शहरं
Join us  
Trending Stories
1
आजवर गावे बहिष्कार टाकत होती, आता शहरानेच मतदानावर बहिष्कार टाकला; का? 
2
'या' विधानसभा मतदारसंघावरून भाजपमध्येच मोठं घमासान, मुनगंटीवार थेट दिल्ली गाठणार
3
विधानसभेसाठी भाजपाकडून उमेदवारांची निर्यात, हे पाच नेते महायुतीतील मित्रपक्षांकडून लढणार
4
Pratap Patil Chikhalikar: २० वर्षात चिखलीकरांनी पाचव्यांदा बदलला पक्ष, असा आहे इतिहास
5
"माझी लढाई त्यापेक्षा मोठी...", आदित्य ठाकरेंसोबतच्या तुलनेवर अमित ठाकरे थेट बोलले!
6
अरे देवा! मजुरी करून बायकोला शिकवलं, नोकरी लागल्यावर तिने नवऱ्यालाच सोडलं, म्हणाली...
7
“वरळी विकासापासून वंचित, आदित्य ठाकरेंचा परतीचा प्रवास सुरु”; शिंदे गटाची खरमरीत टीका
8
इच्छुकांसोबत चर्चेदरम्यान मनोज जरांगेंच्या डोळ्यात तरळले अश्रू; २५ तास चालल्या मुलाखती
9
Stock Market Today : शेअर बाजार जोरदार आपटला, Sensex ८० हजारांच्या खाली; गुंतवणूकदारांचे ८ लाख कोटी बुडाले, कारण काय?
10
अजित पवारांच्या आमदाराची मोठी घोषणा; तिसऱ्या आघाडीत प्रवेश, तिकीटही मिळाले
11
"मान ताठ करुन फिरेल असा..."; युगेंद्र पवारांच्या आव्हानावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
12
वरळीत तिरंगी सामना रंगणार, शिंदेगट आदित्य ठाकरेंविरोधात मिलिंद देवरांना उतरवणार?
13
पुण्याच्या मैदानात Mitchell Santner ची हवा; पहिल्या डावात टीम इंडियानं केल्या फक्त १५६ धावा
14
Reliance Bonus Share : Reliance Industries देतेय एकावर एक शेअर फ्री; गुंतवणूकदारांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा
15
“आदित्य ठाकरेंविरोधात एकनाथ शिंदेंनी स्वतः उभे राहावे किंवा जय शाहांनाच आणावे”: संजय राऊत
16
जळगावमध्ये गेल्या विधानसभेत विरोधात, आता सोबत करताहेत प्रचार
17
Girish Mahajan : "सर्व बंडखोरांची समजूत घालू, जिल्ह्यात एकाही ठिकाणी बंडखोरी होणार नाही"
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीत प्रवेश करताच झिशान सिद्दिकी यांना तिकीट, अजित पवार गटाची दुसरी यादी जाहीर
19
अजित पवारांचा धूमधडाका; भाजपाच्या ३ बड्या नेत्यांचा पक्षप्रवेश अन् उमेदवारीही केली जाहीर
20
बापरे! बँकेच्या लॉकरमधून ४० लाखांचे दागिने गायब; फोन येताच महिलेला बसला मोठा धक्का

रात्रीचा प्रवास, ट्रॅवल्स-हॉटेल्सची फिक्सिंग, प्रवाशांना निकृष्ट जेवण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2023 2:00 PM

मनमानी दराने आकारणी; प्रशासनाची मुकसंमती, प्रवासी हैराण

मनीष तसरे

अमरावती : लांब पल्ल्याच्या ट्रॅव्हल्स सहसा रात्री प्रवाशांच्या जेवणाकरिता ठरलेल्या हॉटेल किंवा ढाब्यावर थांबतात. मात्र अनेकदा प्रवाशांची हॉटेल संचालकडून चढ्या दरात जेवण अथवा खाद्यपदार्थांची विक्री करून आर्थिक लूट होताना ‘लोकमत’च्या प्रतिनिधीने सोमवारी रात्री केलेल्या प्रत्यक्ष पाहणीत लक्षात आले. मात्र, असे असताना प्रशासन मात्र यांच्यावर कुठलीच कारवाई करत नाही.

