शहरं
Join us  
Trending Stories
1
युगान्त... रतन टाटा पंचत्वात विलीन; उद्योग विश्वातील युग संपले, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
2
अलविदा... रतन टाटा यांच्या निधनाने संपूर्ण देश भावुक; सोशल मीडियावरुनही श्रद्धांजली
3
विमानांत रतन टाटा यांच्या स्मृतींना उजाळा! गुंतवणूकदारांचा विश्वास कायम, शेअर्स वधारले
4
रतन टाटा यांचे कलाटणी देणारे धाडसी निर्णय; जेएलआरचे अधिग्रहण ते एअर इंडियाची घरवापसी
5
राज्यात तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता; परतीच्या पावसाला अद्याप सुरुवात नाही
6
नॉन क्रिमिलेअरची मर्यादा १५ लाख करण्याची शिफारस; केंद्राला प्रस्ताव, VJNT, SBCचा समावेश
7
आणखी पाच समाजांच्या कल्याणासाठी महामंडळे; प्रत्येकी ५० कोटींचे भाग भांडवल दिले जाणार
8
विजयादशमीचा मुहूर्त टळणार; मविआत पेच, विदर्भ, मुंबईतील जागांवरील तिढा कायम
9
‘एक देश, एक निवडणूक’ धोरण अमान्य; ‘या’ राज्याने विधानसभेत ठराव पारीत करत केला विरोध
10
‘ज्ञानराधा’ला ईडीचा दणका; १ हजार कोटींची मालमत्ता जप्त; मुंबई, बीड, जालना येथील संपत्ती
11
विशेष मोहीम राबवून राजकीय होर्डिंग्ज हटवा; उच्च न्यायालयाचे राज्यातील सर्व पालिकांना आदेश
12
धनगर ऐवजी धनगड वाचावे, शुद्धीपत्रक एका रात्रीत रद्द; संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी
13
अक्षय शिंदेसाठी ‘ते’च वाहन का निवडले? पोलिस चकमकप्रकरणी सीआयडीचा पोलिसांना सवाल
14
चीनने आपल्या ताकदीचा वापर शांततेसाठी करावा: तैवानचे राष्ट्राध्यक्ष लाइ चिंग-ते
15
Mumbai Rains: मुंबईला पावसाने झोडपलं; उपनगरांसह ठाण्यातही मुसळधार बरसला!
16
जातीय समीकरण आवश्यकच, मात्र हिंदुत्वापासून दूर जाऊ नका; संघाने टोचले भाजप पदाधिकाऱ्यांचे कान
17
एक मतदारसंघ अन् ३ तगडे नेते इच्छुक; माढ्याच्या मैदानात शरद पवार कोणता पैलवान उतरवणार?
18
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 2000 कोटी रुपयांचे कोकेन जप्त, आठवडाभरात दुसरी कारावई
19
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असणाऱ्या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; ७ हजार गावांना होणार फायदा
20
हरयाणानंतर आता महाराष्ट्रातही भाजपला 'फ्रीबीज'चा फायदा होईल का?

‘एक्सचेंज’ अर्जांची विक्री करून ग्राहकांची लूट

By admin | Published: November 17, 2016 12:04 AM

पाचशे व हजारांच्या नोटा ‘एक्सचेंज’साठी आवश्यक अर्जांचीही दोेन रूपयांत विक्री केली जात असल्याचा प्रका....

