शहरं
Join us  
Trending Stories
1
जयश्री थोरातांवर बोलताना भाजपा नेत्याची जीभ घसरली; संगमनेरमध्ये तणाव, वाहनांची तोडफोड
2
तुला नाउमेद करणार नाही; उद्धव ठाकरेंचा नाराज सुधीर साळवींना शब्द, शिवडीतील बंड थंड
3
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, पाहा कुणाला संधी?
4
काँग्रेसला कमी जागा मिळाल्याने राहुल गांधी नाराज; नाना पटोलेंनी सांगितले बैठकीत काय झालं?
5
बंडखोरी जिव्हारी; फक्त अजित पवारच नाही, शरद पवारांच्या हिटलिस्टमध्ये राष्ट्रवादीचे 'हे' 10 नेते
6
इन आँखो की मस्ती में... बॉलिवूड गाजवणाऱ्या मराठमोळ्या मृणाल ठाकूरचं 'रॉयल' फोटोशूट (Photos)
7
मेहबूब शेख यांच्या उमेदवारीमागे वेगळीच शंका; माजी आमदारांसह १५० पदाधिकाऱ्यांचा राजीनामा
8
पदयात्रेदरम्यान अरविंद केजरीवालांवर हल्ला; AAP चा दावा, भाजपवर हल्ल्याचा आरोप
9
Maharashtra Assembly election 2024: काटोलमध्ये महाविकास आघाडीत, तर उमरेडमध्ये महायुतीत बंडखोरी
10
कागलमध्ये राडा! मुश्रीफ आणि घाटगे समर्थक भिडले; एकमेकांची कॉलर पकडून हाणामारी
11
महायुतीत भाजपच मोठा भाऊ! साताऱ्यातील आणखी एक मतदारसंघ मिळण्याचे प्रयत्न
12
मनसेकडून पाच नावांची घोषणा, चौथ्या यादीत कोणत्या मतदारसंघात उतरवले उमेदवार?
13
आता खरी 'कसोटी'! बंगळुरू-पुणे मार्गावर खडतर प्रवास; भारत WTC फायनलमध्ये पोहोचणार?
14
महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? 'या' 12 जागांचा वाद कायम, तिन्ही पक्षांचा दावा...
15
भायखळ्यात यामिनी जाधवांविरोधात ठाकरेंचा शिलेदार ठरला; कोण आहेत मनोज जामसुतकर?
16
"आम्हाला ५ जागा द्या, अन्यथा २५ जागांवर लढणार’’, मित्रपक्षाचा मविआला इशारा 
17
मृत्यू केव्हा गाठणार? एका रिपोर्टवर AI टूल करते भविष्यवाणी; लोकांच्या हॉस्पिटलमध्ये लागल्यात रांगा
18
जबरदस्त! Whatsapp मध्ये येणार कमाल फीचर; मोबाईल न वापरता मॅनेज करू शकता कॉन्टॅक्ट्स
19
Maharashtra Assembly Election: दिंडोशीत सुनील प्रभूंविरोधात शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार कोण?

हृदयद्रावक! दर ३० तासांत एक शेतकरी कवटाळतोय मृत्यूला; सर्वाधिक शेतकरी आत्महत्या अमरावती जिल्ह्यात

By गजानन उत्तमराव मोहोड | Published: July 16, 2023 6:45 PM

अमरावती जिल्ह्यात वर्षभरात कमी झालेले शेतकरी आत्महत्याचे सत्र पुन्हा वाढले आहे.

अमरावती: जिल्ह्यात वर्षभरात कमी झालेले शेतकरी आत्महत्याचे सत्र पुन्हा वाढले आहे. यंदाच्या सहा महिन्यांत तब्बल १५२ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. अस्मानी अन् सुलतानी संकटाचे हे शेतकरी बळी ठरले आहेत. पश्चिम विदर्भात सर्वधिक शेतकरी आत्महत्याअमरावती जिल्ह्यात होत असल्याचे धगधगते वास्तव आहे.

नैसर्गीक आपत्ती, नापिकी, दुष्काळ, कर्ज, आजारीपण, मुलामुलींचे शिक्षण, मुलींचे लग्न आदी कारणांंमुळे धीर खचून दर ३० तासांत एक शेतकरी मृत्यूचा घोट घेत आहे. गतवर्षी बुलडाणा व यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण जास्त होत होते. यंदाच्या सहा महिन्यांत अमरावती जिल्ह्यात आत्महत्यांचे प्रमाण फेब्रुवारी महिना वगळता वाढतेच आहे. शासन- प्रशासनाचे या दुर्दैवी घटनांकडे मात्र दुर्लक्ष असल्याने शेतकऱ्यांच्या संघर्षावर नैराश्य मात करीत आहे.

जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांची नोंद जानेवारी २००१ पासून घेण्यात येते. या दरम्यान जिल्ह्यात ५०९४ शेतकऱ्यांनी मृत्यूचा फास ओढला आहे. यामध्ये २५८८ प्रकरणे शासन मदतीसाठी पात्र ठरली तर २४६३ अपात्र ठरली आहे. याशिवाय ४३ प्रकरणे अद्यापही चौकशीकरिता प्रलंबित आहेत. 

टॅग्स :Amravatiअमरावतीfarmer suicideशेतकरी आत्महत्या