शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
2
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
3
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
5
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
6
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
7
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
8
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
9
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
10
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
11
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
12
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
13
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
14
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
15
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
16
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
17
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
18
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
19
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
20
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 

खरिपाला विम्याचे कवच

By admin | Published: June 28, 2017 12:24 AM

नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना भरपाई मिळावी, ...

पंतप्रधान पीक विमा योजना : कर्जदार शेतकऱ्यांना सक्तीचीलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना भरपाई मिळावी, यासाठी यंदाच्या खरिपातील नऊ पिकांना पंतप्रधान पीकविमा योजनेचे संरक्षण कवच मिळणार आहे. जिल्ह्यात अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी कर्जदार शेतकऱ्यांना ही योजना बंधनकारक, तर गैरकर्जदार शेतकऱ्यांसाठी ही योजना ऐच्छिक स्वरूपाची आहे. योजनेत सहभागी होण्यासाठी ३१ जुलै ही "डेडलाईन" देण्यात आली आहे.जिल्ह्यातील भात, ज्वारी, भुईमूग, सोयबीन, तीळ, मूग, उडीद, तूर व कापूस यापिकांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. अन्नधान्य व गळीतासाठी विमासंरक्षित रक्कमेच्या दोन टक्के किंवा वास्तवदर्शीपेक्षा कमी असेल तसेच कापसासाठी विमासंरक्षित दराच्या पाच टक्के हप्ता शेतकऱ्यांना भरावा लागणार आहे. योजनेत निश्चित केलेला विम्याचा वाटा व शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हिस्सा यामधील फरकाला विमा अनुदान समजून केंद्र व राज्यशासन समप्रमाणात वाटा देणार आहे. पीकउत्पादनाचा अंदाज घेण्यासाठी जिल्हास्तरावर २४, तालुकास्तरावर १६ व मंडळस्तरावर किमान १० पीककापणी प्रयोग घेण्यात येतील. उत्पन्नाचे अंदाज अचूक कालमर्यादेत प्राप्त करण्यासाठी उपग्रहाव्दारे प्राप्त प्रतिमांच्या सहायाने पीककापणी प्रयोग आयोजित करण्यात येणार आहे.यासाठी रिमोट सेंसिंग टेक्नॉलॉजी, ड्रोन, स्मार्टफोन इत्यादींचा वापर करण्यास केंद्र शासनाने परवानगी दिली आहे. मात्र, पीककापणी प्रयोगासाठी केंद्र शासनाद्वारे विकसित मोबाईल अ‍ॅपचा वापर बंधनकारक आहे. योजनेत पीकपेरणी ते काढणीपर्यंतच्या शेतकऱ्यांना टाळता न येणाऱ्या कारणांसाठी पीकविम्याचे संरक्षण दिले जाणार आहे.शेतकऱ्यांनी ४८ तासांच्या आत कळवावी माहिती शेतकऱ्यांनी घटना घडल्याच्या ४८ तासांच्या आत याबाबतची माहिती विमा कंपनी, संबंधित बँका, कृषी व महसूल विभाग किंवा टोल फ्री क्रमांकावर द्यावी.भरपाईचा दावा दाखल करण्यासाठी अर्ज, पिकांची नोंद असलेला ७-१२, विमा हप्ता भरल्याचा पुरावा आदी माहिती सात दिवसांच्या आत कळविणे अनिवार्य आहे.मोबाईल अ‍ॅपद्वारे स्थानिक आपत्तीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या क्षेत्राचे छायाचित्र त्याच्या अक्षांश, रेखांशासहित दिले जाऊ शकते.शेतकऱ्यांनी त्यांचा फोटो असलेली बँक खातेपुस्तकाची प्रत तसेच आधार कार्डाची प्रत सादर करणे बंधनकारक आहे. आधार कार्ड नसल्यास आधारनोंदणी पावतीसोबत मतदान ओळखपत्र, किसान क्रेडिट कार्ड, नरेगा जॉब कार्ड, वाहनपरवाना यापैकी एक.