शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत भाजपाला मोठा धक्का! सम्राट महाडिक बंडखोरी करणार, उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार
2
"लाडकी बहिण म्हणायचं अन्..."; मुलीवर गुन्हा दाखल होताच बाळासाहेब थोरात यांची संतप्त प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
3
'महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये भाजपचे सरकार येणार', गृहमंत्री अमित शाहांचा दावा
4
अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार: बारामती विधानसभा कोणासाठी सोप्पी, आकडे काय सांगतात?
5
इराण इस्रायलवर हल्ला करणार? सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले,...
6
शरद पवारांकडून मोहोळमध्ये अनपेक्षित धक्का; अनेकांना बाजूला सारत रमेश कदमांच्या मुलीला उमेदवारी!
7
Bandra Stampede: महाराष्ट्रातील ७ स्थानकातील गर्दी टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने उचलले मोठे पाऊल
8
"ठाकरे गटाच्या पहिल्या यादीतील १७ उमेदवार आमचे नेते", देवेंद्र फडणवीस यांचा सूचक दावा
9
राष्ट्रवादी शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर; धनंजय मुंडेंविरोधात 'या' नेत्याला संधी...
10
नवाब मलिकांच्या मुलीविरोधात शरद पवारांची मोठी खेळी; अभिनेत्रीच्या पतीला दिली उमेदवारी
11
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
12
निकालानंतर गरज पडली, तर पवारांची मदत घेणार की उद्धव ठाकरेंची?; फडणवीसांनी काय दिले उत्तर?
13
जिम ट्रेनरने केली महिलेची हत्या, 'दृष्यम' स्टाईलने थेट डीएमच्या निवास्थानाजवळ लपवला मृतदेह, असं फुटलं बिंग 
14
विधानसभा निवडणुकीत भाजपा किती जागा जिंकेल? आकड्याबाबत देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान
15
Vidhan Sabha Election : विधानसभा उमेदवारीचा अर्ज किती पानांचा असतो? खर्च किती येतो?; जाणून घ्या सर्व माहिती
16
BMW कारमधून आली अन् फ्लॉवर पॉट चोरून घेऊन गेली; महिलेचा कारनामा कॅमेऱ्यात कैद
17
बांगलादेशी हिंदूंचा जीव धोक्यात! "नोकरी सोडा अन्यथा...", कट्टरतावाद्यांकडून दिल्या जातायत धमक्या 
18
भाजप कोणत्या विद्यमान आमदारांची तिकिटं कापणार? देवेंद्र फडणवीसांचं पहिल्यांदाच भाष्य
19
अखिलेश यादवांचा 'मविआ'ला इशारा, म्हणाले, "आम्हाला आघाडीत घेतलं नाही, तर..."
20
घाबरण्याची गरज नाही...डिजिटल अरेस्टबाबत पीएम मोदींनी केले जागरुक; सांगितले तीन टप्पे

नि:शब्द कोठडी पाहून गहिवरले वनकर्मचारी !

By admin | Published: February 23, 2016 12:02 AM

१४ जणांचा बळी घेणारे ते नरभक्षी. त्यांच्याबद्दल कुणाला प्रेम कसे असणार?, जिव्हाळादेखील कसा निर्माण होणार?

