शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर साळवींना उमेदवारी नाकारल्याने शिवडीत ठाकरे गटात नाराजी, राजीनामा देण्याची तयारी
2
महायुतीचा २७८ जागांचा फॉर्मुला ठरला; देवेंद्र फडणवीसांनी काढला मविआला चिमटा
3
काँग्रेसची ४८ जणांची पहिली उमेदवार यादी जाहीर; अनेक बड्या नेत्यांचा समावेश 
4
जस्टीस संजीव खन्ना होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश; 11 नोव्हेंबरला पदभार स्वीकारणार...
5
"...तर मी येवल्यातून भुजबळांविरोधात निवडणूक लढवेन", सुहास कांदेंना शिंदे-फडणवीसांचा मेसेज काय?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; भाजपामधून आलेल्या तिघांना शरद पवारांनी दिली उमेदवारी
7
"त्यांचा इतिहासच गद्दारीचा, आईबापासोबतही..."; छगन भुजबळांचा कांदेंनी काढला इतिहास
8
गुलमर्गमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला, 5 जवान जखमी तर एका साथीदाराचा मृत्यू
9
अयोध्येतील 55 घाटांवर 28 लाख दिव्यांची रोषणाई; झळाळून निघणार श्रीराम जन्मभूमी...
10
'भ्रष्टाचार, गुन्हेगारी वाढली', उमेदवारी मिळताच युगेंद्र पवारांनी काकाविरोधात थोपाटले दंड
11
'मविआ'त सांगोला मतदारसंघ कोणाला? जयंत पाटील म्हणाले, "एक-दोन दिवसात..."
12
ना हडपसर, ना खडकवासला...ठाकरे गटात प्रवेश केलेले वसंत मोरेंचा पुढचा प्लॅन ठरला
13
इम्तियाज जलीलांची वेगळीच खेळी; ३ विधानसभा मतदारसंघातून घेतले अर्ज, लोकसभाही लढणार
14
NCP SP Candidate List : राष्ट्रवादी काँग्रेसची (शरद पवार) पहिली यादी जाहीर! कोणाची नावे?
15
पुण्यात ठाकरे गट बंडखोरी करणार?; हडपसर जागेवर राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला, तर...
16
कोरेगावमधून शशिकांत शिंदे; कऱ्हाड दक्षिणमधून अतुल भोसले यांनी भरला अर्ज 
17
शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर; मराठवाड्यात कुणाला संधी? पाहा...
18
बारामतीत हाय व्होल्टेज सामना रंगणार: शरद पवारांकडून युगेंद्र पवारांना उमेदवारी; अजितदादांना भिडणार!
19
शिवडीत अजय चौधरींनाच पुन्हा उमेदवारी; मातोश्रीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा निर्णय
20
"मला प्रेम करायचंय..."; वयाच्या २२ व्या वर्षीच 'या' अभिनेत्रीने केलंय फॅमिली प्लॅनिंग

४० दिवसात सहा वेळा गारपिटचा मार, पाच हजार हेक्टर बाधित

By गजानन उत्तमराव मोहोड | Published: April 26, 2023 3:54 PM

सात कोटींच्या शासन मदतनिधीची मागणी 

अमरावती : जिल्ह्यात १८ मार्च ते २५ एप्रिल या कालावधीत तब्बल सहावेळा विजा, वादळासह अवकाळी व गारपिटीने जिल्ह्यास दणका दिला आहे. या नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावल्या गेला आहे. या आपत्तीमुळे पाच हजार शेतकऱ्यांच्या चार हजार हेक्टरमधील रबी, भाजीपाला व फळपिकांचे मोठे नुकसान झालेले आहे.

खरिपाचा हंगाम अतिपावसाने वाया गेल्याने शेतकऱ्यांची मदार रब्बी पिकांवर होती व गहू, हरभरा, कांदा पिके काढणीला असतांनाच १६ मार्चपासून जिल्ह्यात अवकाळीला सुरुवात झालेली आहे. यामध्ये विजांसह वादळही असल्याने मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये जिल्ह्यात दोन व्यक्तींसह १५ वर गुरांचा वीज पडल्याने मृत्यू झालेला आहे. याशिवाय एक हजारांवर घरांची पडझड झाल्याने संसार उघड्यावर आले आहेत.

सर्वाधिक नुकसान काढणीला आलेल्या गहू पिकाचे झाले आहे. वादळामुळे गहू आडवा झाला व पावसात भिजला. याशिवाय कांद्याला पाणी लागल्याने तो जास्त दिवस साठवणूक करता येत नाही. संत्र्याच्या आंबिया बहराची फळगळ झाली. केळीचेही वादळाने नुकसान झालेले आहे. क्षेत्रिय यंत्रणांनी ३३ टक्क्यांवर नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करुन साधारणपणे सात कोटींच्या मदत निधीची मागणी जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाकडे केलेली आहे.

टॅग्स :agricultureशेतीenvironmentपर्यावरणweatherहवामानRainपाऊसAmravatiअमरावतीHailstormगारपीट