शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांचा सक्रीय राजकारणात प्रवेश; आज केली 'जन सुराज' पक्षाची अधिकृत घोषणा
2
“अमित शाह यांना दररोज नमस्कार केला पाहिजे”; चंद्रकांत पाटील यांनी सांगितले कारण
3
"देशाचे राष्ट्रपिता नाही तर सुपुत्र असतात’’, गांधी जयंती दिवशी कंगना राणौतच्या पोस्टमुळे नवा वाद
4
Harbhajan Singh, IPL 2025 Auction: ना विराट, ना रोहित... 'या' भारतीयावर IPLमध्ये लागेल ३०-३५ कोटींची बोली; भज्जीचा मोठा दावा
5
ठाण्यात चिप्स बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु
6
"तुमच्या हातचा स्वादिष्ट...", नीरज चोप्राच्या आईला PM मोदींचे पत्र; आभार मानताना भावुक
7
"मध्यपूर्वेचा नकाशा बदलण्याची इस्रायलला संधी...", विरोधकांकडून नेतन्याहूंना मिळाला ग्रीन सिग्नल! 
8
Bumrah Ashwin Virat Rohit, ICC test Rankings: जसप्रीत बुमराह 'नंबर १'! कसोटी क्रमवारीत विराट, यशस्वीची मोठी झेप; रोहित, पंत, गिलची घसरण
9
"...मग मनोज जरांगेंनी आधी तिथला उमेदवार जाहीर करावा", लक्ष्मण हाकेंचे चॅलेंज काय?
10
याला म्हणतात परतावा...! TATA च्या या शेअरनं ₹1 लाखाचे केले ₹54 लाख; दमानींकडे तब्बल 4500000 शेअर
11
आता इस्रायल-इराण संघर्ष पेटणार...! समोर आला नेतन्‍याहू यांचा 'रिव्हेंज प्लॅन', जाणून अंगावर शहारा उभा राहील
12
ठाण्यात जेसीबीच्या धक्क्याने महानगर गॅस वाहिनीला गळती, ५०० ग्राहकांचा गॅस पुरवठा खंडीत
13
"मुलगी जर दिसायला चांगली असेल..."; अजितदादा समर्थक आमदाराचे महिलांबाबत वादग्रस्त विधान
14
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यासह बड्या नेत्यांचा खात्मा करणार, इराणने प्रसिद्ध केली मोस्ट वाँटेडची यादी
15
“आरक्षण वाचवायचे असेल तर वंचित बहुजन आघाडीला सत्तेत निवडून द्या”; प्रकाश आंबेडकरांचे आवाहन
16
कमी तिथे आम्ही नव्हे, तर भारत म्हणजे 'हमी'! पुतिन यांच्यानंतर अजित डोवाल फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांना भेटले; कारण काय?
17
बांगलादेशवर मोठा विजय मिळवत 'कॅप्टन' रोहित शर्माचा विक्रम, विराट कोहलीला टाकलं मागे
18
Irani Cup live : कडक सॅल्युट! सर्फराज खानचे अप्रतिम 'द्विशतक', मुंबईचा 'संकटमोचक' लै भारी लढला
19
लीड रोड करुनही झाली नाही लोकप्रिय; १० मिनिटांच्या 'त्या' भूमिकेने केलं स्टार, आता म्हणते...
20
Palak Sindhwani: गुडबाय! 'तारक मेहता...' मधील सोनूचा मालिकेला रामराम; शेअर केली भावूक पोस्ट

परतवाड्याच्या ३८ डॉक्टरांकडून विनामूल्य आरोग्यसेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 4:09 AM

परतवाडा : कोरोना संकटकाळात ग्रामीण भागात उत्तम वैद्यकीय सुविधा उपलब्ध असावी व तेथील रुग्ण उपचारांपासून वंचित राहू नयेत ...

