शहरं
Join us  
Trending Stories
1
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
2
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
3
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
4
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 
5
माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
6
साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ
7
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं
8
परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस
9
अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र
10
देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?
11
मनोजराव कोणालाही भेटायचे नाही, तब्यतेची काळजी घ्या; संभाजीराजेंचा मनोज जरांगे यांना सल्ला
12
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदींनी फोन करून केले अभिनंदन
13
विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट किती जागा जिंकणार? NCP चा इंटरनल सर्व्हे सर्वांनाच चकित करणारा!
14
264 धावा नव्हे...; रोहित शर्माच्या नावावर याहूनही एक मोठा विक्रम! मोडणे एखाद्या स्वप्नासारखे
15
बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती
16
चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट
17
"भाजपचे सरकार आल्यास PoK जम्मू-काश्मीरमध्ये सामील होईल", योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आश्वासन
18
आता सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
19
धक्कादायक! सासूचा रुग्णालयात मृत्यू; जावयाने मृतदेह घेऊन गाठली बँक, केली पैशांची मागणी...
20
"मोदी खूप शक्तिशाली आहेत, अमाप पैसा आहे, पण...", अरविंद केजरीवालांचा निशाणा

पावसाची दमदार हजेरी, सिंचन प्रकल्पातील पाणीसाठ्यात वाढ होण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 4:10 AM

अमरावती/ संदीप मानकर दहा दिवस पावसाने दडी मारल्यानंतर पुन्हा गुरुवारपासून मान्सून सक्रिय झाला आहे. पश्चिम विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुन्हा ...

अमरावती/ संदीप मानकर

दहा दिवस पावसाने दडी मारल्यानंतर पुन्हा गुरुवारपासून मान्सून सक्रिय झाला आहे. पश्चिम विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुन्हा पावसाने हजेरी लावल्यामुळे ५११ प्रकल्पातील पाणीसाठ्यात वाढ होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञ व जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी वर्तविली. सद्यस्थितीत ५११ मध्यम, लघु व मोठ्या प्रकल्पात सरासरी ३३.९० टक्के पाणीसाठा आहे. पावसाने दडी मारली होती. तेव्हा सिंचन प्रकल्पातील पाणीसाठ्यात काही प्रमाणात घट झाली होती.

सद्यस्थितीत नऊ मोठ्या प्रकल्पात ३८.३१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. २५ मध्यम प्रकल्पात ३८.४८ टक्के पाणीसाठा असून ४७७ लघु प्रकल्पात २५.६१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. १० जुलै रोजीच्या जलसंपदा विभागाच्या अहवालानुसार, ५११ प्रकल्पाची प्रकल्पीय संकल्पित उपयुक्त पाणीसाठा हा ३२८३.६० दलघमी आहे. मात्र, आजचा उपयुक्त पाणीसाठा १११३.०४ टक्के आहे. त्याची सरासरी टक्केवारी ही ३३.९० टक्के आहे. यंदा १ जुलै नंतर दमदार पावसाची आवश्यकता असताना ९ जुलैपर्यंत पाऊस थांबला होता. त्यामुळे यंदा प्रकल्पांची पातळी फारशी वाढली नाही. सध्या पिण्याच्या पाण्याची जरी चिंता नसती तरीही सिंचनासाठी प्रकल्प शंभर टक्के भरणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

बॉक्स

नऊ मोठ्या प्रकल्पात सध्या पाणीसाठा

अमरावती शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या उर्ध्व वर्धा प्रकल्पात ४५.०७ टक्के पाणीसाठा आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पूस प्रकल्पात ३७.५१ टक्के, अरुणावती ३२.४९ टक्के, बेंबळा ५८.५० टक्के, अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा प्रकल्पात २७.१३ टक्के, वान २९.७९ टक्के, बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा प्रकल्पात २८.३८ टक्के, पेनटाकळी २९.३३ टक्के, खडकपूर्णा ०० टक्के पाणीसाठा आहे. अप्पर वर्धा प्रकल्पाच्या परिसरत शनिवारी ०९ मीमी पावसाची नोंद झाली तर आतापर्यंत १९७ मीमी पावसाची नोंद झाली.

कोट

आठ ते दहा दिवस पावसाने दडी मारली. आता १६ जुलैपर्यंत विदर्भात पाऊस आहे. त्यामुळे सिंचन प्रकल्पातील पाणीसाठ्यात वाढ होईल. त्याचा सर्वाधिक फायदा लघु व मध्यम प्रकल्पांना होईल.

- अनिल बंड, हवामानतज्ज्ञ, अमरावती