शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
2
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
3
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
4
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
5
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
6
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
7
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
8
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
9
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
10
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
11
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
12
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
13
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
14
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
15
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
16
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
17
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
18
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
19
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
20
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

गणोजा देवी येथील पूरग्रस्तांचे जलसमाधी आंदोलन, दोन तास वाहतूक बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2021 14:48 IST

पेढी नदीवर पूल व रस्त्यासह विविध मागण्यांसाठी गणोजा देवी येथील लोकांनी जलसमाधी आंदोलन केले. यामुळे भातकुली-अमरावती रस्ता दोन तास ठप्प होता. आंदोलनकर्त्यांना लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

ठळक मुद्दे३०० जणांचा सहभाग, जिल्हा प्रशासनाच्या आश्वासनंतर आंदोलन मागे

अमरावती : भातकुली तालुक्यातील गणोजा देवी येथील पुलासह विविध मागण्यांसाठी पूरग्रस्तांनी पेढी नदीच्या पात्रात बुधवारी जलसमाधी आंदोलन करण्याचा निर्धार केला होता. मात्र, पोलीस प्रशासनाने मोर्चा अडविल्याने मोर्चेकऱ्यांनी रस्त्यावर ठिय्या देऊन आंदोलन सुरू केले. यामुळे भातकुली-अमरावती रस्ता दोन तास ठप्प होता. आंदोलनकर्त्यांना लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

गणोजा येथे पेढी नदीच्या पलीकडील काठावर सुमारे पन्नास वर्षांपासून ३०० लोकांची वस्ती आहे. या वस्तीतील लोकांना पावसाळ्यात पूर आल्यास दळणवळणाचा गंभीर प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे पेढी नदीवर पूल व रस्त्यासह विविध मागण्यांसाठी युवा लायन्सच्या नेतृत्वाखाली बुधवारी सकाळी ११ वाजता जलसमाधी आंदोलनासाठी हे आंदोलनकर्ते सज्ज झाले होते. बसस्थानक चौकातून निघालेला मोर्चा पोलिसांनी पेढी नदीच्या पुलाच्या अलीकडेच अडवला. त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावर ठिय्या देऊन आंदोलन केले. यावेळी तणाव निर्माण झाला होता.

वाहतुकीच्या रस्त्यावर दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सुमारे दोन तास वाहतूक ठप्प झाली होती. अखेर उपविभागीय अधिकारी विजय व्यवहारे, तहसीलदार नीता लबडे, सहायक पोलीस आयुक्त गायकवाड यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून समस्यांबाबत शासनाला प्रस्ताव सादर करण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिले. यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी महसूल व पोलीस प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते.

प्रशासन सज्ज

पोलीस बंदोबस्तगणोजा येथील सुमारे तीनशे पुरग्रस्त जलसमाधी आंदोलनात सहभागी होणार असल्याने सकाळीच अमरावती येथून रेस्क्यू ऑपरेशन टीम सर्व साहित्यानिशी पेढी नदीच्या काठावर सज्ज झाली होती. पूरग्रस्तांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर येथील ठाणेदार संतोष ताले यांच्या मार्गदर्शनाखाली तगडा पोलीस बंदोबस्त लावला होता. पोलिसांनी आंदोलकांचा मोर्चा अडविल्याने शांततेत आंदोलन पार पडले.

सुमारे दोन तास वाहतूक ठप्प

पुरग्रस्तांचे जलसमाधी आंदोलनामुळे पोलीस प्रशासनाने भातकुली ते अमरावती राज्य मार्गावर पेढी नदीच्या पुलाजवळ दोन्ही बाजूला बॅरिकेट्स लावले होते. सुमारे दोन तास वाहतूक ठप्प झाली होती. दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या.

टॅग्स :agitationआंदोलनfloodपूर