शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

जिल्ह्यात सुरक्षितता कितपत ? वर्षभरात बलात्कार विनयभंगाचे ३८३ एफआयआर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 11:09 IST

शाळकरी मुली लक्ष्य : वर्षभरातील अपहरण, अत्याचार उघडकीस

प्रदीप भाकरे लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : शहर असो वा जिल्ह्याचा ग्रामीण भाग, अल्पवयीन मुली तथा कॉलेजवयीन मुलींचा पाठलाग, विनयभंग व अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. शहर वा जिल्ह्यात मुली, महिला किती सुरक्षित आहेत, असा प्रश्न समाजाला भेडसावू लागला आहे. कौटुंबिक कलहदेखील पोलिस ठाण्यात पोहोचत आहेत. सोबतच काही अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेण्यासह त्यांच्यावर अकाली मातृत्व लादल्याच्या घटनादेखील उघड झाल्या आहेत. सोशल मीडियाचा अतिवापर कॉलेजवयीन मुलींच्या पाठलागास, विनयभंगास, बलात्कारास कारणीभूत ठरत आहे.

चार महिन्यांपूर्वी शिरखेड व तिवसा पोलिस ठाण्यांच्या हद्दीत दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या प्रयत्नांमुळे शाळकरी मुली नराधमांचे सॉफ्ट टार्गेट ठरत असल्याचे चित्र आहे. यंदाच्या पहिल्या ११ महिन्यांत बलात्कारातून १५ पेक्षा अधिक अल्पवयीन मुलींवर अकाली गर्भारपण लादण्यात आले. सोशल मीडियातून झालेली ओळख, त्यातून त्या अनोळखी व्यक्तीप्रति निर्माण झालेले आकर्षण तसेच लग्नाच्या आमिषापोटी अनेक मुलींना शारीरिक अत्याचाराला, अपहरणाला सामोरे जावे लागत असल्याचे निरीक्षण पोलिसांनी नोंदविले आहे. 

सोशल मीडियाच्या माध्यमातून त्रास गेल्या दीड वर्षांत घडलेल्या सायबर गुन्ह्यांमध्ये सोशल मीडियावरून होणाऱ्या गुन्ह्यांचे प्रमाण १६ टक्क्यांपेक्षा जास्त असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे फेसबूकवरून होणाऱ्या गुन्ह्यांच्या तक्रारींचे प्रमाण सर्वाधिक आहे. सोशल मीडियावरील वाढत्या सायबर गुन्ह्यांमुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. सोशल मीडियावरून वेगवेगळ्या पद्धतीने तरुणींना त्रास दिल्याबाबतचे अर्ज सायबर सेलकडे येत आहेत. या अर्जाचा तपास केल्यानंतर या गुन्ह्यांमधील आरोपी पीडित तरुणीच्या ओळखीचे किंवा जवळचे असल्याचे दिसून येते.

बलात्कार, विनयभंगाचे ३८३ गुन्हे ग्रामीण जिल्ह्यात यंदाच्या जानेवारी ते नोव्हेंबर दरम्यान महिलांवरील अत्याचार व विनयभंग असे एकूण ३८३ गुन्हे नोंदविण्यात आले. सर्व गुन्ह्यांचा उलगडा करण्यात आला. यंदा अल्पवयीन मुला-मुलींच्या अपहरणाचे एकूण २०२ गुन्हे नोंदविण्यात आले. पैकी १७४ मुला-मुलींचा शोध घेण्यात आला आहे. यंदाच्या ११ महिन्यांत बलात्काराचे ११७, तर विनयभंगाचे २६६ गुन्हे नोंदविण्यात आले.

गतवर्षीच्या ११ महिन्यांत अशी झाली गुन्ह्यांची नोंद सन २०२३ च्या जानेवारी ते नोव्हेंबर दरम्यान महिला अत्याचाराचे १०४, तर विनयभंगाबाबत २८१ एफआयआर नोंदविले. विनयभंगाची एक घटना वगळता ३८४ एफआयआरमधील सर्व आरोपींना अटक करण्यात आली.

"विनयभंग, छेडछाडीचे प्रकार रोखण्यासाठी दामिनी पथके, महिला पथकेदेखील कार्यान्वित करण्यात आली आहेत. धरण व निर्जनस्थळी गस्तदेखील वाढविण्यात आली आहे. असे गुन्हे तातडीने दाखल करून तपास केला जातो." - किरण वानखडे, पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा

टॅग्स :AmravatiअमरावतीCrime Newsगुन्हेगारी