शहरं
Join us  
Trending Stories
1
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
2
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
3
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
4
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
5
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
6
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
7
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
8
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
9
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
10
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
11
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
12
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
13
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
14
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
15
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
16
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
17
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
18
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
19
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
20
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू

मुख्यमंत्र्यांच्या दत्तक गावातील कुपोषित बालक दगावले

By admin | Published: July 03, 2017 12:29 AM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या मेळघाटातील चार गावांपैकी घोटा गावातील कुपोषित बालक आठवडाभर

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या मेळघाटातील चार गावांपैकी घोटा गावातील कुपोषित बालक आठवडाभर औषधोपचार घेतल्यानंतर शनिवारी रात्री दगावले. या कुपोषित बालकाचे प्राण वाचविण्यात शासकीय यंत्रणा ‘फेल’ ठरली आहे. सुमित बालकराम जांबेकर (५) असे मृत बालकाचे नाव आहे.मुख्यमंत्री फडणवीस यांनी सन-२०१५ मध्ये मेळघाटातील घोटा, भुलोरी, राणामालूर व बेसावर्डा ही चार गावे कुपोषणमुक्तीसाठी दत्तक घेतली होती. या चारही गावांवर मुख्यमंत्र्यांसह आयएएस अधिकाऱ्यांचे विशेष लक्ष होते. दरम्यान मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव प्रवीणसिंह परदेशी देखील सातत्याने मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या गावांवर सूक्ष्म लक्ष ठेवून होते. मात्र, मागील आठडवड्यात सुमित जांबेकर याला कुपोषणाने ग्रासल्याने त्याच्यावर प्रारंभी हरिसाल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आलेत. मात्र, त्याची प्रकृती गंभीर असल्याने हरिसाल प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांनी पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रूग्णालयात १४ जून रोजी पाठविले. परंतु या बालकाची प्रकृती अतिशय गंभीर असल्याने त्याला नागपूर येथे शासकीय मेडिकल रूग्णालयात १६ जून रोजी उपचारासाठी पाठविले. तेथे त्याच्यावर १६ ते २१ जूनदरम्यान मेडिकलमध्ये नियोजनबद्धपणे उपचार सुरू झालेत. पाच दिवसांनंतर बालकाची प्रकृती सुधारताच त्याच्या आई-वडिलांनी २२ जून रोजी नागपूर येथील शासकीय मेडिकल रूग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना काहीही न कळविता बाळाला घेऊन परस्पर घोटा गाव गाठले. त्यानंतर त्याच्या आई-वडिलांनी या बालकावर पारंपरिक पद्धतीने भूमकाद्वारे उपचार सुरू केलेत. मात्र, या बालकाची प्रकृती फारच ढासळली असल्याचे हे वृत्तपत्रांमधून प्रकाशित झाले. पुन्हा आरोग्य यंत्रणा जागी झाली आणि कुपोषित बालकाला अमरावतीच्या ‘होप’ या खासगी रूग्णालयात २४ जून रोजी उपचारासाठी दाखल केले. जिल्हाधिकाऱ्यांचा होता सूक्ष्म ‘वॉच’अमरावती : आठ दिवसांच्या उपचारानंतर शनिवारी १ जुलै रोजी उशिरा रात्री १ वाजता प्राणज्योत मालवली. आई-वडिलांचे अज्ञान, आरोग्य यंत्रणांचे दुर्लक्ष आदींमुळे सुमितला प्राण गमवावे लागले, हे विशेष.सुमित जांबेकर (साडेपाच वर्षे) याकुपोषित बालकाचे प्राण वाचावेत, यासाठी जिल्हाधिकारी अभिजित बांगर हे स्वत: सूक्ष्म लक्ष ठेवून होते. नागपूर मेडिकलमधून सुमितला त्याचा आई-वडिलांनी उपचाराविनाच परत आणले. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी उपचार करण्यासाठी त्याला पुन्हा अमरावतीत आणले. सुमितची प्रकृती गंभीर असल्याने त्याला खासगी रुग्णालातील अतिदक्षता विभागात ठेवले. सुमितचे प्राण वाचविण्यासाठी जिल्हाधिकारी अभिजित बांगर, सीएस अरुण राऊत यांनी शर्थीचे प्रयत्न चालविले. मात्र, परिस्थिती हाताबाहेर गेली अन् सुमित दगावला.