शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योगसूर्याचा अस्त, रतन टाटा कालवश; ब्रीच कॅण्डी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
Ratan Tata News Live: ज्ञानी-दानी अन् स्वाभिमानी 'भारत रतन'; देश गहिवरला, मान्यवरांची रतन टाटांना श्रद्धांजली
3
आजचे राशीभविष्य १० ऑक्टोबर २०२४; आजचा दिवस चिंतामुक्त, खुशीचा
4
‘असे’ घडले रतन टाटा; आजीने सांभाळले, स्कूटरमधून नॅनोची प्रेरणा अन् फोर्डला धडा शिकवला
5
चीन युद्धामुळे रतन टाटांची प्रेम कहाणी राहिली अधुरी; पण, नशिबाने काही वेगळेच ठरवले होते
6
मराठीत वैद्यकीय शिक्षण घेण्याचे स्वप्न होणार पूर्ण: PM मोदी; १० मेडिकल कॉलेजचे उद्घाटन
7
अनपेक्षित निकालांचे आम्ही विश्लेषण करू; काँग्रेस नेते राहुल गांधी यांची माहिती
8
हरयाणामध्ये अहंकाराचा फुगा जनतेनेच फोडला; CM एकनाथ शिंदेंची इंडिया आघाडीवर टीका
9
मविआच्या ७० जागांचा तिढा अद्यापही सुटेना; २१८ जागांवर एकमत, बैठकीत बंडखोरी रोखण्यावर भर
10
लवकरच येणार कर्ज स्वस्ताई; RBIकडून व्याजदर ६.५ टक्क्यांवर कायम, आगामी बैठकीत कपातीचे संकेत
11
...तर बांधकामाच्या सर्व नव्या परवानग्या थांबवू; उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला इशारा
12
STला मिळणार ३०० कोटी; बिल्डरांमार्फत ३८ जागांचा विकास, मुंबईतील मोक्याच्या जागांचा समावेश
13
१९ ओबीसी जातींचा केंद्रीय सूचीमध्ये समावेश; राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने दिली मंजुरी
14
AI मदतीने शोधला प्रथिनांचा कोड अन् मिळाले नोबेल; डेव्हिड बेकर, डेमिस हसाबिस, जॉन जम्पर मानकरी
15
Ratan Tata Passed Away : “मोठं स्वप्न पाहणं अन् दुसऱ्यासाठी दायित्वाची भावना...” PM मोदींनी या शब्दांत वाहिली टाटांना श्रद्धांजली
16
Ratan Tata Death: गडकरींची टाटांना आदरांजली: देशाने संवेदनशील उद्योजक-समाजसेवक गमावल्याची व्यक्त केली भावना
17
नाशिकच्या नेहरु वनोद्यानाने रतन टाटा यांना घातली होती भुरळ; राज ठाकरे यांना म्हणाले होते, हा तर इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट...!
18
Ratan Tata News: ७९ व्या वाढदिवशी टाटा पोहोचले होते संघ मुख्यालयात; नेमकं काय घडलं होतं?
19
महाराष्ट्राच्या फायद्यासाठी हरयाणाची पुनरावृत्ती करा; अजित पवार यांचं राज्यातील जनतेला आवाहन
20
IND vs BAN : विक्रमी विजयासह टीम इंडियाच्या नावे झाली आणखी एक मालिका

अतिक्रमणमुक्त अमरावतीला छेद

By admin | Published: November 09, 2016 12:17 AM

महापालिका आयुक्तांच्या ‘अतिक्रमणमुक्त अमरावती’ या संकल्पनेला अतिक्रमणधारकांनी छेद दिला आहे.

