शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

बेपत्ता आकाशचा इंदूरमध्ये मृत्यू, ‘मानवी तस्करी’चा उलगडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2023 14:16 IST

पाच महिन्यांनंतर धागेदाेरे : जानेवारी अखेरीस मिसिंगची तक्रार

अमरावती : फेब्रुवारी महिन्यात येथे उघड झालेल्या ‘मानवी तस्करी’ प्रकरणातील आकाश वेरूळकर याचा १ फेब्रुवारी रोजीच मध्यप्रदेशातील इंदूर येथे आकस्मिक मृत्यू झाल्याचे तब्बल सव्वा पाच महिन्यांनंतर उघड झाले. गुन्हे शाखेने बुधवारी हा उलगडा केला. २९ जानेवारी रोजी आकाश वेरूळकर (२५, रा. महात्मा फुलेनगर, नवसारी, अमरावती) हा घरून बेपत्ता झाल्याची नोंद गाडगेनगर पोलिसांनी घेतली होती.

येथील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिला राजस्थानी कुटुंबाला विकण्यात आले. एका राजस्थानी व्यक्तीशी बळजबरीने तिचा विवाह लावून देण्यात आला; मात्र दहा दिवसांनंतर तिने तेथून पळ काढून अमरावती गाठले. त्यानंतर मानवी तस्करी अर्थात ह्यूमन ट्रॅफिकिंगचा हा धक्कादायक प्रकार उघड झाला होता. याप्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी १४ फेब्रुवारी रोजी पाच जणांविरुद्ध अपहरण व मानवी तस्करीचा गुन्हा दाखल केला.

ती अल्पवयीन मुलगी आकाश वेरूळकर याच्यासोबत २७ जानेवारी रोजी इंदूरला गेल्याचे तपासात समोर आले होते. मात्र, तेथे गेल्यानंतर दोघांमध्ये फाटाफूट झाली. त्यामुळे २७ पासूनच बेपत्ता असलेल्या आकाशच्या शोधार्थ पोलिसांचे विविध पथके इंदूरसह, बऱ्हाणपूर, रतलाम गेले होते. मात्र, त्या वेळी त्याचा शोध लागू शकला नव्हता.

आकाशसोबत गेलेली मुलगी परतली

दरम्यान, आकाशसोबत गेलेली १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी १२ फेब्रुवारी रोजी घरी परतल्याची माहिती गाडगेनगर पोलिसांना मिळाली होती. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात एका महिलेने आपणास अमरावतीच्या बसस्थानक परिसरातून भूलथापा देऊन रतलाम येथे नेले. आरोपींनी आपल्याला पैशांचे आमिष दाखवून राजस्थानला चार ते पाच लाखांमध्ये विकले. तत्पूर्वी, त्यांनी मध्य प्रदेशातील रतलाम येथे आपले लग्न लावून दिले. रतलाम येथे लग्न लागत असताना आकाशसोबत असल्याची कबुली तिने दिली होती.

मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्याने

गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरिक्षक महेंद्र इंगळे हे या प्रकरणाचा तपास करत असताना इंदूरनजीकच्या एका पोलीस ठाण्यात मर्ग दाखल असल्याची माहिती त्यांना मिळाली. तेथे जाऊन तपास केला असता, ती नोंद आकाश वेरूळकरची असल्याचे लक्षात आले. १ फेब्रुवारी रोजी त्याचा मृतदेह इंदूरनजीक आढळून आला होता. इंगळे यांनी पीएम रिपोर्ट पाहिला असता त्याचा मृत्यू कार्डियक अटॅकने झाल्याचे स्पष्ट झाले. सबब, आकाशचा मृत्यू नैसर्गिक असल्याचे निष्पन्न झाल्याचे इंगळे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAmravatiअमरावती