शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
2
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
3
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
4
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
5
घड्याळे, चष्मा, शूज, बॅग खरेदी करणे महाग होणार? 'या' वस्तूंवर लागणार १ टक्के अतिरिक्त कर
6
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
7
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
8
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
9
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
10
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...
11
सचिन तेंडुलकर झाला ५२ वर्षांचा! मास्टर ब्लास्टरचे 'हे' ५ रेकॉर्ड तोडणे जवळपास अशक्य
12
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
13
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
14
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, यू-ट्युबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
15
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
16
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
17
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
18
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
19
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
20
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स

धक्कादायक! अमरावती जिल्ह्यात वर्षात १०१९ बालकांचा मृत्यू, ३५ माता दगावल्या

By उज्वल भालेकर | Updated: June 8, 2024 21:35 IST

वर्षभरात ३२ हजार ३९४ बालकांचा झाला जन्म, ४८१ उपजत मृत्यू 

अमरावती : जिल्ह्यातील बालमृत्यू आणि कुपोषण अजूनही तितकेच गंभीर असल्याचे आरोग्य विभागाकडून प्राप्त आकडेवारीवरून स्पष्ट होते. २०२३-२४ या एक वर्षाच्या कालावधीमध्ये जिल्ह्यात १०१९ बालकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सर्वाधिक ४८१ मृत्यू हे उपजत असून, आरोग्य विभागाकडून उपजत मृत्यू रोखण्यासाठी विशेष प्रयत्न होणे गरजेचे आहे. जिल्ह्यात वर्षभरात ३२ हजार ३९४ बालकांचा जन्म झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

जिल्ह्यातील कुपोषण आणि बालमृत्यूचे प्रमाण थांबविण्यासाठी राज्य शासनाकडून विविध योजना राबविण्यात येत आहेत. विविध सामाजिक संस्थांनाही कुपोषण व बालमृत्यू रोखण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी पुरविला जातो. तरीही जिल्ह्यातील बालमृत्यूचे चक्र थांबलेले नाही. जिल्ह्यात रोज सरासरी दोन बालकांचा मृत्यू होत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. आजही मेळघाटातील नागरिकांना आरोग्याच्या अपुऱ्या सोयी-सुविधा असल्याने अनेक गंभीर बालकांना अमरावती येथे जिल्हा स्त्री रुग्णालयात रेफर करण्याचे प्रमाण अधिक आहे.

मेळघाटातील आरोग्य व्यवस्था सुधारण्याचे प्रत्येक वेळी आश्वासन मिळते. परंतु, प्रत्यक्षात कोणतीही ठोस उपाययोजना राबविण्यात येत नसल्याचे सामाजिक संघटनांचे म्हणणे आहे. जिल्ह्यातील सर्वाधिक बालमृत्यू, उपजत मृत्यू तसेच मातामृत्यूचे प्रमाण हे मेळघाटातील आदिवासी क्षेत्रातील आहे.

३५ माताही दगावल्याआरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात वर्षभरात ३५ मातांचा प्रसूतीदरम्यान मृत्यू झाला आहे. यामध्ये मेळघाटातील मातांची संख्या अधिक आहे. वेळीच उपचाराच्या सुविधा न मिळणे तसेच प्रसूतीदरम्यान जास्त रक्तस्राव होणे, शरीरात हिमोग्लोबीन कमतरता, गर्भधारण काळात योग्य आहार न मिळणे अशी अनेक कारणे माता मृत्यूला जबाबदार आहेत.

वर्षभरात ३२१६४ महिलांची प्रसूतीजिल्ह्यात २०२३-२४ या एक वर्षाच्या कालावधीमध्ये १७ हजार ७६४ नैसर्गिक, तर १४ हजार ४०० प्रसूती ही सिझेरियन असे एकूण ३२ हजार १६४ महिलांची प्रसूती झाली. यामध्ये ३२ हजार ३९४ बालकांचा जन्म झाला असून, १६ हजार ८२६ मुले, तर १५ हजार ५६८ मुलींचा जन्म झाला आहे.

ठोस उपाययोजनांची आवश्यकतामेळघाटातील बालमृत्यू व माता मृत्यू रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबविण्याची गरज आहे. शासनाने येथील अतिदुर्गम भागातील गावांमध्ये आरोग्याच्या सोयी-सुविधा पोहोेचविण्यासाठी विशेष भर देण्याची गरज आहे. येथील काही दुर्गम भागात आरोग्य उपकेंद्र बंद अवस्थेत असल्याचेच चित्र पाहायला मिळते. तसेच येथील आदिवासींमध्ये प्रसूतीसाठी रुग्णालयात येण्यासाठी समुपदेशन आवश्यक असून, मेळघाटात आरोग्य सुविधा वाढवून येथील रेफरचे प्रमाणही थांबविणे गरजेचे आहे.

वर्षभरातील बाल मृत्यू व माता मृत्यूची आकडेवारीउजपत मृत्यू : ४८१० ते १ वर्ष अर्भक मृत्यू : ४७६१ ते ५ वर्षे बालमृत्यू : ६२मातामृत्यू : ३५एकूण मृत्यू : १ हजार ५४