हटले आहे.