बेशिस्त वाहतुकीची कोंडी : अतिक्रमणधारकांची मुजोरी, कायमस्वरूपी उपाययोजनांची गरज अमरावती : महापालिका आयुक्तांच्या ‘अतिक्रमणमुक्त अमरावती’ या संकल्पनेला अतिक्रमणधारकांनी छेद दिला आहे. रस्त्यावरील बेशिस्त वाहतूक रस्ता व्यापलेले फेरीवाले व त्यापुढे दुचाकी वाहनांचे पार्किंग, अशा विचित्र कोंडीत अमरावतीकर नागरिक अडकले आहेत. अतिक्रमण निर्मूलन पथकाची पाठ फिरताच अतिक्रमण ‘जैसे थे’ होत असल्याने त्यांच्या मुजोरीला आळा घालण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. आयुक्तपदाचा कार्यभार सांभाळल्यानंतर हेमंत पवार यांनी लगोलग अतिक्रमणाचा मुद्दा हाती घेतला. त्यासाठी मागील पाच महिन्यांपासून कारवाई सुरू आहे. मात्र, मुजोर अतिक्रमणधारक महापालिका किंवा अतिक्रमण निर्मूलन पथकाला ‘भाव’ देत नसल्याने अतिक्रमणाची समस्या अधिक बिकट झाली आहे. अनधिकृत पार्किंग आणि वाढते अतिक्रमण अशा दोन्ही समस्या सोडविण्याचे आव्हान आयुक्तांना पेलायचे आहे. ज्याठिकाणचे अतिक्रमण काढले तेथे पुन्हा तशीच स्थिती निर्माण होऊ नये, यासाठी स्वतंत्र पथके निर्माण करण्याची सल्लावजा सूचना पोलिसांनी दिली होती. मात्र, अतिक्रमण निर्मूलन विभागाने हेतुपुस्सर दुर्लक्ष चालविले आहे. परिणामी अतिक्रमणधारकांचे फावले असून पथक फिरताच पुन्हा ‘जैसे थे’ होणारे अतिक्रमण महापालिकेच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे. (प्रतिनिधी)येथे थाटले जाते अतिक्रमण शहरात चित्रा चौक, अंबादेवी रोड, चुनाभट्टी, इतवारा बाजार, जि.प.विश्रामगृह, टांगापाडाव, सरोज, शाम, राजकमल, चौधरी चौक, मालवीय चौक, जवाहर गेट, उड्डाणपुलाशेजारचा भाग, वलगाव रोड, चांदनी चौक, बसस्थानक मार्ग यांसह शहरातील विविध भागात अतिक्रमणाची समस्या कायम आहे. येथून अनेकदा अतिक्रमण हुसकावून लावले. मात्र, पथकाची पाठ फिरताच पुन्हा ते ‘जैसे थे’ होत असल्याचे चित्र आहे. वाहतूक पोलिसांचे मौनशहरातील वाहतूक शाखेने अतिक्रमण निर्मुलनाबाबत मौन धारण केले आहे. पार्किंग असो की अतिक्रमण अशा समस्यांची जबाबदारी महापालिकेवर लोटून वाहतूक विभागाने अलिप्त आणि अर्थपूर्ण भूमिका घेतली आहे. शहरातील वाहतूक व्यवस्थेचा पार बोजवारा उडाला असताना वाहतूक विभागाची बोटचेपी भूमिका अतिक्रमण आणि अनधिकृत पार्किंगला बळ देणारी ठरली आहे. शहर अतिक्रमणमुक्त करण्याची जबाबदारी संयुक्तपणे पोलीस आणि महापालिका यंत्रणेची आहे. तातडीने व्हावी कारवाई शहरातील अतिक्रमणाची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे रस्ते अरुंद होत असल्याने रहदारीला अडथळा निर्माण होत आहे. रस्त्यांवर बाजार भरत आहे. त्यामुळे पार्किंगला अडथळा होतो. हे अतिक्रमण हटविण्याची कारवाई तातडीने व्हावी, अशी मागणी होत आहे. अतिक्रमणयुक्त ठिकाणे निश्चित करण्यात यावी, पुन्हा पुन्हा होणाऱ्या अतिक्रमणास आळा घातल्यास ही समस्या कमी होईल. मनपाच्या हॉकर्स झोनमध्ये हॉकर्सने जावे. अतिक्रमण हटविल्यानंतर पुन्हा ते होऊ नये, यासाठी उपाययोजनांची गरज प्रतिपादित करण्यात आली आहे. स्थायी दुकानदारांचे अतिक्रमणही डोकेदुखी ठरले आहे.