शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar On Sharad Pawar : "मी जी राजकीय भूमिका घेतली ती साहेबांना सांगूनच, आधी हो म्हणाले नंतर..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
2
Haryana Assembly Election Result 2024 : राम रहिम याचा भाजपासह काँग्रेसलाही फायदा; हरयाणा निकालातील आकडेवारीतून माहिती
3
बहुमत असले तरी अब्दुल्लांची नॅशनल कॉन्फरन्स भाजपसोबत जाणार? जम्मू काश्मीरमध्ये लावले जातायत अंदाज
4
मंदिरातून परतणाऱ्या मुलीची काढली छेड; भावाने विरोध करताच बेदम मारहाण, झाला मृत्यू
5
कोलकाता निर्भया प्रकरण : आरजी कर रुग्णालयातील ५० वरिष्ठ डॉक्टरांनी दिला राजीनामा
6
Savitri Jindal Haryana Election Networth : हिसारमधून निवडणूक जिंकणाऱ्या सावित्री जिंदाल यांची नेटवर्थ माहितीये? भल्याभल्यांना टाकलंय मागे
7
Breaking: खळबळजनक! दहशतवाद्यांकडून दोन जवानांचे अपहरण; पैकी एक तावडीतून सुटला
8
साईबाबा संस्थानला गुप्त दानावर कर द्यावा लागणार? हायकोर्टाने महत्वाचा निर्णय घेतला
9
राम रहीमला ६ वेळा पॅरोल देणाऱ्या माजी पोलीस अधिकाऱ्याचा विजय; भाजपमध्ये केला होता प्रवेश
10
"जिंकलेल्या डावाचे पराभवात रूपांतर करायचे काँग्रेसकडून शिकावे"; हरयाणा निकालावरुन ठाकरे गटाचा निशाणा
11
हरयाणात BJP, जम्मू-काश्मिरात इंडिया; महाराष्ट्रात काय होणार? महायुती-मविआत कोणाचा दबाव वाढेल?
12
आजचे राशीभविष्य ९ ऑक्टोबर २०२४; प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल
13
हरयाणात घडले तेच महाराष्ट्रातही घडणार; भाजपच्या जल्लोष सभेत देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास
14
अखेर ठरले... अजित पवार बारामतीतूनच लढणार; प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केली उमेदवारी
15
जम्मू-काश्मीरमध्ये 'इंडिया', ओमर अब्दुल्ला होणार मुख्यमंत्री; आपनेही खाते उघडले
16
मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करा; उद्धव ठाकरे यांचे काँग्रेस, शरद पवार गटाला आवाहन
17
एक्झिट पोल पडले तोंडावर; भाजपच्या जागांबाबत बहुतांश अंदाज फसले, निकालांबाबत होती उत्सुकता
18
घोळ सरेना, नाव ठरेना, अध्यक्ष मिळेना! शर्यतीत अनेक दिग्गज; पण, शिक्कामोर्तब कधी?
19
०.८५ टक्के कमी मते अन् गमावल्या ११ जागा; भाजप-काँग्रेसच्या मतांची टक्केवारी जवळपास सारखीच
20
जम्मू-काश्मीर विधानसभा निकालात ‘इंडिया’ने मारली बाजी, तरी भाजप ठरला बाजीगर

उड्डाणपुल बांधकामाचे भिजत घोंगडे

By admin | Published: November 10, 2016 12:11 AM

: नरखेड रेल्वे क्रॉसिंगजवळील उड्डाणपुलाचे काम लवकरच पुर्णत्वास नेऊ असा शब्द संबंधित कंत्राटदाराने ....

बडनेरा मार्गावर वाहनधारकांचे हाल : कंत्राटदाराच्या मनमानीचा अतिरेकबडनेरा : नरखेड रेल्वे क्रॉसिंगजवळील उड्डाणपुलाचे काम लवकरच पुर्णत्वास नेऊ असा शब्द संबंधित कंत्राटदाराने खासदार आनंदराव अडसुळांना दिला होता. मात्र, उड्डाणपुलाचे काम अजून किती अवधी घेणार हा प्रश्न वाहनचालकांसाठी मन:स्तापाचा ठरत आहे. गेल्या चार वर्षांपासून कंत्राटदाराच्या मनमानी कारभारामुळे रस्त्याचे डांबरीकरण झाले नाही. अमरावती ते बडनेरा मुख्य मार्गावरील नरखेड रेल्वे क्रॉसिंग येथे गेल्या चार वर्षांपासून उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. हे काम अत्यंत मंद गतीने सुरू आहे. या मार्गावर वाहतुकीची सतत रेलचेल असते. बडनेऱ्यात रेल्वे जंक्शन असल्यामुळे येथून मोठ्या संख्येत रेल्वे गाड्यांची ये- जा राहते. पर्यायाने अमरावती शहरासह जिल्ह्यातील प्रवासी बडनेऱ्यातूनच प्रवास करतो. त्यामुळे अमरावती ते बडनेरा मार्गावर शहर बसेस, आॅटो इतर चारचाकी, दुचाकी वाहनांची गर्दी ही नित्याचीच बाब आहे. तसेच नियमित अमरावती ते बडनेरा येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. नरखेड रेल्वे क्रॉसिंगजवळचा रस्ता अत्यंत खराब झाला आहे. खड्ड््यांमध्ये बारीक गिट्टी टाकण्यात आली आहे. येथे वाहनांमुळे धुळच धूळ राहते. अशातच खराब रस्त्यांचा मोठा मनस्ताप वाहनचालकांना सहन करावा लागत आहे. खासदार आनंदराव अडसुळ यांनी हा उड्डाणपुल लवकरच शहरवासिंयाच्या सेवेत सुरू होणार असल्याचे म्हटले होते. मात्र, अद्यापपर्यंत उड्डाणपुलाचे काम पुर्णत्वास गेलेले नाही. अजून किती अवधी लागणार असा प्रश्न पुढे आला आहे. या मार्गावरून मोठ्या संख्येत रुग्णवाहिका जात असताना या नादुरुस्त रस्त्याचा त्रास रुग्णांना सहन करावा लागत आहे. सदर कंत्राटदार थातुरमातूर रस्ता बनवून वेळ काढूपणाचे धोरण आखत असल्याचे चित्र आहे. चार वर्षात कंत्राटदाराने रस्त्याचे डांबरीकरण केले नाही. या रस्त्याचे त्वरीत डांबरीकरण करण्यात यावे, अशी सर्वसामान्यांची हाक आहे. आठवडा भरात रस्ता दुरुस्त केला नाही तर तीव्र आंदोलन करु, असा ईशारा सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ बनसोड, विलास वाडेकर यांनी दिला आहे. (शहर प्रतिनिधी)खासदारांनी पुन्हा घ्यावा पुढाकारनरखेड रेल्वे क्रॉसिंगजवळील उड्डाणपुलाचे काम लांबतच चालले आहे. गेल्या चार वर्षांपासून येथून नादुरुस्त रस्त्यांवरून वाहन चालकांना प्रवास करावा लागत आहे. याचा मोठा मन:स्ताप होत आहे. उड्डाणपुलाचे काम होईस्तोवर डांबरीकरणाचा रस्ता करण्यात यावा, अशी मागणी आहे. खासदार आनंदराव अडसूळ यांनीच यासाठी पुन्हा एकदा पुढाकार घेऊन नागरिकांना दिलासा द्यावा, असेही बोलले जात आहे.