शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

यंदाचाच कांदा ठेवा जपून; बियाणे दोन हजारांवरून पाचशेवर, क्षेत्रही घटले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2022 11:11 PM

लागवड कमी होण्यामागे कांद्याला अपेक्षित भाव नाही. याशिवाय साठवणूक करताना वातावरणामुळे खराब होण्याचे प्रमाण जास्त आहे. याशिवाय दरवर्षी अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे कांद्याचे नुकसान होत असल्याने यंदा शेतकऱ्यांचा कांदा लागवडीकडे कल कमी आहे. त्यामुळे बियाणांची मागणी कमी झाल्याने दर आता ५०० रुपयांवर व काही दिवसांनी २०० ते ३०० रुपयांवर येण्याची शक्यता असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कांद्याला अपेक्षित भाव मिळत नसल्याचे लागवडक्षेत्रात कमी येत आहे. यामुळे कांद्याच्या बियाण्याची मागणी कमी झाल्याने गतवर्षी किलोमागे दोन हजार रुपयांवर असलेले बियाणांचे भाव यंदा पाचशेवर आले आहेत. त्यामुळे यंदाचाच कांदा ठेवा जपून म्हणण्याची वेळ आलेली आहे. जिल्ह्यात साधारणपणे दीड ते दोन हजार हेक्टर क्षेत्रात कांद्याचे क्षेत्र राहते. त्याच्या तुलनेत यंदा फक्त ५०० हेक्टरमध्येच कांद्यांची लागवड होण्याची शक्यता आहे. साहजिकच बियाणांची मागणी यावर्षी कमी झाली आहे. त्यामुळे उत्पादकांचे मोठे  नुकसान होण्याची शक्यता आहे. लागवड कमी होण्यामागे कांद्याला अपेक्षित भाव नाही. याशिवाय साठवणूक करताना वातावरणामुळे खराब होण्याचे प्रमाण जास्त आहे. याशिवाय दरवर्षी अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे कांद्याचे नुकसान होत असल्याने यंदा शेतकऱ्यांचा कांदा लागवडीकडे कल कमी आहे. त्यामुळे बियाणांची मागणी कमी झाल्याने दर आता ५०० रुपयांवर व काही दिवसांनी २०० ते ३०० रुपयांवर येण्याची शक्यता असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

कांदा बियाण्याच्या दरात कमालीची घसरणदरवर्षी कांदा बियाणे दरात वाढ होत असते. यंदा उलट स्थिती आहे. लागवडक्षेत्र घटल्याने बियाणांची मागणी कमी झाली व गतवर्षी दोन हजार रुपयांवर असलेले बियाण्यांचा भाव आता ३०० ते ५०० रुपयांवर आलेला आहे.

गतवर्षी कांदा उत्पादक, ग्राहकांनाही फटकाकांद्याला अपेक्षित भाव मिळाला नाही. साठवणुकीचा कांदा खराब होण्याचे प्रमाण जास्त असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.

व्यापाऱ्यांना मात्र फायदासुरुवातीच्या काळात मातीमोल भावाने कांदा खरेदी केला व दर वाढल्यानंतर विक्री केल्याने व्यापाऱ्यांचा मोठा फायदा होत असल्याचे दिसून येते. त्याच्या तुलनेत उत्पादकांना फटका बसला आहे.

नुकसानभरपाई मिळेल काय?प्रतिकूल वातावरण, पाऊस यामुळे कांद्याच्या रोपाचे मोठे नुकसान झाले आहे. दर घसरल्याने बियाणे शेतकऱ्यांकडे पडून आहे. या प्रकारात कांदा उत्पादकांचे मोठे नुकसान झाल्याने शासनाने नुकसानभरपाई देण्याची मागणी होत आहे.

कांदा लागवडीचे क्षेत्रही घटलेजिल्ह्यात साधारणपणे दीड ते दोन हजार हेक्टरमध्ये कांद्याची लागवड दरवर्षी होते. त्याच्या तुलनेत यंदा ५०० ते ८०० हेक्टरमध्येच लागवड होण्याची शक्यता आहे. कांद्याला अपेक्षित भाव मिळत नसल्यासह अन्य कारणांमुळे क्षेत्र कमी होत आहे. शेतकऱ्यांनी बाजाराकडेही लक्ष द्यावे. 

शेतकरी काय म्हणतात....

मागील वर्षी कांदा बियाणांना मोठी मागणी व यामुळे कमतरता होती. दोन हजारांवर दर पोहोचले होते. त्यातुलनेत यंदा बियाणे उपलब्ध आहेत, तर मागणी कमी आहे. हे गणित एखाद्या वर्षी तरी सारखे असावे.  - संजय जाजू, कृषी निविष्ठा विक्रेता

निसर्गाच्या लहरीपणामुळे दरवर्षी पिकांची वाट लागत आहे. कांद्याला उत्पादन खर्चाच्या तुलनेत भाव मिळत नाही. भाव वाढतील, या अपेक्षेने साठवणूक करायची तरी कोणत्या मालाची? हा मोठा प्रश्न आहे.- संजय मालपे, शेतकरी

 

टॅग्स :onionकांदा