शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार गटाच्या मतदारसंघावर दावा; विधानसभा निवडणुकीत वसंत मोरेंची होणार कोंडी?
2
पडळकरांकडून सरकारविरोधातच आंदोलनाचं हत्यार; रास्ता रोकोसाठी धनगर समााजाला केलं महत्त्वाचं आवाहन 
3
Maharashtra Assembly Elections : हरियाणा-काश्मीरनंतर आता महाराष्ट्र विधानसभेचे बिगुल वाजणार! निवडणूक आयोगाने तयारी केली सुरू
4
Maharashtra Politics : शिवसेना शिंदे गटात पक्षातंर्गत वाद?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटानं उडाली खळबळ
5
सिनेट निवडणुकीत चुरस; शिंदेगटाच्या युवासेनेचे 'अभाविप'शी फाटले; पाठिंबा काढला
6
Pitru Paksha 2024: आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पितृपक्षातील अष्टमीला करा 'गजलक्ष्मी व्रत'!
7
तिरुपती लाडू प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी; मुख्यमंत्री खोटारडे, त्यांना समज द्या : जगनमोहन रेड्डी
8
ATM Card वर मिळतो १० लाखांपर्यंतचा फ्री इन्शूरन्स; पाहा केव्हा घेता येतो या सुविधेचा लाभ?
9
रश्मी ठाकरे पुढच्या मुख्यमंत्री...! कलानगरात झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चा
10
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी व व्यापारात लाभ होतील; अचानक धन प्राप्ती होईल
11
चार हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन वस्तू अमेरिका भारताला देणार; पंतप्रधानांनी मानले आभार
12
अग्रलेख : पंतप्रधान पुन्हा आक्रमक; महायुतीची सत्ता टिकविण्यासाठी भाजप पुन्हा सरसावला
13
मराठा, ओबीसी आरक्षणावरून तणाव कायम; वडीगोद्रीत दोन्ही समाजांचे आंदोलक रस्त्यावर
14
सर्व्हे सांगतात, मविआला मुंबईत २२ जागा मिळणार
15
सत्यपाल मलिक करणार मविआचा प्रचार; मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची घेतली भेट
16
गुजरातच्या 'गिफ्ट सिटी' सारखे आर्थिक केंद्र आता मुंबईत
17
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
18
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
19
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
20
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप

घर नाही, शौचालय बांधावे कुठे ?

By admin | Published: June 26, 2017 12:05 AM

प्रत्येक गावाला १०० टक्के हागणदारीमुक्तीची अट घालण्यात आल्याने ग्रामीण भागात शासकीय योजनांच्या अंमलबजावणीत अडसर निर्माण झाला आहे.

ग्रामस्थ हैराण : शंभर टक्के हागणदारीची अट त्रासदायक लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : प्रत्येक गावाला १०० टक्के हागणदारीमुक्तीची अट घालण्यात आल्याने ग्रामीण भागात शासकीय योजनांच्या अंमलबजावणीत अडसर निर्माण झाला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेने गोरगरीब जनतेच्या अडचणी ओळखून शौचालयाची ही अट रद्द करण्याची मागणी होऊ लागली आहे.पाच एकर शेती असलेल्या बीपीएलधारकाला शौचालयाच्या बांधकामासाठी १२ हजार रूपये अनुदान दिले जाते तर एपीएलधारकांना रोहयोतून योजनेचा लाभ दिला जातो. एपीएलधारकांना आधी स्वखर्चाने शौचालय बांधून मग अनुदान दिले जाते. मात्र, आता गाव १०० टक्के हागणदारीमुक्त झाल्याशिवाय कोणत्याही योजनांचा लाभ न देण्याची भूमिका शासनाने घेतली आहे. त्यामुळे अनेक गावे वैयक्तिक व सार्वजनिक लाभांच्या योजनांपासून वंचित आहेत. ग्रामीण भागात भाऊबंदकीमुळे अनेक कुटुंब विभक्त झाली आहेत. अनेकांची गुुजराण एका खोलीत सुरू आहे. रहायलाच पुरेशी जागा नसताना शौचालय बांधायचे तरी कुठे, असा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे. कित्येक कुटुंब गावात अतिक्रमण करून राहात आहेत. मग, अतिक्रमित जागेत शौचालय बांधायचे काय, असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत. पूर्वी हागणदारीमुक्तीची अट टप्प्याने राबवून त्यानुसार योजनांचा लाभ दिला जात होता. गाव ७० टक्के हागणदारीमुक्त झाल्यास त्या गावाला विविध शासकीय योजनांचा लाभ मिळत असे. परंतु आता शंभर टक्के हागणदारीमुक्तीची अट घातल्याने ग्रामीण विकासात मोठा अडसर निर्माण झाला आहे. पयार्याने गावाचा विकास खुंटला आहे. राहण्यासाठीच पुरेशी जागा उपलब्ध नसताना शौचालयाची अट कशी पूर्ण करावी, हा प्रश्न ग्रामस्थांना भेडसावतोय. परिणामी गाव शंभर टक्के हगणदारीमुक्त होण्याच्या अटींची पूर्तता होऊ शकत नाही. ‘पेपरलेस’चे काय ?शासनाचे सर्व कामकाज पेपरलेस करण्यावर सरकारचा भर असला तरी झेडपीतील विविध १४ विभाग पेपरलेस करण्यात प्रशासनाला अद्याप यश आलेले नाही. त्यामुळे आजही फाईली वेगवेगळ्या टेबलवर फिरत असून त्याचा आर्थिक फटका संबंधिताना सहन करावा लागत आहे. अकाऊंटमध्ये प्रशासनाची मास्टरी असतानाही कामकाज पेपरलेस होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. झेडपीतील केवळ १४ विभागा पेपरलेस झाले आहेत.