शहरं
Join us  
Trending Stories
1
पाऊणतास सोहळ्यास उशीर : मुख्यमंत्र्यांसाठी पालखी सोहळा थांबवल्याची चर्चा 
2
IND vs SA  Live Match : केशव महाराजने भारताला एका षटकात दिले दोन धक्के; ३४ धावांत ३ फलंदाज माघारी
3
“सरकारलाच तीर्थक्षेत्रावर जाण्याची वेळ आली आहे”; तीर्थदर्शन योजनेवर नाना पटोलेंची टीका
4
"आमचं ऐकलं नाही तर विधानसभा निवडणुकीत पराभूत करू’’, या राज्यात सरपंचांनी वाढवलं भाजपा सरकारचं टेन्शन
5
30% इन्कम टॅक्स, 20% जीएसटी, प्रॉपर्टी टॅक्स... जे वाचले त्यातून हॉस्पिटल उघडलेले; तुंबलेल्या दिल्लीवर डॉक्टरची पोस्ट
6
लेक लाडकी योजनेचे काय झाले? तुम्ही केलेले काम लोक विसरले वाटतेय का; वर्षा गायकवाडांचा शिंदेंना टोला
7
“राहुल गांधींना पंतप्रधानपदाचा चेहरा केले असते तर २५ ते ३० जागा वाढल्या असत्या”: संजय राऊत
8
संत ज्ञानेश्वर महाराजांचा प्रस्थान सोहळा संपन्न; उद्या सकाळी आजोळघरातून होणार प्रस्थान
9
“मनोज जरांगे हे तर राजकारणाचे आयकॉन, १० दिवसांत...”; अब्दुल सत्तार यांचे मोठे विधान
10
“काँग्रेसला जमत नाही म्हणून भाजपा-शिंदे गट सत्तेत आहे”; बच्चू कडूंचा खोचक टोला
11
माझं मन सांगतंय दक्षिण आफ्रिका जिंकायला हवी, पण...! Shoaib Akhtar चं फायनलपूर्वी मोठं भाकित
12
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर; माता भगिनींनी CM एकनाथ शिंदेंना बांधल्या राख्या
13
कर्नाटक काँग्रेसमध्ये कलह! मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांमध्ये वाद?; डीके शिवकुमार यांनी कार्यकर्त्यांना दिल्या 'या' सूचना
14
"अतिरिक्त अर्थसंकल्पाला मान्यता नसताना जीआर काढणे हा हक्कभंग’’, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप 
15
भाजपातून जदयूत आले, नितीशकुमारांनी पक्षाचा कार्यकारी अध्यक्ष केले; उत्तराधिकारी की...?
16
बाईकची चाचणी देऊन मिळवलं क्रेन चालवण्याचे लायसन्स; अंधेरी RTO च्या भ्रष्टाचावरुन वडेट्टीवारांचे ताशेरे
17
"आपल्याकडे हिरो ठरवतो सिनेमाची हिरोईन", संस्कृती बालगुडेनं सांगितलं सिनेइंडस्ट्रीतील धक्कादायक वास्तव
18
सशक्त पक्षसंघटना, मोदी, योगींची लोकप्रियता, तरीही UPमध्ये भाजपाचा पराभव का झाला? अहवालातून धक्कादायक माहिती समोर 
19
“लोकसभेत १५५ विधानसभा मतदारसंघात भाजपा पराभूत, इथे सत्ता बदलणारच...”: शरद पवार
20
भारतीय संघाकडून दक्षिण आफ्रिकेची बेक्कार धुलाई; क्रिकेट विश्वात नोंदवला वर्ल्ड रेकॉर्ड

भारनियमनामुळे सिंचनाचा प्रश्न!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 10:45 PM

कॅलिफोर्निया म्हणून विदर्भात परिचित असलेले मोर्शी-वरुड तालुक्यात भारनियमन वाढल्याने सिंचनाची कामे ठप्प आहेत. त्यामुळे शेतकरी त्रस्त आहेत.

