शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata Passed Away: भारताच्या उद्योगविश्वातील रत्न निखळलं! 'पद्मविभूषण' रतन टाटा कालवश, देशाची मोठी हानी
2
Ratan Tata Passed Away : “मोठं स्वप्न पाहणं अन् दुसऱ्यासाठी दायित्वाची भावना...” PM मोदींनी या शब्दांत वाहिली टाटांना श्रद्धांजली
3
Ratan Tata Death: ज्ञानी-दानी अन् स्वाभिमानी 'भारत रतन'; देश गहिवरला, मान्यवरांची रतन टाटांना श्रद्धांजली
4
भारताच्या 'रत्ना'ची कहाणी, टाटामध्ये असिस्टंट म्हणून सुरू केलेला प्रवास; नंतर कंपनीला बनवला आंतरराष्ट्रीय ब्रँड
5
Ratan Tata Death: गडकरींची टाटांना आदरांजली: देशाने संवेदनशील उद्योजक-समाजसेवक गमावल्याची व्यक्त केली भावना
6
Ratan Tata News : रतन टाटांना मिळालं अपार प्रेम, ३८०० कोटींच्या मालकानं कशी बनवली कोट्यवधी लोकांच्या मनात जागा
7
Ratan Tata: एका कुटुंबाचा उद्योग ते 'देशाचा विश्वास'! रतन टाटांनी असं उभारलं 'जगात भारी' व्यवसाय साम्राज्य
8
नाशिकच्या नेहरु वनोद्यानाने रतन टाटा यांना घातली होती भुरळ; राज ठाकरे यांना म्हणाले होते, हा तर इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट...!
9
Ratan Tata News: ७९ व्या वाढदिवशी टाटा पोहोचले होते संघ मुख्यालयात; नेमकं काय घडलं होतं?
10
महाराष्ट्राच्या फायद्यासाठी हरयाणाची पुनरावृत्ती करा; अजित पवार यांचं राज्यातील जनतेला आवाहन
11
OBC यादीत महाराष्ट्रातील काही जातींचा समावेश होणार; राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची केंद्र सरकारला शिफारस
12
IND vs BAN : विक्रमी विजयासह टीम इंडियाच्या नावे झाली आणखी एक मालिका
13
महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये हरियाणाच्या निकालाची पुनरावृत्ती होणार; चंद्राबाबू नायडूंचे भाकित
14
Nitish Reddy अन् Rinku Singh ची दमदार फिफ्टी, टीम इंडियाच्या नावे झाले २ मोठे विक्रम
15
पराभव जिव्हारी, निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर काँग्रेस नेते म्हणाले- 'EVM शी छेडछाड...'
16
लेडी सिंघम..!! काजोलच्या हॉट अन् डॅशिंग लूकवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा, पाहा Photos
17
महाराष्ट्र जिंकणं काँग्रेससाठी सोपं नाही, हरयाणाच्या निकालामधून शिकावे लागतील हे धडे
18
‘वंचित’चा सातारा जिल्ह्यातील पहिला उमेदवार जाहीर; माणमध्ये इम्तियाज नदाफ 
19
"इतिहास माझ्या कारकीर्दीचं मूल्यमापन कसं करेल?"; CJI चंद्रचूड नक्की काय म्हणाले?
20
Shafali Verma चा मोठा पराक्रम; श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात गाठला मैलाचा पल्ला

आंतरजिल्हा बदलीची दीडशे प्रकरणे मार्गी लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2016 12:22 AM

आंतरजिल्हा बदली प्रक्रिया तत्काळ मार्गी लावण्यासाठी सुरू असलेल्या उपोषणाची प्रहार शिक्षक संघटनेचे संस्थापक...

आश्वासन : बच्चू कडूंच्या मध्यस्तीने उपोषण सुटलेअमरावती : आंतरजिल्हा बदली प्रक्रिया तत्काळ मार्गी लावण्यासाठी सुरू असलेल्या उपोषणाची प्रहार शिक्षक संघटनेचे संस्थापक तथा आ. बच्चू कडू यांच्या मध्यस्तीने सोमवारी उपोषणाची सांगता करण्यात आली. येत्या डिसेंबरअखेर जिल्ह्यातील रिक्त असलेल्या दीडशे पदांवर पदस्थापना देण्यात येतील, असे लेखी आश्वासन उपायुक्त राजाराम झेंडे यांच्या उपस्थितीत शिक्षणाधिकारी श्रीराम पानझाडे यांनी प्रहार शिक्षक संघटनेला दिले. आंतरजिल्हा बदली प्रश्नावर मागील सहा दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणामुळे आंतरजिल्हा बदलीने दीडशे शिक्षकांची रिक्त पदे भरण्याचे अखेर शिक्षण विभागाने लेखी स्वरूपात मान्य केले. प्रहार शिक्षक संघटनेचे राज्य समन्वयक महेश ठाकरे यांच्या नेतृत्वात आंतरजिल्हा बदलीच्या मागणीकरिता विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. या आंदोलनाची दखल घेत आ.कडू यांनी शिक्षकांच्या मागणीबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली. डिसेंबरअखेर जिल्ह्यातील रिक्त दीडशे पदांवर पदस्थापना देण्यात येणार असल्याचे चर्चेत स्पष्ट झाल्याने आंतरजिल्हा बदलीग्रस्त शिक्षकांनी जल्लोष साजरा केला. यावेळी आमदार बच्चू कडूंसोबत प्रहार जिल्हा संपर्कप्रमुख प्रदीप वडतकर, दीपक धोटेंसह प्रहारचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)