ट्रॅव्हल्स चालकांचे ‘फिक्स’ असलेल्या हाॅटेलवर त्यांचा थांबा असतो. ट्रॅव्हल्स ज्या हॉटेल्सवर थांबतात तिथे त्या प्रवाशांच्या जेवणाकरिता जास्तीत जास्त अर्धा तास थांबतात. अशावेळी बऱ्याच जणांसोबत लहान मुले असतात, तर कधी वृद्ध असतात. अनेक जण कमीत कमी खर्चात जेवण कसे होईल हेच बघतात. अशावेळी जवळपास दुसरे हॉटेल अथवा ढाबा राहत नाही. असले तरी लांब अंतरावर असते. त्या हॉटेलवर जेवणासाठी गेलो अन ट्रॅव्हल्स निघून जाईल, याचीच भीती असते. मात्र, भूक लागलेली असते, कधी छोटी मुले हट्ट करतात. पटकन जेवण करायचे नाहीतर गाडी निघेल. ही पण काही कारणे आहेत. त्यामुळे प्रवास ज्या प्रकारचे जेवण वा फूडस् आहे, त्या भावात विकत घेतात. काहीही प्रश्न किंवा छापील किंमत बघत नाही, हे वास्तव आहे.

‘लोकमत’ ने काय पाहिले?

सोमवारी रात्री वाजताच्या १०च्या सुमारास बडनेरा ते अकोला राष्ट्रीय महामार्गावरील एका हॉटेलची प्रत्यक्ष पाहणी केली असता त्या ठिकाणी १२ वाजेपर्यंत लांब पल्ल्याच्या मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या २५ ट्रॅव्हल्स थांबल्या. या ठिकाणी दुसरे कुठलेही हॉटेल वा ढाबा नसल्याने प्रवाशांना दुसरा पर्याय उपलब्ध नव्हता. या ट्रॅव्हल्समधील अनेक प्रवाशांनी या हाॅटेलमध्ये जेवण केले. जेवणानंतर अनेकांनी बिलासंबंधी विचारणा केली असता दरामध्ये बराच फरक आढळून आला. मात्र अनेकांना पुढचा प्रवासाला जायचे असल्याने कोणताही वाद अथवा वेळ न घालवता निघून गेले

पाण्याची बॉटल २० रुपये

अमरावती-अकोला मार्गावरील एका हॉटेलवर रात्री लांब पल्ल्याच्या अनेक ट्रॅव्हल्स येथे थांबतात. काही प्रवासी या ठिकाणी येथे जेवण करतात, तर काही प्रवासी चहा-पाणी घेतात. मात्र या ठिकाणी पाण्याची बॉटेल २० रुपयाला मिळते. बॉटलवर छापील किमत ही १५ रुपये एवढीच आहे, हे पाहणीत लक्षात आले. बाॅटल चिलिंगच्या नावावर या ठिकाणी नी प्रवाशांची लूट होत असल्याचे या ठिकाणी दिसून आले.

स्वच्छता नाहीच

नागपूर, अमरावतीहून पुढे नाशिक, मुंबई, संभाजीनगरकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्स ठराविक हॉटेलवर थांबतात. तेव्हा अनेक प्रवासी प्रसाधनगृहात जातात. मात्र या ठिकाणी स्वच्छता मात्र दिसून आली नाही.

सुरक्षादेखील नाही

प्रवासादरम्यान अनेकजण मद्यपान करतात. हाॅटेलमध्ये मद्यपान करणाऱ्यांकरिता वेगळी व्यवस्था असायला हवी. मात्र या हाॅटेलवर तशी दिसून आली नाही. त्या कारणाने महिला या ठिकाणी असुरक्षित असल्याचे दिसून आले.

हाॅटेल संचालक अन्न परवानाकरिता अर्ज करतात. नियमात असेल तर आम्ही परवानगी देताे. मात्र पाण्याच्या बॉटलचे जास्त पैसे घेत असतील तर त्याबाबत आम्ही काही करू शकत नाही.

- शरद कोलते, सहआयुक्त, अन्न व औषधी प्रशासन

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकAmravatiअमरावतीpassengerप्रवासी