शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

चार कोटी आठ लाख रुपयांच्या गहाण वस्तू शेतकऱ्यांना परत

By admin | Published: November 11, 2015 12:19 AM

सुमारे ५ हजार ५२ शेतकऱ्यांना शासनाच्या कर्जमुक्ती योजनेतून लाभ मिळाला आहे.

सावकारी पाश : २ हजार ३५१ शेतकऱ्यांना लाभअमरावती : सुमारे ५ हजार ५२ शेतकऱ्यांना शासनाच्या कर्जमुक्ती योजनेतून लाभ मिळाला आहे. यामध्ये २ हजार ३५१ शेतकऱ्यांना ४ कोटी ८ लाख रुपये किमतीच्या वस्तू परत करण्यात आल्या आहेत. मागील काही वर्षांत शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट कोडमडले आहे. कृषी उत्पादकांवर स्थिर किंवा घसरलेल्या किमती आणि शेतीचा वाढलेला खर्च या दृष्टकाळात शेतकरी अडकले. मान्सूनची अनियमितता किंवा नैसर्गिक आपत्तीने त्यांच्या संकटात अधिक भर टाकली. शेतकरी मोठ्या प्रमाणावर आर्थिक संकटात सापडला आणि आत्महत्येच्या घटना घडू लागल्या. २०१४ मध्ये पावसाच्या अनियमिततेने खरीप पिकांचे नुकसान झाले. सोबतच रबी हंगामासाठी शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागले. मागील वर्षी २०९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबले होते. परवानाधारक सावकारांकडून कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झाली. पण अवैध सावकारीचा पाश कायम आहे. जिल्ह्यात एकूण ४४७ परवानाधारक सावकार आहेत. ३० नाव्हेंबर २०१४ अखेरपर्यंत कर्जदारांना १०१ कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले होते. राज्य शासनाने १० एप्रिलला विदर्भ आणि मराठवाड्यातील परवानाधारक सावकारांकडून कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्जमाफ करण्याचा निर्णय घेतला होता. आॅक्टोबर अखेर ५ हजार ५२ कर्जदारांना ११ कोटी ४२ लाख रुपये सावकारी जिल्हास्तरीय समितीने मंजुरी दिली. त्यापैकी २ हजार ५५१ शेतकऱ्यांना ४ कोटी ८ लाखांच्या किमती वस्तू परत करण्यात आल्या आणि त्यांना सावकारी कर्जातून मुक्त करण्यात आले, अशी माहिती सूत्रांनी दिली. जिल्ह्यात २०१४-१५ या वर्षात १ हजार ६२२ कोटींचे खरीप कर्जवाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी १ लाख २१ हजार शेतकऱ्यांना १ हजार २१९ कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले होते. (प्रतिनिधी)