शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरेंनी आनंद दिघेंचा अपघाताआधी मागितला होता राजीनामा", कदमांचा गौप्यस्फोट
2
"सरकारच्या भरवशावर राहू नका, लाडकी बहीणमुळे..."; नितीन गडकरींचा उद्योजकांना सल्ला
3
Nepal Flood : पुराचे थैमान! नेपाळमध्ये परिस्थिती गंभीर; १७० जणांचा मृत्यू, १११ जण जखमी, ४२ बेपत्ता
4
कार अपघातात एअरबॅग उघडली पण आईच्या मांडीवर बसलेल्या २ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू
5
"भाग्यश्री आत्राम अहेरीत पराभूत होतील"; शरद पवारांच्या उमेदवाराला काँग्रेसचाच विरोध
6
ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्तींना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर
7
"केवळ ७% जीडीपी वाढ पुरेशी नाही..," RBI चे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचं बेरोजगारीबद्दल मोठं वक्तव्य
8
IND vs BAN : जबरदस्त सेटअप! कमालीच्या इन स्विंग चेंडूवर बुमराहनं उडवला रहिमचा त्रिफळा
9
‘लाडक्या बहिणीं’चे पैसे पोहोचले भावांच्या खात्यात; आणखी एक फ्रॉड, हडपले लाखो रुपये
10
खुशखबर! सुनीता विल्यम्स पृथ्वीवर लवकरच परतणार; नासाची टीम अंतराळात पोहोचली, पहिला व्हिडीओ आला समोर
11
शेअर मार्केटमध्ये मोठी गॅप डाऊन ओपनिंग; निफ्टी सपोर्ट लेव्हलवर, भूराजकीय तणावात खरेदी करावी की नाही?
12
"कुठे गेले ते १५ मिनिटवाले...?"; आमदार नितेश राणेंचा ओवैसींवर हल्लाबोल
13
"माझी बाहुली हरवली म्हणून भोकाड पसरणारे..."; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंचा पलटवार
14
Success Story: ८००० रुपये कर्ज घेऊन सुरू केलं काम; आज ८०० कोटींच्या मालकिण, कपड्यांचा आहे मोठा ब्रँड
15
आधी संसदेत बसवताना केला होता विरोध, आता उदयनिधी यांच्या हातातच 'सेंगोल' दिसले
16
तिरुपती लाडू वादावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; याचिकाकर्त्यांने सीबीआय चौकशीची मागणी केली
17
बाप बन गया रे! रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, पापाराझींसमोर व्यक्त केल्या भावना
18
सोशल मीडियात ट्रेंड करणारे 'पंखेवाले बाबा' लड्डू मुत्या स्वामी नेमके कोण आहेत?
19
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रत्येक काम आत्मविश्वासाने यशस्वीपणे पूर्ण करू शकाल
20
निवडणुका वेळेवरच ! पण अधिकाऱ्यांच्या आता बदल्या का नको...

मेरे पास सिर्फ माँ है!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2021 4:11 AM

अमरावती: कोरोनामुळे आईवडिलांचे छत्र हरपल्याने अनाथ झालेल्या बालकांच्या नावावर एकरकमी पाच लाख रुपयांची मुदत ठेव ठेवली जाईल, तसेच बालक ...

अमरावती: कोरोनामुळे आईवडिलांचे छत्र हरपल्याने अनाथ झालेल्या बालकांच्या नावावर एकरकमी पाच लाख रुपयांची मुदत ठेव ठेवली जाईल, तसेच बालक सक्षम होईपर्यंत त्याचा बालसंगोपन योजनेतून खर्च उचलण्यात येईल, असा निर्णय राज्य मंत्रीमंडळाने घेतला. त्यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहे.

ही योजना वा निर्णय दोन्ही पालक गमावलेल्या बालकांसाठी आहे. मात्र, ज्यांनी केवळ वडील गमावले, त्या पाल्यांची , त्या कुटुंबाचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कर्ता ‘बापमाणूस’ गमावल्याने ६२ बालकांवर ‘मेरे पास सिर्फ माँ है’ अशी उद्वीग्न करणारी परिस्थिती येऊन ठेपली आहे. आजही अनेक शेतकरी, शेतमजुर व खासगी काम करणाºया कुटुंबाचा कर्ता पुरूषच आहे. त्यामुळे पितृछत्र गमावलेल्या आमच्या कुटुंबाकडे सरकार लक्ष देईल का, की आमच्या मातेलाच हाडाची काडे करून आमची उपजिविका भागवावी लागेल, अशी सामुहिक आर्जव ते शासन प्रशासनाकडे करीत आहेत. कोरोनाने एक पालक गमावलेल्या बालकांची राज्यातील संख्या ५०९६ च्या घरात आहे. यामध्ये पितृछत्र हरवलेल्या मुलांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे केवळ

------------

बॉक्स

जिल्ह्यात क ोरोनाचे एकूण रूग्ण : ९३, १६८

बरे झालेले रूग्ण : ८७, ६४०

सध्या उपचार सुरू असलेले: १२७२

एकूण मृत्यू : १४७७

------------

सात जणांनी आईवडिलांचे छत्र गमावले

कोरोनाच्या दुसºया लाटेत सर्वाधिक मृत्यू झाले. तर आतापर्यंत सात बालक आईवडिलांच्या कोरोनामुळे झालेल्या मृत्यूने अनाथ झालेत.जिल्ह्यात ६२ बालकांनी पितृछत्र गमावले. तर १६ बालक ंंआईविना पोरके झाले.

---------------

बॉक्स १

शेतमजुरीशिवाय काहीच नाही

वडिल कोरोनामुळे गेले. संपुर्ण कुटुंबाची भिस्त बाबांवर, ते कामावर गेले, तर चुल पेटणार. पण कोरोनाने आमचे जगच हरविले. आता आईसह आम्हालाही शेतमजुरी करण्याशिवाय पर्याय नाही. लॉकडाऊनमुळे शेतमजुरीलाही मर्यादा आल्या. त्यामुळे आता पित्याविना सर्व जबाबदारी आईवर आली. सरकारने आम्हालाही मदत करावी, अशी प्रतिक्रिया कोरोणामुळे पिता गमावलेल्या बालकाने दिली.

----------

आभाळच फाटले, कुठे शिवायचे?

माझे आईवडील एकाचवेळी कोरोनाबाधित झाले. दोघांवर एकाचवेळी उपचार सुरू असताना वडिलांचे निधन झाले. घरी मी एकटाच. वडील गेल्याचे आईला डिस्चार्जनंतर सांगितले. पित्याच्या अकाली निधनाने आभाळच फाटले. मात्र, काय जगावेच तर, लागणारच. आईला घेऊन झगडतो आहे, जगतो आहे. शासन प्रशासनाने मदत केली. तर उत्तमच. जगणे सुकर होईल, अशा आशावाद एका बालकाने व्यक्त केला.

---------

आता कुटुंबासोबत शेती

पितृछत्र हरपल्याने आता आईसोबत घरी असलेली अत्यल्प शेती करण्याशिवाय पर्याय नाही. शिकण्याच्या वयात आता आईला, घराला आधार देण्याची बिकट स्थिती येऊन ठेपली आहे. काही ंसामाजिक संघटनांनी मदतीचे आश्वासन दिले आहे. ते केव्हा पुर्ण ैहोईलल माहित नाही, पण सध्या दोन वेळच्या जेवनाची सोय शेती कसूनच होईल. सरकारने आम्हा बाप गमावलेल्यांनाही मदत करावी.

--