शहरं
Join us  
Trending Stories
1
...त्यामुळे एकनाथ शिंदेंना दोष देता येणार नाही; अमित ठाकरे राजकीय उलथापालथीवर रोखठोक बोलले!
2
NCP: अजित पवारांकडून आदेशाचे उल्लंघन, शरद पवार गटाने दिले पुरावे; सुप्रीम कोर्टाने दिला इशारा
3
Vidhan Sabha Election 2024: लोकसभेला बसला फटका; आता 'तुतारी'चा वेगळ्या पद्धतीने प्रचार
4
महायुतीच्या बंडखोरांवर अमित शाहांचे लक्ष; शिंदे-फडणवीस-पवारांना दिल्या विशेष सूचना...
5
शरद पवारांचा शब्द उद्धव ठाकरे पाळणार?; सांगोला मतदारसंघावरून हायव्होल्टेज ड्रामा
6
भयंकर! ३ महिने लेकाने घरातच ठेवला आईचा मृतदेह, शेजाऱ्यांना संशय आला अन् झाली पोलखोल
7
ज्या माणसानं 'घड्याळ' बनवलं त्यानं सेल काढून टाकलेत; रोहित पाटील विरोधकांवर कडाडले
8
माजी आमदाराला १०० ग्रॅम हेरॉईन विकताना पकडले; कारने पळताना भाच्याने पोलिसालाही उडविले
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सुनावणी आधीच बदलला राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेरील बोर्ड; नेमकं कारण काय?
10
पुण्याच्या मैदानात Washington Sundar चा जलवा! न्यूझीलंडचा पहिला डाव २५९ धावांत आटोपला
11
बिग बॉसमधून कधी बाहेर यायचं हे आधीच ठरलं होतं? गुणरत्न सदावर्तेंचा मोठा गौप्यस्फोट
12
उमेदवारी अर्ज दाखल करायला जाताना भुजबळांचं जोरदार शक्तीप्रदर्शन, हाती घेतला भाजपचा झेंडा; म्हणाले...
13
यशस्वी डाव! वॉशिंग्टनची 'सुंदर' गोलंदाजी; चेंडू कसा वळला ते रचिनसह टॉमलाही नाही कळलं (VIDEO)
14
सीएम ओमर अब्दुल्लांनी घेतली गृहमंत्री अमित शाहांची भेट, कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
15
एक आयडिया आणि आई-मुलाची जोडी ठरली सुपरहिट; वर्षाला करतात ५० लाखांची कमाई
16
अखेर ठरलं! अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा २'ची प्रतीक्षा संपली, डिसेंबरमध्ये 'या' दिवशी प्रदर्शित होणार सिनेमा
17
Gold Silver Rates Today : सोन्या-चांदीच्या तेजीला ब्रेक, १४४२ रुपयांनी स्वस्त झाली चांदी; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
18
इथे ठाकरे गटाशी युती तोडली, तिथे संभाजी ब्रिगेडचे नेते मनोज जरांगेंच्या भेटीला; चर्चांना उधाण
19
“आदित्य राजकारणात आले, त्याचा जास्त आनंद राज ठाकरेंना झाला”; मनसे नेत्यांनी सांगितली आठवण
20
"लढायचे नाही म्हणाले त्यांनाच उमेदवारी"; भांडूपमध्ये करेक्ट कार्यक्रम झाल्यानंतर मनसे नेत्याचा राजीनामा

अमरावती, वर्धा जिल्ह्यांतील आठ तालुक्यांत अतिवृष्टी, नदी-नाल्यांना पूर; तिवशात ४० जणांचे ‘रेस्क्यू’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2022 10:28 AM

सोमवारी मध्यरात्री झालेल्या दमदार पावसाने अमरावती आणि वर्धा जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे.

अमरावती/वर्धा : सोमवारी मध्यरात्री झालेल्या दमदार पावसाने अमरावती आणि वर्धा जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली असून, पावसाच्या पाण्यात अडकलेल्यांना प्रशासनाने सुखरूप बाहेर काढले आहे. शेतात पाणी साचले असून, पेरण्या दडपण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अमरावती जिल्ह्यातील पूर्णा प्रकल्पाचे सर्व नऊ दरवाजे उघडण्यात आले.

अमरावती, तिवसा, मोर्शी व धामणगाव तालुक्यांत अतिवृष्टीची नोंद झाली. जिल्ह्यात सरासरी २५.७ मिमी पाऊस झाल्याने खरिपाला दिलासा मिळाला. आता थबकलेल्या तीन लाख हेक्टरमधील पेरण्या गतिमान होणार आहेत. २३ महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्याने नदी-नाल्यांना पूर आला व काही गावात पावसाचे पाणी शिरले. तिवसा आठवडी बाजारात हर्रासाकरिता आलेले ४२ व्यापारी व विक्रेते पुराच्या पाण्यात अडकल्याने जिल्हा शोध व बचावकार्य करीत सुखरूप बाहेर काढले. जोरदार पावसात ५० पेक्षा अधिक घरांची पडझड झाली. माजी पालकमंत्री आमदार यशोमती ठाकूर यांनी नुकसान झालेल्या भागांची पाहणी केली असून, तत्काळ पंचनामे करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.

देवळी-नांदुरा मार्गावरील पूल खचला....

वर्धा जिल्ह्यात वर्धा, सेलू, देवळी व आर्वी तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाल्याने उभ्या पिकांना चांगलाच फटका बसला आहे. तर देवळी-नांदुरा मार्गावरील पूल क्षतीग्रस्त झाला आहे. आर्वी तालुक्यातील देऊरवाडा या गावातील सखल भागातील ११० घरांत पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तब्बल ५४ गावांना अतिवृष्टीचा फटका बसला असून, ९९६ हेक्टरवरील शेतपिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले.

टॅग्स :RainपाऊसfloodपूरweatherहवामानAmravatiअमरावतीwardha-acवर्धाVidarbhaविदर्भ