शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

फेसबुकवर प्रेम, लग्न अन् तीन आठवड्यांत विस्कोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2018 18:16 IST

तो मोर्शी शहरातील दुर्गानगरचा रहिवासी, तर ती धामणगाव गढी (ता. अचलपूर) ची. फेसबुकवर चॅटिंग करताना विचार जुळले, मन जुळले आणि जातीसह सर्व भेद दूर सारून ते प्रेमात एकरूप झाले.

- गोपाल डहाकेमोर्शी (अमरावती) : तो मोर्शी शहरातील दुर्गानगरचा रहिवासी, तर ती धामणगाव गढी (ता. अचलपूर) ची. फेसबुकवर चॅटिंग करताना विचार जुळले, मन जुळले आणि जातीसह सर्व भेद दूर सारून ते प्रेमात एकरूप झाले. लग्नानंतर मात्र जातीचा, रूपाचा मुद्दा समोर आला. त्यामुळे तीन आठवड्यांतच तिच्या लग्नाचा विस्कोट होण्याच्या उंबरठ्यावर आहे. मला नांदायचे आहे, अशी मागणी तिने मोर्शी पोलिसांकडे केली आहे.धामणगाव गढी येथील १९ वर्षीय ऐश्वर्या (कल्पनिक नाव) चे फेसबूकवर मोर्शी शहरातील दुर्गानगर येथील रहिवासी अभिजित सुधाकर ठाकरे (२९) याच्याशी ११ महिन्यांपूर्वी मैत्री झाली. भेटीगाठी वाढल्यानंतर त्यांच्यातील भेद गळून पडले. त्यामुळे तिने त्याला लग्नाची गळ घातली. तो जुमानत नसल्याचे पाहून मोर्शी पोलीस ठाणे गाठले. हे समजताच तिची मनधरणी करीत त्याने पथ्रोट येथील आर्यसमाज मंदिरात लग्न केले. मात्र, त्याच वेळी १७ महिने आईकडे राहण्याची लेखी अट तिच्याकडून १०० रुपयांच्या मुद्रांकावर घेतली. एवढेच नव्हे तर तिने नकार देताच अभिजितने शिवीगाळ करीत थप्पड लगावल्या आणि पट्ट्याने मारण्याची धमकीही दिली. त्यामुळे ती धामणगावला निघून गेली. इकडे अभिजितने आईच्या कानावर सदर प्रकार घालताच ठाकरे कुटुंबीयांचे धाबे दणाणले. त्याची आई माजी भाजप तालुकाध्यक्ष असल्याने राजकीय दबाव आणला गेला. याशिवाय मुलगी खाटीक, तर अभिजित हा कुणबी समाजाचा. त्यामुळे हे प्रकरण जातीय वळणावर गेले. अभिजितला फितवून हे लग्न मोडायचेच, असा चंग ठाकरे कुटुंबीयांनी केला होता. याची भनक मुलीला पडताच तिने १८ मे रोजी तडक दुर्गानगर गाठले. दरम्यानच्या काळात अभिजित पसार झाला, तर सासू-सासरे घरात घेण्यास तयार नसल्याने तिने ठाकरे कुटुंबाच्या घरासमोर डेरा टाकला आहे. १ व ३ जून रोजी भर पावसात ती तेथेच होती. मला माझ्या नवऱ्यासोबत नांदायचे आहे, अशी तिची एकमेव मागणी आहे.दरम्यान, तीन आठवड्यातच लग्न मोडीत निघालेल्या या युवतीने १ जून रोजी पोलीस ठाणे गाठून पती, सासू, सासरे यांच्याविरुद्ध शिवीगाळ व शारीरिक-मानसिक छळ करून त्रास दिल्याची तक्रार दिली. पोलिसांनी भादंविचे कलम ४९८ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाकडे मोर्शीकरांचे लक्ष लागले आहे.मला नांदायचे आहेमला माझ्या आई-वडिलांनी या प्रकरणानंतर घराबाहेर काढले आहे. अभिजितशी कायदेशीर लग्न झाले आहे आणि त्याच्यासोबत संसार करायचा आहे. पोलीस तरी मानवीय दृष्टिकोनातून या प्रकरणात न्याय देतील, अशी अपेक्षा ऐश्वर्याने सदर प्रतिनिधीकडे व्यक्त केली.

टॅग्स :Facebookफेसबुक