अमरावती : १४ जणांचा बळी घेणारे ते नरभक्षी. त्यांच्याबद्दल कुणाला प्रेम कसे असणार?, जिव्हाळादेखील कसा निर्माण होणार? त्यांच्या डरकाळ्या, चवताळणे, चेहऱ्यावरील रागीट भाव, कोठडीत फेऱ्या मारताना दिसणारा कठोर आविर्भाव...सारेच अंगाचा थरकाप उडविणारे. पण, तब्बल सात वर्षे त्यांच्या संगतीने घालविल्यानंतर वनकर्मचाऱ्यांना त्यांची सवय झाली होती. त्यांच्या गुर्मीत वावरण्याचा देखील एव्हाना या वनकर्मचाऱ्यांना सराव झाला होता. त्यामुळेच असेल कदाचित. सोमवारी या ‘खुनी’ बिबट्यांना निरोप देताना वडाळी वनउद्यानातील कर्मचारी हळवे झाले होते. एकीकडे मोठ्या जबाबदारीतून मुक्त झाल्याचा आनंद होता तर दुसरीकडे अनामिक रूखरूखही होतीच. चंद्रपूर जिल्ह्यातील मोहर्ली परिक्षेत्रातून ३१ जानेवारी २००९ रोजी दोन नरभक्षक बिबट्यांना वडाळी वनउद्यानातील कोठडीत बंदिस्त ठेवण्यात आले होते. १४ जणांचे घेतले बळीअमरावती : या दोन बिबट्यांवर १४ मनुष्यांचा बळी घेतल्याचा आरोप होता. तब्बल सात वर्षे कोठडीत घालविल्यानंतर सोमवारी ‘शेरू आणि राजा’या दोन्ही बिबट्यांना नागपूर येथील गोरेवाडा प्राणी संग्रहालय, प्राणी बचाव केंद्रात स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला. बिबट्यांना स्थलांतरित करताना कोणतीही दुखापत होऊ नये, यासाठी पशूवैद्यकीय अधिकाऱ्यांची चमू तैनात करण्यात आली आहे.सलग सात वर्षे शेरू आणि राजाचा आहार, पाणी, सुरक्षा व स्वच्छतेची जबाबदारी सांभाळणारे वनकर्मचारी किशोर डहाके बिबट्यांच्या सुरक्षिततेकडे डोळ्यांत तेल घालून लक्ष ठेवत होते. वडाळी वनउद्यानातील नरभक्षक बिबट्यांबद्दल वन्यजीवप्रेमींना प्रचंड आर्कषण असल्याने कधीकाळी त्यांना बघण्यासाठी मोर्ठी गर्दी व्हायची. मात्र, शेरु व राजाला मनुष्यांबद्दल प्रचंड घृणा होती. त्यामुळे ते माणसे बघताच आक्रमक व्हायचे. हल्ला करण्यासाठी सज्ज व्हायचे. त्यामुळे पुढे वन्यप्रेमींना कोठडीजवळ जाण्यास मज्जाव करण्यात आला. पश्चातची सलग सात वर्षे या दोन्ही नरभक्षक बिबट्यांना त्यांच्या दिमतीला असलेल्या वनकर्मचाऱ्यांसोबत घालवावी लागली. येथे नेमलेले सुरक्षा रक्षक सांगतात, काही कालावधीनंतर या नरभक्षक बिबट्यांच्या प्रवृत्तीतही फरक पडला होता. ते थोडे शांत झाले होते. दररोज सकाळ आणि संध्याकाळ या बिबट्यांची जबाबदारी सांभाळणाऱ्या वनकर्मचाऱ्यांना एव्हाना त्यांचा लळा लागलाय, अल्पसा का होईना जिव्हाळा निर्माण झालाय. त्यामुळेच आता शेरू व राजा ला कायमचा निरोप देण्याचा क्षण येऊन ठेपल्याने हे कर्मचारी गहिवरले होते. शेरू, राजाला हळवा निरोप : नरभक्षक बिबट्यांची नागपूरला रवानगी ‘त्यांना’ शनिवारी होता मांसाहार वर्ज्यवडाळीच्या वनउद्यानात तब्बल सात वर्षे कोठडी भोगणाऱ्या दोन्ही नरभक्षक बिबट्यांना दर शनिवारी उपवास असे. त्यांना शनिवारी मांस दिले जात नव्हते. हा निर्णय पशूवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार घेण्यात आल्याचे वनकर्मचारी किशोर डहाके यांनी सांगितले.भाषा कळली म्हणून वाचले प्राण शेरू व राजाशी जुळलेल्या अनेक आठवणी त्यांचा सांभाळ करणारे वनकर्मचारी किशोर डहाके यांनी ‘लोकमत’ला सांगितल्या. ते म्हणाले, सन २००९ मध्ये एकदा कोठडीतील एका पिंजऱ्याचे दार उघडेच राहिले. यावेळी दुसऱ्या पिंजऱ्याची सफाई सुरू होती. त्यामुळे शेरू अचानक समोर आला. पाचावर धारण बसली. मात्र, ‘खाली बस’ असे म्हणताच तो खाली बसला आणि माझे प्राण वाचले. सततच्या संपर्काने त्याला माझी भाषा कळू लागली होती. त्याला भाषा कळली म्हणून जीव वाचला. अन्यथा अनर्थ झाला असता.