परतवाडा : कोरोना संकटकाळात ग्रामीण भागात उत्तम वैद्यकीय सुविधा उपलब्ध असावी व तेथील रुग्ण उपचारांपासून वंचित राहू नयेत यासाठी सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून परतवाडा-अचलपुरातील ३८ डॉक्टरांनी सामाजिक सद्भावना मंच स्थापन केला. त्याद्वारे गोरगरीब रुग्णांना विनामूल्य आरोग्यसेवा देणे सुरू केले असून, हा उपक्रम खेड्यापाड्यांतील लोकांना दिलासा देणारा ठरला आहे.

टाळेबंदीच्या काळात शहराच्या ठिकाणी चांगल्या रुग्णालयात उपचार घेण्यासाठी पोहोचण्यासाठी अनेक अडचणी होत्या. काही रुग्णांना वेळेवर उपचार मिळू न शकल्याने प्राणही गमवावे लागण्याचे प्रसंग घडतात. अशा परिस्थितीची जाण ठेवून सामाजिक बांधिलकीपोटी अचलपूर येथील ३८ डॉक्टरांनी सामाजिक सद्भावना मंच स्थापन करून विनामूल्य रुग्णसेवा सुरू केली. या कार्याचे समाजाच्या सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

परतवाडा येथील डॉ. राम ठाकरे यांनी या संस्थेची स्थापना केली असून, ग्रामीण भागातील गरीब, गरजू रुग्णांना तत्पर वैद्यकीय सुविधा मिळावी हा त्यामागचा हेतू आहे. मागील दीड वर्षापासून टाळेबंदीमुळे रोजगाराची साधने कमी झाल्याने नागरिकांची आर्थिक परिस्थिती ढासळली आहे. पैशाअभावी गरजू रुग्णांना वेळेत वैद्यकीय उपचार घेता न आल्यामुळे प्राणही गमवावे लागले आहेत. त्यामुळे डॉक्टरांनी संवेदनशीलता बाळगून उत्स्फूर्तपणे एकत्र येत हा उपक्रम राबविण्यास सुरुवात केली.

* * * * पैसे नसल्याने वेळेवर औषधोपचार करता आला नाही

‘जवळ पैसे नव्हते. म्हणून वेळेवर औषधोपचार करता आला नाही’ अशी एका वयोवृध्द आजीबाईंची व्यथा ऐकताच डॉ. ठाकरे हेलावून गेले. हा प्रसंगच या उपक्रमाला जन्म देणारा ठरला. त्यांनी याबाबत समविचारी डॉक्टर मित्रांशी चर्चा केली. यातूनच विनामूल्य वैद्यकीय सेवेची संकल्पना पुढे आली. सामाजिक सद्भावना मंचाच्या माध्यमातून ‘आरोग्य सेवा आपल्या दारी’ हे अभियान आता गावागावांत राबविण्यात येत आहे. या अभियानात डॉ. ठाकरे यांच्या हाकेला साद देत सुरुवातीला ३० फिजीशियन डॉक्टरांनी सहभाग नोंदविला आणि रुग्णसेवा करण्यासाठी सज्ज झाले. यानंतर आणखी ८ डॉक्टर अभियानात सहभागी झाले. सद्यस्थितीत एकूण ३८ डॉक्टर्स त्यांची वैद्यकीय सेवा देऊन रुग्णसेवा करीत आहेत.

आमच्या टीममधील प्रत्येक डॉक्टरांचे स्वत:चे क्लिनीक आहे. क्लिनीकचे काम आटोपून दुपारी ३ ते सायंकाळी ७ दरम्यान सर्व डॉक्टर त्यांच्या नियोजित गावी पोहोचत विनामूल्य रुग्णसेवा करतात. त्यामुळे गावातील रुग्णांचा शहरात येण्याजाण्याचा खर्च व डॉक्टरांची फी दोन्ही पैशांची बचत होत आहे.

* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *उपक्रमात विविध तज्ज्ञांचा समावेश

१ जूनपासून या मोहिमेला सुरुवात झाली असून जीवाची पर्वा न करता निःस्वार्थ भावनेने सर्वजण एक होऊन रुग्णसेवा हीच खरी ईश्वर सेवा मानून वैद्यकीय सेवा देत आहेत. पहिल्या दिवशी ३० डॉक्टरांच्या पथकाने अचलपूर तालुक्यातील चमक, बोर्डी, नायगाव या गावांत आपली वैद्यकीय सेवा देत रुग्णांची तपासणी केली. वैद्यकीय तपासणी, आजारावर उपचारासह मोफत औषधेही रुग्णांना त्यांच्याकडून देण्यात येत आहेत. या समूहात अस्थिरोगतज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, स्त्रीरोग तज्ज्ञ, त्वचारोग तज्ज्ञ, जनरल फिजिशियन, डोळ्यांचे तज्ज्ञ आदींचा समावेश आहे. दहा बारा दिवसांत जवळपास २५ गावांत विनामूल्य सेवा या खासगी डॉक्टरांनी दिली.

* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *मेळघाटातही सेवेचा संकल्प

आगामी काळात मेळघाटात आरोग्यसेवा देण्याचा त्यांचा मानस आहे. मेळघाट हा डोंगराळ अतिदुर्गम असा भाग असून तेथील आदिवासीबहुल गावांना आरोग्य सेवेची खरी गरज आहे. अचलपूर तालुक्यात सेवा दिल्यावर मेळघाटातील कुपोषण व अंधश्रध्दा निर्मूलन या दोन प्रश्नांवर काम करण्यासह तेथील दुर्गम गावांत जाऊन वैद्यकीय सेवा देणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

* * * * * * * * * * * * *उपक्रमासाठी अनेक डॉक्टर उत्स्फूर्तपणे पुढे आले

गरीब रुग्णांना त्यांच्या गावातून परतवाडा येथे पोहोचायला खर्च लागतो. त्यामुळे आपणच त्यांच्या गावाला जाऊन आरोग्य शिबिर घेऊन आरोग्यसेवा देऊ, असे सर्वानुमते ठरविले. त्यानुसार आम्ही त्या गावात गेलो. गावकऱ्यांकडून आदर, प्रेम आम्हांला मिळते. त्याहून मोठे समाधान दुसरे नाही. त्यामुळे हा उपक्रम सातत्यपूर्ण ठेवण्यासाठी आमचाही निश्चय दृढ झाला. त्यामुळे आमच्या डॉक्टर मंडळींमध्ये प्रत्येकाला ग्रामीण भागात जाऊन तेथील रुग्णांची सेवा करावी असे वाटत आहे, असे मंचाचे अध्यक्ष डॉ. राम ठाकरे यांनी सांगितले.

* * * * * * * * * * * * *सामाजिक सद्भावना मंचाचे आरोग्य सेवेकरी

डॉ. राम ठाकरे (अध्यक्ष), डॉ. मो. अनिस (उपाध्यक्ष), डॉ. समी उल्हा (उपाध्यक्ष), डॉ. अमोल मळसने (कोषाध्यक्ष) डॉ. प्रणय उताणे (संघटक), डॉ. सचिन गावंडे, डॉ .चेतन बीसने, डॉ. रवींद्र खाजुरकर, डॉ. अमोल चिंचोळे, डॉ. मो. फरहान, डॉ. श्रीकृष्ण घुटे, डॉ. मो. असिफ शेख, डॉ. प्रवीण मुरले, डॉ. राहुल रोडे, डॉ. स्वप्नील भेले, डॉ. मदनजी बीसने, डॉ.अमोल बैस, डॉ. यासीन शेख, डॉ. हेमंत मसने, डॉ. आशय डांगरे, डॉ. निखिल इंगळे, डॉ. दिनेश केचे, डॉ. अतुल ढोरे, डॉ. प्रवीण खालोकर, डॉ. व्ही. एन. कविटकर, डॉ. सय्यद वसीम, डॉ. राहुल नगराळे, डॉ. मोहसीन खान, डॉ. भूषण अडगोकर, डॉ. सुहास शहाणे, डॉ. सदनादजी भगत, डॉ. संजय तट्टे, डॉ. अमोल व-हेकर.

0000