शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
2
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?
3
जिंकलंस मित्रा! वकील बनून लढला स्वत:च्या किडनॅपिंगची केस, १७ वर्षांनंतर ८ गुन्हेगारांना शिक्षा
4
ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना
5
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
6
58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा
7
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
8
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
9
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
11
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
12
तिरुमला तिरुपती लाडू वाद: प्रकाश राज यांचा DCM पवन कल्याण यांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
13
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
14
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
15
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
16
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठीच्या अनुदानात वाढ
18
TV वर खूप नाव कमावलं पण मोठ्या पडद्यावर चालली नाही जादू; प्रसिद्ध अभिनेत्याला ओळखलं का?
19
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
20
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)

‘मॅन्युअल’ हजेरी, चुकीची वेतनबिले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 10:12 PM

महापालिकेच्या कर्मचाºयांची उपस्थिती अद्याप हजेरी पत्रकावर नोंदविली जात असल्याने बायोमेट्रिक पद्धतीला हरताळ फासला आहे.

ठळक मुद्दे‘बायोमेट्रिक’ला बाय : मनपा कर्मचाºयांची हजेरी अद्यापही लेखीच

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महापालिकेच्या कर्मचाºयांची उपस्थिती अद्याप हजेरी पत्रकावर नोंदविली जात असल्याने बायोमेट्रिक पद्धतीला हरताळ फासला आहे. कर्मचाºयांची हजेरी, त्यांचे वेतन व भत्त्यांची मोजदाद अजूनही ‘मॅन्युअल’ पद्धतीने केली जात आहे. त्यामुळे पुन्हा याबाबतचे आदेश काढले जाण्याचे संकेत आहेत.‘मॅन्युअल’ पद्धतीने वेतनाच्या नोंदी घेतली जात असल्याने चुकीचे वेतन निघत असल्याची कर्मचाºयांची ओरड आहे. महापालिकेत सन २०१४ पासून बायोमेट्रिक मशिन लावण्यात आल्यात. तूर्तास महापालिकेच्या १३ विभागात २६ बायोमेट्रिक मशिन आहेत. यात स्वच्छता निरीक्षक आणि सफाई कामगार वगळता महापालिकेच्या आस्थापनेवरील सर्व अधिकारी व कर्मचारी समाविष्ट आहेत. यात सर्वांची हजेरी-गैरहजेरी नोंदविली जाते. सामान्य प्रशासन विभाग आणि लेखा विभागावरील कामाचा भार कमी करण्यासाठी बायोमेट्रिक मशिनमध्ये संकलित डाटाच्या माध्यमातून सर्व कर्मचाºयांचे वेतन होणे अपेक्षित असताना अद्यापपर्यंत हे काम फत्ते झालेले नाही. त्यामुळे बायोमेट्रिक मशिन पांढरा हत्ती ठरण्याची भीती व्यक्त होत आहे. संगणक विभागाकडून दर महिन्याला हजर-गैरहजरचा डाटा सामान्य प्रशासन विभागाकडे पाठविला जातो. मात्र, त्यानंतर पगारपत्रकाचे ‘सॉफ्टवेअर’ बंद राहत असल्याने ‘मॅन्युअल’ पद्धतीनेच अधिकारी, कर्मचाºयांचे वेतन काढले जाते. त्यासाठी पहिला पंधरवडा निघून जातो. बायोमेट्रिक ‘थंब’ असतानाही प्रत्येक विभागाकडून त्यांच्या अधिनस्थ कर्मचाºयांचा हजेरीपट मागविला जातो व त्यानंतर वेतनाच्या प्रक्रियेला वेग येतो. आयुक्तांनी मनपातील सर्व कर्मचाºयांना बायोमेट्रिक हजेरी व त्याच डाटावरून वेतन करण्याचे आदेश दिले होते.बायोमेट्रिकचा फार्स कशासाठी ?महापालिकेचे पाचही झोन, आरोग्य, नगरसचिव, सामान्य प्रशासन विभाग, लेखाविभाग, शिक्षण विभाग, बाजार व परवाना विभाग आणि आरोग्य विभागात २६ बायोमेट्रिक मशिन्स लावण्यात आल्या आहेत. महापालिकेच्या दवाखान्यातही १४ मशिन लावण्यात आल्या आहेत. मात्र, त्यानंतरही सर्व कर्मचाºयांना हजेरीपटावर स्वाक्षरी करावी लागते. त्यामुळे बायोमेट्रिकचा फार्स कशासाठी, असा संतप्त सवाल कर्मचाºयांनी उपस्थित केला आहे.वेतनबिलात चुकाच चुकासामान्य प्रशासन विभागातील कर्मचाºयांकडून पगारपत्रके बनविली जातात. मात्र, तीन ते चार महिन्यांपासून अनेकांची पगारबिले चुकत असल्याची तक्रार कर्मचाºयांनी केली आहे. वेतनबिलात त्रुटी निघत असल्याने अनेक कर्मचाºयांचे दोन महिन्यांपासून वेतन झालेले नाही. विशेष म्हणजे चूक मान्य करण्यास कुणीही तयार नसल्याने कर्मचारी मात्र घायकु तीस आले आहेत.