शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकारणात भूकंप होणार? "अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील"; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
2
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
3
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
4
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
5
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
6
Mumbai Rain: मुंबईच्या पूर्व उपनगरात तुफान पाऊस; भांडूप, मुलुंडमध्ये रस्त्याला आलं नदीचं रुप!
7
शेतकऱ्यांना मिळणार नवरात्रीला गिफ्ट, 'या' तारखेला PM Kisan योजनेचे पैसे जमा होणार!
8
"मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, पण…’’ अजित पवार यांनी सांगितली नेमकी अडचण  
9
कोहली-रोहितला 'स्पेशल ट्रीटमेंट'? माजी क्रिकेटर थेट BCCI वर कडाडला
10
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
11
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
12
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
13
मनू भाकरचे नेटकऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर; त्या घटनेवरुन ट्रोल करणाऱ्यांना सांगितला देशहिताचा विचार
14
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
15
'लाडकी बहीण' योजनेत ६ 'लाडक्या भावां'चे अर्ज; 'असा' लागला शोध, कठोर कारवाई होणार
16
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?
17
Akshay Shinde Encounter News अक्षय शिंदे एन्काउंटरप्रकरणी कोर्टाने पोलिसांना विचारले हे १० प्रश्न; न्यायाधीशांना ५०० राउंड फायर केल्याचा अनुभव
18
“२ महिने राहिले, राज्यात सरकार बदलल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नाही”; शरद पवारांचा निर्धार
19
क्रूरतेचा कळस! सहावीतील मुलाला शिक्षकाने काठी फेकून मारली, विद्यार्थ्याची दृष्टी गेली
20
'शरद पवार दैवत'ने अजित पवारांचं वाढवलं टेन्शन, सुप्रीम कोर्टात पोहोचलं प्रकरण

पीककर्ज वाटपात राष्ट्रीयीकृत बँकांचा हात आखुडता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 4:11 AM

अमरावती : खरिपाला सुरुवात होऊन दीड महिना झाला असला तरी राष्ट्रीयीकृत बँकांचा पीककर्ज वाटपात हात आखुडता आहे. अमरावती विभागात ...

अमरावती : खरिपाला सुरुवात होऊन दीड महिना झाला असला तरी राष्ट्रीयीकृत बँकांचा पीककर्ज वाटपात हात आखुडता आहे. अमरावती विभागात सद्यस्थितीत ४,१६,५२३ शेतकरी खातेदारांना ३,६०९ कोटींचे कर्जवाटप करण्यात आले. ही ५२.४९ टक्केवारी आहे. यात जिल्हा बँकेचा टक्का ८४.२९ असताना व्यापारी बँकांनी लक्ष्यांकाच्या तुलनेत ३४.४५ टक्केच वाटप केलेले आहे.

विभागात अकोला जिल्हा वगळता उर्वरित जिल्ह्यात खरिपाची ८० टक्क्यांवर पेरणी आटोपली आहे. काही भागात दुबार पेरणीचे संकट ओढावल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट ओढावले आहे. अशा परिस्थितीत बियाण्यांसह रासायनिक खतांसाठी पीककर्जाची निकड असताना राष्ट्रीयीकृत बँका शेतकऱ्यांना माघारी पाठवित आहे.

विभागीय सहनिबंधक कार्यालयाच्या अहवालानुसार जिल्हा बँकेने आतापर्यंत २,४७,६५४७ शेतकऱ्यांना ३,९८,७०० हेक्टरसाठी १,९०९.१६ कोटींचे वाटप केलेले आहे. ही सर्वाधिक ८४.२९ टक्केवारी आहे. यामध्ये अमरावती जिल्ह्यात ३६२.६३ कोटी म्हणजेच ८९.५४ टक्के, अकोला जिल्ह्यात ४५९.२२ कोटी (८३.२४ टक्के), वाशिम जिल्ह्यात ४४९.७७ कोटी ( ७४.३४ टक्के), बुलडाणा जिल्ह्यात ३९.६५ कोटी (६०.०८ टक्के) व यवतमाळ जिल्ह्यात उच्चांकी ५९७.८७ कोटी (९३.७१ टक्के) कर्जवाटप केले आहे.

बॉक्स

जिल्हानिहाय कर्जवाटपाची स्थिती

अमरावती जिल्ह्यात आतापर्यंत ७१६.८७ कोटी (५९.७४ टक्के), अकोला जिल्ह्यात ६७८.१४ (५९.१४ टक्के), वाशिम जिल्ह्यात ६०२.१९ कोटी ( ५८.७५ टक्के), बुलडाणा जिल्ह्यात ४५६.४७ कोटी (३५.११ टक्के) व यवतमाळ जिल्ह्यात ११५५.३२ कोटी म्हणजेच ५२.४९ टक्के कर्ज वाटप करण्यात आलेले आहे. खरीप कर्ज वाटपाचे १०० दिवस झाले असताना व्यापारी बँकांचा वेग अद्याप वाढलेला नसल्याचे दिसून येते.