शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
4
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
5
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
6
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
7
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
8
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
9
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
10
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
11
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
12
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
13
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
14
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
15
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
16
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
17
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
18
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
19
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
20
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई

तळेगावच्या यात्रेत बळीराजाच्या खेळाला तिलांजली

By admin | Published: January 18, 2016 12:04 AM

वर्षभर पोटच्या मुलाप्रमाणे बैलांना सांभाळत त्यांना चांगले खाऊ पिऊ घालून काहीही काम न करता बसवून ठेवले जाणे ....

विदर्भातील १० हजार बैल बांधलेलेच : २० कोटी रूपयांच्या अर्थव्यवस्थेला तडामोहन राऊत/वसंत कुलकर्णी धामणगाव रेल्वेवर्षभर पोटच्या मुलाप्रमाणे बैलांना सांभाळत त्यांना चांगले खाऊ पिऊ घालून काहीही काम न करता बसवून ठेवले जाणे व केवळ एका यात्रेत त्याला बाहेर काढून कोणताही छळ न करता पळविणे हा शासनाच्या आदेशाप्रमाणे आता गुन्हा ठरू लागल्याने तळेगाव दशासरच्या यात्रेतील शंकरपट हा बळीराजाच्या उपेक्षित खेळाला तिरांजली मिळाली आहे़ विदर्भातील तब्बल शंकरपटात पळणाऱ्या दोन हजार बैलजोड्या घरात वर्षांपासून बांधून आहेत. तळेगावचा शंकरपट येथील नागरिकांच्या जिद्द व परिश्रमामुळे मागील दोन वर्षांपर्यंत टिकू न होता़ दादाजी देशमुख, भाऊजी गोसावी, गणपतराव बगाडे, बापुजी बारी, रामकृष्ण लोहार, आबासाहेब पांडे, तुकाराम शेंद्रे, मसुदा डेहनकर, पंजाबराव गुल्हाने, भुरूभाई अब्दुल्ला खान यांनी या पटाची मुहूर्तमेढ रोवली होती़ कै़नानासाहेब देशमुख व त्यांच्या सहकाऱ्यांनी दोन दिवसांची स्पर्धा केली. शंकरपटात तिसऱ्या दिवशी महिला जुळाव्यात म्हणून महिलांचा पट सुरू केला़ यात विदर्भच नव्हे तर मध्यप्रदेश, मराठवाडा, खानदेश, येथून जोड्या सहभागी होत असे. तत्कालीन जिल्हाधिकारी ले़अ‍ॅलर्ट यांच्या अध्यक्षतेखाली १९४२ मध्ये शंकरपटाचा रौप्य महोत्सव साजरा करण्यात आला़ १९५४ मध्ये कृषक सुधार मंडळाचे स्थापना करून शंकर पटाची सूत्रे या मंडळाकडे आली़ या शंकरपटात त्याकाळी लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक श्रध्देय जवाहरलाल दर्डा, खा़ रामदास तडस यांच्यासह अनेक राजकारणी सहभागी होत असे़तळेगावच्या या पटाला दीडशे वर्षांची परंपरा कायम असताना दोन वर्षापासून या पटाकडे आता शर्यतीतील बैल जोड्या फिरकत नाही़ यंदा अच्छेदिन शेतकऱ्यांना येण्याची चिन्हे असताना सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा बंदी घातली आहे़ वर्षभर बैलांना पोटच्या मुलाप्रमाणे बैलमालक सांभाळतात़ लाखो रूपये या बैलजोडीवर खर्च करतात़ तळेगाव येथील यात्रेत भेटून खुशाली विचारणे, शेतीविषयक चर्चा करणे तसेच या यात्रेतून रोजगार मिळणे व कोट्यवधी रुपयांची उलाढाल होणे हे केवळ शंकरपटातून घडते़ परंतु या शेतकऱ्यांच्या आयुष्यातील सांस्कृतिक आणि धार्मिक बाबीला तिलांजली मिळाली आहे़