शहरं
Join us  
Trending Stories
1
नसराल्लाह मारला गेला? हिजबुल्लाहच्या मुख्यालयावर इस्रायलचा मोठा हल्ला
2
"मला क्लीन चिट मिळाल्यामुळेच चांदीवाल आयोगाचा अहवाल दडवला", अनिल देशमुखांचा शिंदे सरकारवर आरोप
3
सरकारची मोठी कारवाई, Aadhaar आणि PAN Card चा डेटा लीक करणाऱ्या ३ वेबसाइट्स ब्लॉक! 
4
Ujjain Mahakal Temple Wall Collapse: उज्जैनच्या महाकाल मंदिराजवळ मोठी दुर्घटना! मुसळधार पावसाने भिंत कोसळली, दोघांचा मृत्यू
5
'त्या' दोन अल्पवयीन मुलींवर आणखी ७ जणांनी अत्याचार केल्याचे उघड!
6
शून्य मोजून थकाल; भारतात लॉन्च झाली Rolls-Royce ची सर्वात महागडी कार, किंमत तब्बल...
7
Rohit Sharma Team India, IND vs BAN 2nd Test: "रोहित शर्माला ही आकडेवारी दाखवा..."; माजी मुंबईकर क्रिकेटर संतापला
8
भारताने कलम 370 लागू करावी; संयुक्त राष्ट्राच्या मंचावर शाहबाज शरीफ यांनी गरळ ओकली
9
"दलित समाजाचा मुख्यमंत्री व्हावा", कुमारी सैलजा यांचा पुन्हा मुख्यमंत्रीपदावर दावा
10
सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दलाल महिलेला ठाणे येथून अटक; तीन पिडित तरुणींची सुटका
11
Giriraj Singh : केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांना जीवे मारण्याची धमकी, पाकिस्तानातून आला व्हॉट्सॲप कॉल
12
An Se-young Shocking Revelations, Paris Olympics 2024: "मला त्यांनी अंतर्वस्त्रे धुवायला लावली"; ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट खेळाडूचा आरोप
13
"ती म्हणाली मला तुझ्यासोबत वेळ घालवायचाय", युवीने सांगितला अभिनेत्रीसोबतचा किस्सा अन् मोठा खुलासा
14
"PM ज्याच्यावर घोटाळ्याचा आरोप करतात, त्याला DCM बनवतात", केजरीवाल यांचा सभागृहातून हल्लाबोल
15
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात एफआयआर दाखल, MUDA प्रकरणात पोलिसांची कारवाई! 
16
ना तिकीट, ना रिझर्व्हेशन, भारतामधील एकमेव ट्रेन, जिच्यामधून करता येतो मोफत प्रवास
17
महाराष्ट्रात हजारो जणांना ३०० कोटींचा गंडा घातला, मथुरेत साधूच्या वेशात लपला, अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
18
काँग्रेसच्या १३ बंडखोर नेत्यांवर कारवाई, ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी!
19
Ranbir Kapoor : वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी रणबीर कपूरने कामाला केली सुरुवात; आईला दिला पहिला पगार
20
अग्निवीरांसाठी खूशखबर; 'ब्रह्मोस'मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, कंपनी देणार आरक्षणाचा लाभ

रिपाइं ऐक्य फसवे; घोडे, गाढव एकत्र बांधणे अशक्य - आनंदराज आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2022 1:41 PM

''सध्याचे सत्ताधारी हे सत्ता टिकविण्यासाठी कोणत्याही थराला जायला तयार''

अमरावती : रिपाइं ऐक्याचे यापूर्वी अनेकवेळा प्रयोग करण्यात आले. परंतु, या ऐक्यावर माझा विश्वास नाही. ही शुद्ध फसवणूक आहे. कारण घोडे, गाढव हे एकाच ठिकाणी एकत्र आणणे, हे अशक्य आहे. नेत्यांना एकत्र आणण्यापेक्षा समाजाला एका जागी आणण्यावर माझा विश्वास असल्याचे मत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आनंदराज आंबेडकर यांनी व्यक्त केले. ते रिपब्लिकन सेनेच्या विभागीय कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित करण्यासाठी रविवारी अमरावती शहरात आले होते. यावेळी पत्रकार परिषदेत त्यांनी आपली रोखठोक भूमिका मांडली.

आनंदराज आंबेडकर हे पहिल्यांदाच अमरावतीमध्ये आले होते. शहरातील विविध सामाजिक संघटनांनी त्यांचे शासकीय विश्रामगृह येथे भेटी घेत स्वागत केले. यानंतर पत्रकार परिषदेला संबोधित करताना आनंदराज आंबेडकर म्हणाले की, सध्या देशात अघोषित आणीबाणी आहे. सध्याचे सत्ताधारी हे सत्ता टिकविण्यासाठी कोणत्याही थराला जायला तयार आहेत. शासकीय यंत्रणेचा चुकीचा वापर करून ते विरोधकांना अडकविण्याचा प्रयत्न करत आहेत. सरकारला विरोध करणारे हे देशद्रोही अशी वागणूक सध्या देशात विरोधकांना मिळत आहे. बाबासाहेबांच्या धर्मांतराला विरोध करण्यासाठी आमच्याच मंडळींचा वापर ते करीत असल्याचे सांगत त्यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यावर निशाणा साधला.

रिपब्लिकन ऐक्यावर बोलताना आनंदराज आंबेडकर म्हणाले, यापूर्वीही रिपाइं ऐक्य झाले होते. त्याचे परिणाम आम्ही पाहिले आहेत. घोडे, गाढव, कुत्रे एकाच खोलीत एकत्र बांधणे शक्य आहे का, असा प्रतिप्रश्नच त्यांनी केला. नेत्यांना एकत्र आणण्यापेक्षा समाजाला एकत्र आणण्यासाठी काम करणार असून, आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पूर्ण ताकदीने लढविणार असल्याचे ते म्हणाले. अमरावतीमध्ये या निवडणुकीसाठी सर्व संघटना एकत्र येत असल्याचा आनंद असल्याचेही ते म्हणाले.

टॅग्स :PoliticsराजकारणRamdas Athawaleरामदास आठवलेAmravatiअमरावती