शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगे पाटील मुख्यमंत्रिपदाचा चेहरा?; तिसऱ्या आघाडीचे राजरत्न आंबेडकरांचं विधान
2
Maharashtra Politics : '२०२९ मध्ये भाजपाचे सरकार येणार', शाहांचं विधान; अजित पवार, एकनाथ शिंदे, जयंत पाटील काय म्हणाले?
3
संपादकीय: बिऱ्हाड गोमातेच्या पाठीवर..
4
Iran Israel संघर्षाचा भारतीयांनाही बसणार फटका! कच्च्या तेलाच्या किंमतीचा भडका 
5
पुण्यात हेलिकॉप्टर कोसळून तिघांचा मृत्यू; बावधनमधील रिसॉर्टवरुन केलं होतं उड्डाण
6
"हिचं तोंड काळं करा...", तृप्ती डिमरीवर भडकल्या महिला, पोस्टरवर काळं फासलं; प्रकरण काय?
7
Post Officeची भन्नाट स्कीम, ५ वर्ष महिन्याला मिळतील ₹९,२५०; पुढेही कमाई हवी असेल तर काय कराल?
8
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी केंद्र सरकारकडून मिळणार १४९२ कोटी निधी
9
देवानेच अद्दल घडवली! आधी मूर्ती चोरली, चार दिवसांनी पुन्हा परत केली; चिठ्ठी लिहून माफी मागितली
10
"तुम्हाला किंमत चुकवावी लागेल", नेतन्याहूंचा इशारा; इराण म्हणाले, "प्रत्युत्तर दिलं तर..."
11
यावेळी महायुतीचे अन् २९ मध्ये भाजपचे स्वबळावर सरकार; अमित शाहंच्या वक्तव्याने अजित पवार, शिंदे गटात खळबळ 
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस आर्थिक व व्यावसायिक दृष्टया लाभदायक
13
मविआचे जागावाटप होणार दसऱ्याला; सलग दोन दिवस बैठका
14
बदलापूर लैंगिक अत्याचार : फरार संस्था चालकांना अद्याप अटक का नाही? उच्च न्यायालयाचे एसआयटीवर ताशेरे
15
विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात भाजपच्या अनेक उमेदवारांचे पर्याय लिफाफाबंद; कुठे कुठे मतदान
16
आयोगाच्या अल्टिमेटमनंतरही मुंबईतील १३० पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीस गृहविभागाचा नकार
17
मायदेशात सलग १८वा मालिका विजय; भारताने बांगलादेशला दिला व्हाइटवॉश
18
सहलीला जाताना बस पेटली; २५ विद्यार्थी, शिक्षकांचा मृत्यू
19
बनावट सुप्रीम काेर्टात सुनावणी, उद्याेजकाला घातला सात काेटींचा गंडा 
20
गुंतवणूकदार झाले तरुण; ४०% अवघे तिशीतलेच

लॉकडाऊनमुळे ग्रामीण भागातील व्यवसाय मोडकळीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 4:10 AM

अमरावती : राज्यभरात कोरोना संकटामुळे हाहाकार माजला आहे. यामुळे सर्व क्षेत्रातील अर्थव्यवस्था खिळखिळी झाली असून, अनेक क्षेत्रातील नागरिक तणावाखाली ...

अमरावती : राज्यभरात कोरोना संकटामुळे हाहाकार माजला आहे. यामुळे सर्व क्षेत्रातील अर्थव्यवस्था खिळखिळी झाली असून, अनेक क्षेत्रातील नागरिक तणावाखाली जगत आहेत. गत वर्षी मार्च महिन्यात कोरोनाचे आगमन झाले. तेव्हापासून आतापर्यंत दीड वर्षात आर्थिक घडी पूर्णत: विस्कटली आहे.

ग्रामीण भागातील सुतार काम करणारे, वेल्डिंग व इतर मजुरीची कामे करणारे, म्हणजेच लोहारकाम, टेलर, वेल्डिंग, मोटार गॅरेज, कापड दुकानातील कामगार, चहा टपरी चालक, नास्ता विक्री करणारे, मडकी घडवणारे कुंभार बांधव, मंडप व्यवसाय, आचारी, सलूनचे काम करणारे, बाजारात जाऊन खेळणी, स्टेशनरी विकणारे, मेवामिठाई विकणारे असे प्रत्येक व्यवसाय पूर्णपणे बंद पडले आहेत. त्यामुळे अक्षरश: या छोट्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. फक्त अत्यावश्यक सेवेत असणारी दुकाने किमान ठराविक वेळेत तरी उघडली जातात. त्यामुळे त्यांना उपजीविकेला काही अडचण येत नाही. पण जे व्यवसाय आठवडी बाजार किंवा यात्रावर अवलंबून आहेत. त्यांना मात्र जगणे मुश्कील झाले आहे. कोरोनाच्या काळात मोठ्या विवाह समारंभावर मनाई आहे. यामुळे यावर आधारित उपासमारीची वेळ आली आहे. ग्रामीण भागात असे अनेक छोटे व्यवसाय कोरोना, लॉकडाऊनमुळे ही बंद आहे. अशा लोकांवर अक्षरश: उपासमारीची वेळ आली आहे. अशा व्यावसायिकांना खरे तर शासनाने मदत करणे आवश्यक आहे. पण शासनाने याकडे पूर्ण दुर्लक्ष केले आहे. फक्त बांधकाम कामगार व पीएमकिसानचे पैसे खात्यावर जमा झाले आहेत. बाकी सर्वांना अडचणी निर्माण झाले आहेत.

बॉक्स

छोटे व्यावसायिक हतबल

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून लॉकडाउन करण्यात आला आहे. यामुळे यात्रा, आठवडी बाजार बंद असल्याने छोटे व्यावसायिक अक्षरश: हतबल झाले आहेत. शेतकऱ्यांना आपल्या पिकवलेल्या मालाला बाजारपेठ उपलब्ध होत नाही. यामुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत.