शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

सहा महिन्यात शासकीय रक्तपेढीने १०३ बॉटल दूषित रक्त केले नष्ट 

By उज्वल भालेकर | Updated: July 17, 2024 19:54 IST

एचआयव्ही, हिपॅटायटीस बी, सी रुग्णांनी केले होते रक्तदान

अमरावती: रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी रक्तदान महत्त्वाचे आहे; परंतु रुग्णांना रक्त चढविण्यापूर्वी रक्त सुरक्षित आहे का, याची चाचणी केली जाते. जिल्ह्यातील शासकीय रक्तपेढीमध्ये सहा महिन्यांमध्ये ४ हजार ४०९ जणांनी रक्तदान केले. यामध्ये १०३ रक्तदात्यांचे रक्त हे दूषित आढळून आले आहे. यामध्ये ९ जणांना एचआयव्ही असल्याचे आढळून आले आहे. या सर्व दूषित रक्ताची वेळीच विल्हेवाट लावून ते नष्टदेखील करण्यात आल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.

जिल्ह्यात वर्षभरात हजारो गरजू रुग्णांना रक्ताची गरज पडते. यामध्ये अपघातग्रस्त, गर्भवती महिला, सिकलसेल, थॅलेसेमिया, तसेच इतरही अनेक गरजू रुग्णांना रक्त आवश्यक असते. त्यामुळे रुग्णांना वेळेत रक्त उपलब्ध व्हावे यासाठी जिल्ह्यात शासकीय रक्तपेढीबरोबरच काही खासगी रक्तपेढ्याही कार्यरत आहेत. इर्विन रुग्णालयातील रक्तपेढी ही जिल्ह्यातील एकमेव शासकीय रक्तपेढी आहे. या रक्तपेढीमधून जिल्ह्यातील सर्वच शासकीय रुग्णालयांमध्ये रक्तपुरवठा केला जातो. त्यामुळे या ठिकाणी रक्तदान केल्यानंतर ते रक्त सुरक्षित आहे का, याची चाचणी केली जाते आणि त्यानंतर सुरक्षित रक्त संबंधित रुग्णांना चढविले जाते. जानेवारी ते जून या सहा महिन्यांच्या कालावधीमध्ये इर्विन रक्तपेढीमध्ये ४ हजार ४०९ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यात १०३ पिशव्या रक्त हे दूषित आढळून आले आहे.

या आजाराचे आहे दूषित रक्तशासकीय रक्तपेढीमध्ये सहा महिन्यांत संकलित झालेल्या रक्ताच्या चाचणीमध्ये ०९ रक्तदात्यांचे रक्त हे एचआयव्ही पॉझिटिव्ह, १५ पिशव्या रक्त हे हिपॅटायटिस-बी, तर ७९ पिशव्या रक्त हे हिपॅटायटिस- सी विषाणू दूषित आढळून आले.

रक्तदान करताना घ्या काळजी?रक्तदान करण्यापूर्वी रक्तदाता हा निरोगी आहे की नाही याची तपासणी करणे गरजेचे आहे. रक्तदाता जर रक्तदान करण्यापूर्वी काही दिवस आजारी असेल तर त्याने रक्तदान करणे टाळावे. रक्तदान केल्यानंतरही ते रक्त सुरक्षित आहे की नाही याची चाचणी करूनच संबंधित रुग्णांना द्यावे.इर्विन येथे रक्त संकलित केल्यानंतर त्या रक्ताचे एचआयव्ही, मलेरिया, गुप्तरोग, हिपॅटायटिस-बी व सी या विषाणूंची चाचणी केली जाते. यामध्ये जे रक्त दूषित आढळले त्याची योग्य विल्हेवाट लावून सुरक्षित रक्तच रुग्णांना दिले जाते. सहा महिन्यांत १०३ बॉटल रक्त दूषित आढळले. - डॉ. आशिष वाघमारे, रक्तपेढी प्रमुख, इर्विन

टॅग्स :AmravatiअमरावतीBlood Bankरक्तपेढी