शहरं
Join us  
Trending Stories
1
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
2
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप
3
मोबाईलमधले फोटो, टोकाचं भांडण, रक्तरंजित प्रेम; महालक्ष्मीच्या हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं?
4
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
5
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...
6
गौतम अदानींना ज्यांनी तारलं, त्यांनाच अमेरिकेत बसला लाखो डॉलर्सचा दंड; कारण काय?
7
IND vs BAN : जा रे जारे पावसा! दुसऱ्या दिवसाचा बहुतांश खेळ पाहण्यात नव्हे पाण्यात जाणार?
8
त्रिग्रही बुधादित्य राजयोग: ७ राशींना अनुकूल, सरकारी कामात लाभ; उत्पन्नात वाढ, मनासारखा काळ!
9
मुंबईत ठाकरेंच्या युवासेनेचा जल्लोष; सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा १० पैकी १० विजयी
10
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
11
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
12
'ती माझी मुलगी आहे...', IIFA सोहळ्यावेळी आराध्याबद्दल विचारताच ऐश्वर्याचं पत्रकाराला थेट उत्तर
13
आज शेअर बाजार खुला राहणार, NSE वर होणार विशेष ट्रेडिंग सेशन; कारण काय?
14
Zomatoच्या सह-संस्थापक आकृती चोप्रा यांचा राजीनामा; १३ वर्षाचा प्रवास थांबला, पाहा त्यांची Networth किती?
15
Bigg Boss Marathi Season 5: राखी सावंतची घरात एन्ट्री! 'ड्रामा क्वीन'ला पाहून निक्कीची झाली अशी अवस्था; प्रोमो व्हायरल
16
उद्धव युवासेनेचा अखेर सिनेटवर झेंडा; विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविपचा उडाला धुव्वा
17
अग्रलेख : फडणवीसांचा कबुलीनामा; अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर ‘परिवार’ फारच अस्वस्थ
18
मतदारांची गैरसोय झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई; केंद्रीय निवडणूक आयोगाचा इशारा
19
बहिणींच्या पैशांवर नजर ठेवाल तर खबरदार...; फडणवीस यांचा विरोधकांना इशारा
20
मध्य रेल्वेवर उद्या ५ तासांचा मेगाब्लॉक; तिन्हा मार्गांवरील लोकल धावणार उशिरा

कसला अमृतकाळ? मेळघाटात ऑगस्टमध्ये ३६ पैकी १९ बालकांचा मृत्यू रुग्णालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2022 10:29 AM

पाच महिन्यांत ११० मृत्यू; धक्कादायक वास्तव आले समोर

नरेंद्र जावरे

परतवाडा (अमरावती) : मेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्यात एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांत दोन माता व शून्य ते सहा वयोगटातील ७७ व ३३ उपजत अशा ११० बालकांचा मृत्यू झाला. धारणी उपजिल्हा रुग्णालयात ऑगस्ट महिन्यात ३६ पैकी १९ बालकांचा मृत्यू झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

आदिवासी नागरिकांनी बालकांचा उपचार कुठे करावा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कुपोषणाच्या तीव्र श्रेणीत २३२ बालके असताना १४ ‘ब’ गट डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याचा संतापजनक प्रकार आहे. धारणी व चिखलदरा तालुक्यात कुपोषणाचा प्रश्न गंभीर असताना राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजना, न्यायालयाचे ताशेरे पाहता मृत्यूची आकडेवारी कमी होत नसल्याचे चित्र आहे.

या ११० मृत्यूंपैकी सर्वाधिक ३६ बालकांचा मृत्यू ऑगस्ट महिन्यात झालेला आहे. या कालावधीत दोन माता मृत्यू झाल्याची नोंद जिल्हा आरोग्य विभागाकडे आहे. आदिवासी बांधवांवर अंधश्रद्धेचा पगडा असल्याचे वारंवार सांगितले जाते. आता रुग्णालयातही बालमृत्यूचे प्रमाण वाढले असल्याचे वास्तव आहे.

शून्य ते सहा वयोगटात ७७ बालकांचा मृत्यू

मेळघाटात पाच महिन्यांत शून्य ते सहा वयोगटातील ७७ बालकांचा मृत्यू झालेला आहे. यामध्ये ऑगस्ट महिन्यात २,५२५ बालकांचा जन्म झाला. त्यापैकी शून्य ते सहा वयोगटातील २७ बालके दगावली आहेत. धारणी येथे उपजिल्हा रुग्णालयात १९ व टेब्रुसोंडा आरोग्य केंद्र अंतर्गत शून्य ते सहा वयोगटातील सहा बालके दगावली आहेत.

पाच महिन्यात ३३ बालके मृत जन्मली

आरोग्य विभाग शून्य ते सहा वयोगटातील आकडेवारी सांगत असला तरी मृत जन्मलेल्या बालकांची संख्यासुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. पाच महिन्यात ती ३३ आहे. ऑगस्ट महिन्यात नऊ बालके मृत जन्मल्याने राज्य शासनाचा पोषण आहार व इतर योजना कुचकामी ठरल्या आहेत.

मागील वर्षाच्या तुलनेत बालमृत्यूची संख्या कमी आहे. ऑगस्ट महिन्यात ० ते ६ वयोगटातील २७ व उपजत नऊ बालकांचा मृत्यू झाला. आरोग्य यंत्रणा कार्यरत आहे. ‘ब’ गट डॉक्टरांची १४ पदे रिक्त आहेत. शासनाला अहवाल पाठविण्यात आला आहे

दिलीप रणमले, जिल्हा आरोग्य अधिकारी, अमरावती

टॅग्स :Healthआरोग्यMelghatमेळघाटAmravatiअमरावती