शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार गटाच्या मतदारसंघावर दावा; विधानसभा निवडणुकीत वसंत मोरेंची होणार कोंडी?
2
पडळकरांकडून सरकारविरोधातच आंदोलनाचं हत्यार; रास्ता रोकोसाठी धनगर समााजाला केलं महत्त्वाचं आवाहन 
3
Maharashtra Assembly Elections : हरियाणा-काश्मीरनंतर आता महाराष्ट्र विधानसभेचे बिगुल वाजणार! निवडणूक आयोगाने तयारी केली सुरू
4
Maharashtra Politics : शिवसेना शिंदे गटात पक्षातंर्गत वाद?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटानं उडाली खळबळ
5
सिनेट निवडणुकीत चुरस; शिंदेगटाच्या युवासेनेचे 'अभाविप'शी फाटले; पाठिंबा काढला
6
Pitru Paksha 2024: आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पितृपक्षातील अष्टमीला करा 'गजलक्ष्मी व्रत'!
7
तिरुपती लाडू प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी; मुख्यमंत्री खोटारडे, त्यांना समज द्या : जगनमोहन रेड्डी
8
ATM Card वर मिळतो १० लाखांपर्यंतचा फ्री इन्शूरन्स; पाहा केव्हा घेता येतो या सुविधेचा लाभ?
9
रश्मी ठाकरे पुढच्या मुख्यमंत्री...! कलानगरात झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चा
10
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी व व्यापारात लाभ होतील; अचानक धन प्राप्ती होईल
11
चार हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन वस्तू अमेरिका भारताला देणार; पंतप्रधानांनी मानले आभार
12
अग्रलेख : पंतप्रधान पुन्हा आक्रमक; महायुतीची सत्ता टिकविण्यासाठी भाजप पुन्हा सरसावला
13
मराठा, ओबीसी आरक्षणावरून तणाव कायम; वडीगोद्रीत दोन्ही समाजांचे आंदोलक रस्त्यावर
14
सर्व्हे सांगतात, मविआला मुंबईत २२ जागा मिळणार
15
सत्यपाल मलिक करणार मविआचा प्रचार; मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची घेतली भेट
16
गुजरातच्या 'गिफ्ट सिटी' सारखे आर्थिक केंद्र आता मुंबईत
17
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
18
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
19
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
20
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप

मेळघाटातील कोल्हापुरी बंधारे आटले

By admin | Published: May 07, 2016 12:44 AM

मेळघाटातील कोल्हापुरी बंधाऱ्यात यावर्षी थेंबभरही पाणी शिल्लक न राहिल्याने भीषण जलसंकट निर्माण झाले आहे.

जलसंकट : वन्य प्राण्यांची पाण्यासाठी गावाकडे धावश्यामकांत पाण्डेय धारणीमेळघाटातील कोल्हापुरी बंधाऱ्यात यावर्षी थेंबभरही पाणी शिल्लक न राहिल्याने भीषण जलसंकट निर्माण झाले आहे. तसेच नदी-नाले पूर्णपणे आटल्याने वन्यप्राणी पूर्वीच पाण्याच्या शोधात गावाकडे धाव घेत असतानाचे अनेक उदाहरण आहेत. अशातच सर्व बंधारे आटल्याने पाळीव प्राण्यांनाही पाण्याची भीषण जाणवण्याची चिन्ह आहे. जिल्हा परिषद लघुसिंचन विभागाने तालुक्यात उतावली, कढाव, हरिसाल, धूळघाट, कळमखार, रोहणीखेडा, गडगा मालूर येथे कोल्हापुरी बंधारे निर्माण केले. हे बंधारे सदोष असल्याने दरवर्षी पाणी वाहून जात आहे. पूर्वीच कोट्यवधी खर्च करून आता दरवर्षी दुरुस्तीच्या नावाखाली लाखो रूपये कोल्हापुरी बंधाऱ्यावर उधळण्यात येत आहेत. मात्र दुखणे डोक्याला व निदान पोटाचा अशा प्रकार लघुसिंचन विभाग करीत आहे. केवळ थातूरमातूर कामे करून लाखो रूपयांची देयके अधिकारी व कंत्राटदारांच्या घशात जात आहे. याकडे वरिष्ठ अधिकारीसुद्धा अर्थपूर्ण दुर्लक्ष करीत आहेत. दुसरीकडे गडगा, सिपना, सावरा, खंडू या नद्यांसह लहान-मोठे नाले व नद्या कोरडे पडले आहेत. सिंचनासाठी पाण्याचा सर्रास वापर केल्याने आता थेंबभर पाणीही शिल्लक राहिले नाही. त्यामुळे गावातील गुरेढोरे पाण्यासाठी इतरत्र भटकत असल्याचे चित्र आहे. परिणामी येत्या १५ दिवसांत गुरेढोरे मरण्याचा प्रकार समोर आल्यास नवल वाटायचे कारण नाही. गावाजवळील नदी-नाल्यांची अशी अवस्था असताना व्याघ्र व प्रादेशिक जंगलातील नदी-नाले तर जानेवारी महिन्यातच कोरडे पडले आहे. त्यामुळे जंगलातील अस्वल, रानडुक्कर, बिबट, गावाकडे धाव घेत आहे. त्यामुळे अनेकांवर हल्ला झाल्याचे प्रकार समोर आले आहे. जंगलातील नैसर्गिक पाणवठे आटले असून कृत्रिम पाणवठ्यातसुद्धा पाण्याचा थेंब नाही.