शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर साळवींना उमेदवारी नाकारल्याने शिवडीत ठाकरे गटात नाराजी, राजीनामा देण्याची तयारी
2
महायुतीचा २७८ जागांचा फॉर्मुला ठरला; देवेंद्र फडणवीसांनी काढला मविआला चिमटा
3
काँग्रेसची ४८ जणांची पहिली उमेदवार यादी जाहीर; अनेक बड्या नेत्यांचा समावेश 
4
जस्टीस संजीव खन्ना होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश; 11 नोव्हेंबरला पदभार स्वीकारणार...
5
"...तर मी येवल्यातून भुजबळांविरोधात निवडणूक लढवेन", सुहास कांदेंना शिंदे-फडणवीसांचा मेसेज काय?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; भाजपामधून आलेल्या तिघांना शरद पवारांनी दिली उमेदवारी
7
"त्यांचा इतिहासच गद्दारीचा, आईबापासोबतही..."; छगन भुजबळांचा कांदेंनी काढला इतिहास
8
गुलमर्गमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला, 5 जवान जखमी तर एका साथीदाराचा मृत्यू
9
अयोध्येतील 55 घाटांवर 28 लाख दिव्यांची रोषणाई; झळाळून निघणार श्रीराम जन्मभूमी...
10
'भ्रष्टाचार, गुन्हेगारी वाढली', उमेदवारी मिळताच युगेंद्र पवारांनी काकाविरोधात थोपाटले दंड
11
'मविआ'त सांगोला मतदारसंघ कोणाला? जयंत पाटील म्हणाले, "एक-दोन दिवसात..."
12
ना हडपसर, ना खडकवासला...ठाकरे गटात प्रवेश केलेले वसंत मोरेंचा पुढचा प्लॅन ठरला
13
इम्तियाज जलीलांची वेगळीच खेळी; ३ विधानसभा मतदारसंघातून घेतले अर्ज, लोकसभाही लढणार
14
NCP SP Candidate List : राष्ट्रवादी काँग्रेसची (शरद पवार) पहिली यादी जाहीर! कोणाची नावे?
15
पुण्यात ठाकरे गट बंडखोरी करणार?; हडपसर जागेवर राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला, तर...
16
कोरेगावमधून शशिकांत शिंदे; कऱ्हाड दक्षिणमधून अतुल भोसले यांनी भरला अर्ज 
17
शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर; मराठवाड्यात कुणाला संधी? पाहा...
18
बारामतीत हाय व्होल्टेज सामना रंगणार: शरद पवारांकडून युगेंद्र पवारांना उमेदवारी; अजितदादांना भिडणार!
19
शिवडीत अजय चौधरींनाच पुन्हा उमेदवारी; मातोश्रीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा निर्णय
20
"मला प्रेम करायचंय..."; वयाच्या २२ व्या वर्षीच 'या' अभिनेत्रीने केलंय फॅमिली प्लॅनिंग

दशकात शेतकरी आत्महत्यांमध्ये पहिल्यांदा दिलासा; अमरावती जिल्ह्यात ३ महिन्यात ५२ प्रकरणे 

By गजानन उत्तमराव मोहोड | Published: April 16, 2023 5:55 PM

महाराष्ट्रात अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या होतात हा डाग पुसण्याची चिन्ह आहेत. 

अमरावती : राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या होत असलेला जिल्हा हा डाग पुसल्या जाणार, असे चिन्हे आहेत. यंदाच्या तीन महिन्यात ५२ शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. शेतकऱ्यांच्या नैराष्यावर संघर्षाने मात केल्याने जिल्ह्यात सकारात्मक चित्र समोर आले आहे.

राज्यात दोन वर्षाचा आढावा घेता सर्वधिक शेतकरी आत्महत्या असलेला जिल्हा, अशी अमरावती जिल्ह्याची झालेली ओळख दुदैवी आहे. सरासरी दर २० तासात एक शेतकरी आत्महत्या जिल्ह्यात होत असल्याच्या चित्राला यंदा छेद दिल्या गेला. जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये आता सकारात्मक बदल होताना दिसतो. यासाठी प्रशासकीय स्तरावरुन फारसे काही प्रयत्न झाले आहे, असे नाही. शेतकऱ्यांच्याच नैराष्यावर संघर्षाने केलेली मात, यामध्ये ठळकपणे उठून दिसत आहे.

जिल्ह्यात २२ वर्षांपासून शेतकरी आत्महत्यांची नोंद प्रशासनस्तरावर घेतल्या जात आहे. याकाळात सावकारी व बँकांचे कर्ज, कर्जाचे वसुलीसाठी तगादा, सलग नापिकी, दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती, आजारपण, मुला-मुलींचे शिक्षण, लग्न आदी समस्यांमुळे शेतकऱ्यांमध्ये नैराश्य येऊन आत्महत्यांच्या प्रमाणात वाढ झालेली होती. शासनाने शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांसाठी काही योजना दिल्या परंतू या योजनांचा लाभ गरजू शेतकऱ्यांना मिळालेला नाही. त्यामुळे शेतकरी हे अस्मानी व सुल्तानी संकटाचे बळी ठरले आहेत.

 

टॅग्स :AmravatiअमरावतीFarmerशेतकरी