शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

नीटचा रिझल्ट असमाधानकारक; डॉक्टर होण्याचे स्वप्न भंगले म्हणून तिने...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2021 16:45 IST

नीटच्या परीक्षेत समाधानकारक स्कोअर न आल्याने खचलेल्या एका विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

ठळक मुद्देगळफास घेऊन आत्महत्या: धनत्रयोदशीला ‘ते’ कुटुंब सुन्न

अमरावती : नीटचा रिझल्ट अपेक्षेनुरूप न आल्याने एका २१ वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. धनत्रयोदशीच्या दिवशी ‘त्या’ घरातील लक्ष्मीने अकाली एक्झिट घेतली. त्यामुळे दिवाळीच्या पर्वावर ‘ते’ घर सुन्न झाले आहे. २ नोव्हेंबर रोजी दुपारी २ च्या सुमारास राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला.

राजापेठ ह्दीतील एका कॉलनीतील ती तरुणी मागील दोन वर्षांपासून नीटची परीक्षा देत होती. दरवेळी यश तिला हुलकावणी देत होते. यंदाही सप्टेंबरमध्ये तिने परीक्षा दिली. रात्रीचा दिवस करीत पूर्वतयारी केली. ७५० गुणांची परीक्षाही चांगल्या प्रकारे पार पडली. यादरम्यान १ नोव्हेंबर रोजी निकाल आला. समाधानकारक स्कोअर न आल्याने ती नखशिखांत हादरली. आता आपले डॉक्टर होण्याचे स्वप्न भंगले, सर्व काही संपले, असा आतातायी विचार करून तिने स्वत:ला संपविले.

२ नोव्हेंबर रोजी दुपारी ‘लक्ष्मी’ (नाव बदललेले) ला तिच्या वडिलांनी नीटच्या निकालाविषयी विचारणा केली. त्यावर यायचा आहे, असे सांगून ती आंघोळीसाठी बाथरूममध्ये गेली. खूप वेळ झाल्यानंतरही ती बाहेर न आल्याने लहान बहिणीने तिला हाक दिली. मात्र, आतून प्रतिसाद आला नाही. बाथरूमचे दार थोडे उघडे असल्याने डोकावण्याचा प्रयत्न केला, तर ती शॉवरला गळफास घेतलेल्या अवस्थेत ती दिसली. मोठ्या बहिणीला तसे बघितल्यानंतर धाकटीने आरडाओरड केली. आईवडीलही धावले. मात्र, तोपर्यंत सारे काही संपले होते.

उपचारादरम्यान मृत्यू

आईवडिलांनी तिला गळफास घेतलेल्या स्थितीतून खाली काढून जवळच्या एका खासगी रुग्णालयात हलविले. मात्र, तिचा उपाचारादरम्यान मृत्य झाला. तसा अहवाल तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला. याबाबत राजापेठ पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. अगदी धनत्रयोदशीच्या दिवशी मुलीच्या रूपाने ‘लक्ष्मी’नेच अकाली एक्झिट घेतल्याची अनावर भावना त्या कुटुंबात होती. राजापेठचे एएसआय सतीश रायचंद यांनी पंचनामा केला व तिचे पार्थिव उत्तरिय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविले.

टॅग्स :Deathमृत्यू