शहरं
Join us  
Trending Stories
1
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
2
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
3
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
4
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
5
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
6
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
7
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
8
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
9
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
10
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
11
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
12
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
13
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
14
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
15
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
16
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
17
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
18
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
19
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
20
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?

पीक विमा कंपनीच्या सर्व्हेअरद्वारा ५२ शेतकऱ्यांच्या खोट्या स्वाक्षऱ्या

By गजानन उत्तमराव मोहोड | Published: May 22, 2024 9:36 PM

चिंचपूर येथील प्रकार उघड : ‘त्या’ शेतकऱ्यांना परतावा देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

अमरावती : बाधित शेतकऱ्यांना पीक विम्याचा परतावा न मिळाल्याने ओरड सुरू असतानाच शेतकऱ्यांच्या फसवणुकीचा नवा प्रकार समोर आला आहे. धामणगाव तालुक्यातील चिंचपूर येथील बाधित ५२ शेतकऱ्यांच्या खोट्या स्वाक्षऱ्या सर्व्हेअरनेच केल्या आहेत. हा प्रकार १७ मे रोजीच्या जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत उघड झाला व कंपनीच्या प्रतिनिधीने जिल्हाधिकाऱ्यांच्या समक्ष मान्य केला.

पीक विमा कंपनीचे काही सर्व्हेअर बाधित पिकांचे पंचनामे करताना शेतकऱ्यांना पैशांची मागणी करीत असल्याचे प्रकार यापूर्वी उघडकीस आले. ज्या शेतकऱ्यांनी पैसे दिले नाहीत, त्या शेतकऱ्यांचे नुकसान कमी दाखविण्याचा प्रतापही काही सर्व्हेअरद्वारा करण्यात आलेला आहे. पीक विम्याच्या मार्गदर्शक सूचनांनुसार बहुतांश सर्व्हेअरची पात्रता निकष पूर्ण नसल्याचे यापूर्वीच्या बैठकांमध्ये स्पष्ट झालेले आहे.

धामणगाव रेल्वे तालुक्यातील मौजा चिंचपूर येथील बाधित ५२ शेतकऱ्यांच्या पिकांचा सर्व्हे करताना सर्व्हेअरने पीक नुकसानीचे पंचनाम्यावर शेतकऱ्यांच्या स्वाक्षरी घेतल्याच नाही. याऐवजी त्याने स्व:तीच स्वाक्षरी मारली व यामध्ये ० ये ५ टक्केच नुकसान दाखविल्याने शेतकरी भरपाईपासून वंचित राहिले आहेत. याबाबत जिल्हा समितीचे सचिव व एसएओ राहुल सातपुते यांनी ही बाब समिती अध्यक्ष जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या निदर्शनात आणली. त्यामुळे १५ दिवसांत परतावा देण्याचे आदेश त्यांनी कंपनीला दिले आहेत.----------------जिल्हाधिकाऱ्यांनी दिले परताव्याचे आदेशधामणगाव तालुक्यातील या सर्व्हेअरने ज्या महसूल मंडळात सर्व्हेक्षणाचे काम केले आहे. अशा मंडळातील सर्व शेतकऱ्यांच्या पूर्वसूचनांची पुन्हा तपासणी करून दोन आठवड्यांच्या आत नुकसान भरपाई देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. शिवाय तालुक्यात प्राप्त पूर्वसूचना झालेला सर्व्हे, पात्र, अपात्र पूर्वसूचना आदी माहिती तालुका कार्यालयाच्या बोर्डवर लावण्याचे आदेश दिले----------------नांदगाव तालुक्यातही उघड झाला प्रकारनांदगाव तालुक्यात कंपनीद्वारा ‘पेरील नॉट कव्हर, पोस्ट सर्व्हे इनर्लिजिबल, पेरील नॉट अकुअर्ड’ आदी कारणे दर्शवित सूचना नाकारल्या. प्रत्यक्षात पाऊस पडल्यावर शेतकऱ्यांनी टोल फ्री क्रमांकावरून सूचना दिली असता ‘नुकसानीपूर्वी सूचना नोंदविली’ या सदराखाली नाकारली. या पूर्वसूचनांची फेरतपासणी करून १५ दिवसांत परतावा देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.-----------------चांदूरबाजार तालुक्यात फळ पीक विम्याचा ट्रिगर बदललाचांदूरबाजार तालुक्यात २४ ते २६ जानेवारीदरम्यान थंडीची लाट होती, मात्र हवामान केंद्राभोवती शेकोटी पेटविल्याने व केंद्राच्या कम्पाउंडला २०० वॅटचा बल्ब लावल्याने तापमान आकडेवारीत फरक पडला व फळ पीक विम्याचा ट्रिगर लागला नाही. त्यामुळे लगतच्या शिरजगाव कसबा केंद्राची आकडेवारी ग्राह्य धरण्याबाबत शासनाला प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.------------------जिल्हास्तरीय पीक विमा समितीच्या बैठकीत समिती अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांनी पीक विमा कंपनीला विविध निर्देश दिले आहेत. ते सर्व कंपनीला पाठविण्यात आलेले आहेत.- राहुल सातपुते, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाFarmerशेतकरी