शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
3
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
4
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
5
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
6
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
7
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
8
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
9
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
10
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
11
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
12
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
13
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
14
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
15
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
16
Badlapur Case Accused Akshay Shinde: बदलापूर शालेय मुलींवर अत्याचार प्रकरण: मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा आत्महत्येचा प्रयत्न; प्रकृती गंभीर
17
विशेष लष्करी रेल्वे गाडीखाली स्फोटके ठेवल्या प्रकरणी RPF ने एकाला घेतले ताब्यात
18
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
19
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
20
इस्रायलचे हिजबुल्लाहच्या अनेक ठिकाणांवर हवाई हल्ले, 100 ठार तर 400 जखमी

"चेंगराचेंगरीत मृत्यू पावलेले श्रीसदस्य जिवंत होणार असतील तर हनुमान चालिसा म्हणेन"

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2023 3:57 PM

सुषमा अंधारे अमरावती दौऱ्यावर असताना आयोजित सभेत त्यांनी केंद्र आणि राज्यातील भाजपा सरकारला लक्ष्य केलंय

अमरावती - महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यात हनुमान चालिसा पठण करण्यावरुन चांगलाच गदरोळ झाल्याचं पाहायला मिळालं होतं. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी मातोश्री बंगल्यासमोर जाऊन हनुमान चालिसा पठण करणार असल्याचं जाहीर केलं. त्यानंतर, शिवसैनिकांनी त्यांच्या मुंबईतील घराबाहेर गर्दी केली होती. त्यांच्या घरावर मोर्चा काढला होता. तेव्हापासून हनुमान चालिसा हा राष्ट्रीय मुद्दा बनल्याचं पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे खासदार श्रीकांत शिंदे यांनीही संसदेच्या पावसाळी अधिवेशनात चक्क सभागृहातच हनुमान चालिसा म्हणून दाखवली. आता, त्यावरुन शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी थेट अमरावतीतून प्रश्न उपस्थित केले आहेत. 

सुषमा अंधारे अमरावती दौऱ्यावर असताना आयोजित सभेत त्यांनी केंद्र आणि राज्यातील भाजपा सरकारला लक्ष्य केलंय. यावेळी, हनुमान चालिसेच्या मुद्द्यावरुन नवनीत राणांनाही त्यांनी निशाणा बनवलं. ''सरकारला प्रश्न विचारले की आवडत नाही. सध्या कसं झालंय, मुस्लिमाने विरोधात बोललं की त्याला दहशतवादी ठरवायचं. दलितांनी विरोधात बोललं की त्याला नक्षलवादी ठरवायचं आणि इतरांनी विरोधात बोललं की त्याला देशद्रोही ठरवायंचं असं काम सुरू आहे. पण, आपण कधी प्रश्न विचारतोय का?'' असा सवाल शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला. 

खासदार श्रीकांत शिंदेंनी लोकसभा सभागृहात हनुमान चालिसा म्हटली. पण, हनुमान चालिसा म्हटल्याने भारतातील किती प्रश्न सुटले?. हनुमान चालिसा म्हटल्याने श्री सदस्यांच्या चेंगराचेंगरीचा प्रश्न उपस्थित झाला नसता, ते सदस्य जर जिवंत होणार असतील तर मी दररोज सकाळ, दुपार आणि संध्याकाळ हनुमान चालिसा म्हणायला तयार आहे. जर, हनुमान चालिसा म्हटल्याने समृद्धी महामार्गावरील २७ जीव परत येणार असतील, तर निश्चितपणे आम्ही श्रीकांत शिंदेंच्या हनुमान चालिसेच्या समर्थनार्थ आहोत, हनुमान चालिसा म्हटल्याने मणिपूरमध्ये जे घडलं ते रिव्हर्स करुन ओक्के आणि दुरुस्त होत असेल तर हनुमान चालिसेचं स्वागत करू. पण, कुठली गोष्ट तुम्ही कुठे नेताय? असा प्रश्नही सुषमा अंधारेंनी अमरावतीमधील सभेत विचारला. 

जिथे लोकप्रतिनिधींनी लोकांचे प्रश्न मांडायचे असतात, तिथे लोकांचे प्रश्नच मांडले जात नाहीत. त्यामुळे, या डोक्याने तुम्ही कधीतरी हा विचार कराल का? असा प्रश्नच अंधारे यांनी उपस्थितांना विचारला. तसेच, तिकडे हनुमान चालिसा म्हणण्यापेक्षा ठाण्यातील रुग्णालयात ४ दिवसांत २७ रुग्ण दगावले, त्यावर मुख्यमंत्री आणि त्यांचे चिरंजीव का बोलत नाहीत, असेही अंधारे यांनी म्हटलं. 

टॅग्स :Sushma Andhareसुषमा अंधारेShiv SenaशिवसेनाShrikant Shindeश्रीकांत शिंदेBJPभाजपा