ठळक मुद्देसंत्राबागा जगवायच्या कशा ? : शेतकºयांचा सवाल, स्वत:लाच करावी लागते दुरुस्ती

लोकमत न्यूज नेटवर्कवरुड : कॅलिफोर्निया म्हणून विदर्भात परिचित असलेले मोर्शी-वरुड तालुक्यात भारनियमन वाढल्याने सिंचनाची कामे ठप्प आहेत. त्यामुळे शेतकरी त्रस्त आहेत. मागील दोन वर्षांत भूजल पातळी वाढली असताना भारनियमनामुळे संत्राबागांना व पिकांना फटका बसला. भारनियमनामुळे संत्राबागांना जगविणे कठीण झाले असल्याचे मत शेतकरी व्यक्त करीत आहेत.तालुक्यात सिंचनाखाली मोठ्या प्रमाणावर शेती असून हजारो हेक्टर जमीवर संत्राबागा फुलविल्या आहेत. संत्रा, मिरची, कपाशीसह आदी पिकांना या महिन्यात पाण्याची सक्त आवश्यकता असते. परंतु विहिरीत पाणी आहे. मात्र वीजपुरवठा नाही, अशी परिस्थती असल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे. विशेष म्हणजे यंदा संत्रा झाडांवर आलेल्या रोगामुळे योग्य वेळी पाणी दिल्यास संजीवनी मिळू शकते, असे कृषी विभागाने सांगितले. यामुळे सिंचन करून झाडे जगविण्याचा प्रयत्न केला असताना भारनियमनाचा खोडा समोर उभा ठाकला आहे. कृषी विभागाकडून अनुदानावर मिळालेले केरोसीन पंप आता कालबाह्य झाले आहेत. दुसरीकडे केरोसीन मिळत नसल्याने अनेकांचे पंप धूळखात पडले आहेत.शेतकरीच करतात दुरुस्तीभारनियमन व अनिश्चित बिघाड या दोन्ही गोष्टींमुळे शेतकरी त्रस्त आहे. तक्रारी, विनंती करूनही अवेळी बिघाड काढण्यास वीज कर्मचारी येत नाही, तर बिघाड दुरुस्त झाल्यास वीज भारनियमन असते. यामुळे एक-दोन दिवस विनाकारण वाया जातात. परिणामी शेतकरी स्वत:च संबंधित रोहित्रांवर जाऊन दुरुस्ती करीत असल्याचे चित्र तालुक्यात पहायला मिळत आहे.लोंबकळलेल्या तारांचाही प्रश्नशेतामधून जाणाºया विद्युत तारांना गार्डींग नसल्याने अनेक ठिकाणी तारा लोंबकळलेल्या आहेत. यामुळे एखादा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकडे वीज वितरण कंपनीच्या अधिकारी-कर्मचारी सपशेल दुर्लक्ष करीत आहेत.जबाबदारी कुणाची ?कुठलीही तांत्रिक माहिती किंवा सरंक्षण नसताना केवळ पिके वाचविण्याकरिता जीव धोक्यात घालून शेतकºयांना वीज दुरुस्ती करावी लागत असल्याने अपघात झाल्यास या शेतकºयांची जबाबदारी कुणावर, हा प्रश्न निर्माण होतो. यामुळे आता राज्य शासनाने वीज कंपनीकडून शेतकºयांनाच विद्युत दुरुस्तीचे तांत्रिक प्रशिक्षण द्यावे अन्यथा वीज कर्मचारी वेळेवर पाठवून त्वरित वीजपुरवठा सुरु करावा, अशी मागणी आहे.संत्रापिकांना योग्यवेळी पाणी मिळणे गरजेचे आहे. मात्र भारनियमन असल्याने त्यांना ऐनवेळेवर पाणीच मिळत नसल्याने संत्राबागा जगविणे कठीण झाले आहे. या गंभीर प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे.- विलास तट्टे, संत्रा उत्पादक