आयडीबीआय शाखेतील प्रकार : एटीएममधून ५०० रूपयेच काढण्याची सक्तीअमरावती : पाचशे व हजारांच्या नोटा ‘एक्सचेंज’साठी आवश्यक अर्जांचीही दोेन रूपयांत विक्री केली जात असल्याचा प्रकार बुधवारी शहरातील न्यू स्वस्तिकनगरातील आयडीबीआय बँकेच्या शाखेत उघडकीस आला. पाचशे व हजारांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय केंद्रशासनाने घेतल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. काही अवधीपर्यंत जुन्या नोटा बदलण्याची प्रक्रिया बँकांमध्ये सुरू आहे. नोटांच्या अदलाबदलीसाठी बँकांमार्फत एक अर्ज दिला जातोे. संबंधिताच्या कुठल्याही एका ओळखपत्राची झेरॉक्स प्रत देऊन संबधित बँक जुन्या नोटांच्या बदलात नव्या नोटा ग्राहकांना देते. मात्र, शहरातील न्यू स्वस्तिकनगरातील आयडीबीआय बँकेत नोटा बदलण्याकरिता गेलेल्या नागरिकांना मात्र, बँकेद्वारे अर्ज न देता नजीकच्याच एका व्यापारी प्रतिष्ठानात पाठवून तेथून अर्ज घ्यायला सांगितले जाते. ग्राहक त्याठिकाणी गेल्यानंतर तेथे त्यांना दोन रूपये देऊन अर्ज विकत घेण्यास सांगितले जाते. एटीएममधूनही केवळ पाचशे रुपयेच काढण्याची सक्ती बँकेने केली आहे. त्यामुळे नागरिकांची चांगलीच गोची झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चलनातून पाचशे व हजारांच्या नोटा बाद केल्यापासून अमरावतीकरांची प्रचंड ताराबंळ उडाली आहे. मागील पाच दिवसांपासून शहरात केवळ नोटांचीच चर्चा सुरु आहे. नोटा बदलविण्यासाठी बँकांच्या रांगेत उभे राहणे, एटीएममध्ये पैसे नसणे, आदी समस्यांमध्ये ग्राहक अडकले आहेत. दैनंदिन गरजांसाठी लागणारा पैसा मिळावा, या उद्देशाने बहुंताश नागरिक बँका व एटीएममध्ये जात आहेत. मात्र, बँकामधील रांगा व एटीएममध्ये निर्माण झालेल्या पैशांच्या तुटवड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. आवश्यक तेवढे पैसे मिळत नसल्यामुळे नागरिकांची बरीचशी कामे अडकून पडली आहेत. शिलांगण मार्गावरील आयडबीआय बँकेत हे चित्र दिसून आले. नागरिकांना पाचशे व हजारांच्या नोटा बदलून दिल्या जात आहेत. मात्र, त्यासाठी ग्राहकांना इतर बँकांमध्ये मोफत मिळणारा अर्ज देखील या बँकेत उपलब्ध नव्हता. तो शेजारच्या एका व्यापारी प्रतिष्ठानामार्फत दोन रूपयांना विकत घ्यावा लागत होता. आधीच चिल्लरचा तुटवडा असताना अर्ज घ्यावा तरी कसा, असा प्रश्न अनेकांना पडत आहे. त्यातच आयडीबीआयच्या एटीएममधून केवळ पाचशे रुपये काढण्यास परवानगी दिली जात आहे. एटीएममधून एकावेळी दोन हजार रुपये काढण्यास शासनाने परवानगी दिली असताना आयडीबीआयच्या एटीएमवर केवळ पाचशे रुपये काढण्यास सुरक्षा रक्षकांकडून सांगण्यात येत आहे. या प्रकारामुळे शासनाने ठरवून दिलेली रोख सुध्दा नागरिकांना मिळत नाही. बँकांनी नोटा एक्सचेंज करण्यासाठी अर्जाची झेरॉक्स नागरिकांना दिली तर चालेल. मात्र, त्या अर्जाची विक्री होत असेल तर संबंधित शाखेला सूचना देण्यात येईल. - सुनील रामटेके, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक. संबंधित शाखेला अर्जपुरवठा करण्यात आला आहे. मात्र, संबंधित शाखेतून अर्ज घेण्यास नागरिकांना दुसरीकडे पाठविले जात असेल तर हा प्रकार थांबविण्याच्या सूचना देण्यात येतील. - प्रदीप गायकवाड, व्यवस्थापक, आयडीबीआय