शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार"; बिहारमधून PM मोदींचा इशारा
2
फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; पहलगाम हल्ल्यातील पीडितांनी सांगितली आपबीती
3
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
4
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
5
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
6
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
7
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
8
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
9
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
10
IPL 2025: दिल्ली कॅपिटल्सचा युवा स्टार म्हणतो- "मला टीम इंडियाकडून खेळायचंय, पण..."
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
12
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
14
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
15
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
16
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
17
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
18
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
19
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
20
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?

Gandhi Jayanti Special : ...अन् राष्ट्रसंतांच्या भजनाने गांधीजींचेही मौन सुटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2023 12:28 IST

राष्ट्रपिता-राष्ट्रसंतांची प्रथम भेट, सेवाग्राम आश्रमात एक महिना मुक्काम

संदीप राऊत 

तिवसा (अमरावती) : 

‘एक दिन जाना गांधीजी ने मेरा भजन अप्रतिमसे

वह कह गये, फिरसे कहो, रहते हुए भी मौनसे

हसते कहा फिर दुसरे दिन, मौन मेरा छूट गया

मै मस्त होने पर भजन मे, ख्याल से भी हट गया’

वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या वाङ्मयातील ही आठवण त्यांच्या भजनातील माहात्म्य अधोरेखित करते. १४ जुलै १९३६ रोजी वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम आश्रमात राष्ट्रपिता व राष्ट्रसंत या दोन महान विभूतींची प्रथमच भेट झाली. राष्ट्रसंतांना पाहताच महात्मा गांधी प्रभावित झाले होते. हे कुणी साधू-संत नसून देश कल्याणासाठी आपले जीवन समर्पित करणारे व समाजप्रबोधन करणारे महान युगप्रवर्तक असल्याची प्रचीती महात्मा गांधी यांना पहिल्या भेटीतच आली होती.

२४ फेब्रुवारी ते ५ मार्च १९३५ दरम्यान तुकडोजी महाराजांनी सालबर्डीच्या घनदाट जंगलात महारुद्र यज्ञाचे आयोजन केले होते. यामध्ये दहा लाखांवर महिला-पुरुषांना अन्नदान करण्यात आले; परंतु काही समाजकंटकांना महाराजांची समाजसेवा पचनी पडली नाही. त्यामुळे त्यांनी महाराजांच्या पावन कार्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

तुकड्याबुवा धनदांडग्यांकडून जमा केलेल्या धान्याची जंगलात वायफळ उधळण करीत बुवाबाजी करीत असल्याचा आरोप करण्यात आला. सत्यता जाणून घेण्यासाठी गांधीजींनी नागपूर येथील काँग्रेस नेते बाबूराव हरकरे व शंकरराव टिकेकर यांना आदेश देऊन महाराजांना सेवाग्राम आश्रमात येण्यासाठी संदेश पाठवला. प्रथम भेटीतच काहीही संवाद न साधता महाराजांबद्दल पसरविण्यात आलेला गैरसमज गांधीजींच्या मनातून चुटकीसरशी दूर झाला. एक महिन्याच्या सान्निध्यानंतर महाराजांनी सेवाग्राम आश्रमाचा निरोप घेतला त्यावेळी अतिशय जड अंतःकरणाने गांधीजी व आश्रमातील सेवेकऱ्यांनी महाराजांना अनुमती दिली. त्यावेळी गांधीजींनी महाराजांना एक चरखा भेट दिला.

म्हणूनच महाराज म्हणतात,

‘मै गांधीजी का नही शिष्य रहा,

ना गांधी कही मेरे भक्त रहे

पर प्रेम था हम दोनो मे बडा,

वह मिटा न सका कोई लाख कहे’

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधीRashtrasant Tukadoji Maharajराष्ट्रसंत तुकडोजी महाराज