शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुण्यात आता चंद्रावर जाण्याचा उद्योग होतोय", शरद पवारांचा महायुतीला खोचक टोला
2
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
3
हिजबुल्लाहच्या नसरल्लाहचा 'खात्मा'; आता खामेनेईंचं टेनन्शन वाढलं; इस्रायलवर भडकले अन् अंडरग्राउंड झाले!
4
"महालक्ष्मी ब्लॅकमेल करत होती, म्हणून ५९ तुकडे..."; बंगळुरू हत्येतील आरोपीच्या भावाचा मोठा दावा
5
“ठाकरे गटाला महाविकास आघाडीत फक्त ४४ जागा मिळतील”; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा
6
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
7
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
8
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
9
उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे म्हणून १०१ पुजाऱ्यांच्या हस्ते महायज्ञ
10
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका
11
Narendra Modi : "हा नवा भारत, घरात घुसून मारतो, आजच्याच रात्री सर्जिकल स्ट्राईक..."; मोदींचा काँग्रेसवर घणाघात
12
“...तर शरद पवारांच्या इशाऱ्यावर मनोज जरांगे मराठा आंदोलन करत होते स्पष्ट”: प्रकाश आंबेडकर
13
कोरोना काळात जीव गमावलेल्यांच्या कुटुंबीयांना मिळणार 1-1 कोटी रुपये, CM आतिशी यांची घोषणा
14
देशातील टॉप १० श्रीमंत देवस्थानांच्या यादीत राम मंदिर; किती कोटींचे दान मिळाले? आकडा पाहाच
15
बाबो! नवरी जोमात, नवरदेव कोमात; लग्नाच्याच दिवशी केली शॉपिंग, पैसे घेऊन नववधू पसार
16
पावसाचा कहर! उत्तर प्रदेशमध्ये ८ जणांचा मृत्यू; अनेक घरांची पडझड, ३०० गावांतील वीज खंडित
17
है तय्यार हम! T20 वर्ल्ड कपसाठी सरावाचा श्रीगणेशा; एका ट्रॉफीसाठी १० संघ मैदानात, PHOTOS
18
IDFC first Bank मध्ये IDFC Ltd चे होणार विलीनीकरण; गुंतवणूकदारांचा कसा होणार फायदा?
19
आनंद दिघे यांना मारले होते, त्यांचा घातपात झाला होता; संजय शिरसाठ यांचा गंभीर आरोप
20
Sunil Tatkare on BJP Mahayuti: "भाजपा मित्रपक्षांना सन्मानाने वागवतो याचं उदाहरण म्हणजे..."; सुनील तटकरेंनी थेट पुरावाच दिला

काँग्रेस पक्ष नव्हे, चळवळ !

By admin | Published: February 27, 2016 12:01 AM

काँग्रेस हा केवळ पक्ष नसून चळवळ आहे आणि धर्मनिरपेक्षता हा केंद्रबिंदू आहे. पक्षासाठी शेतकऱ्यांचे हित जोपासणे हा मुद्दाच महत्त्वपूर्ण आहे.

यशोमती ठाकूर : मतभेदापेक्षा मनभेद असू नये, दोनद येथे कार्यकर्ता मेळावाअमरावती : काँग्रेस हा केवळ पक्ष नसून चळवळ आहे आणि धर्मनिरपेक्षता हा केंद्रबिंदू आहे. पक्षासाठी शेतकऱ्यांचे हित जोपासणे हा मुद्दाच महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे व सर्व सामान्य जनतेच्या हिताचे सरकार स्थापित होणे आवश्यक आहे. तसेच या चळवळीत काम करीत असताना मतभेद झाले तरी मनभेद असू नये, असे प्रतिपादन आ. यशोमती ठाकूर यांनी केले. दोनद, अमरावती येथे गुरुवारी आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी माजी आमदार भैयासाहेब ठाकूर हे होते. आ. यशोमती ठाकूर पुढे म्हणाल्या, पश्चिम महाराष्ट्राचा विकास झाला. मात्र विदर्भ प्रदेश विकासापासून वंचित असल्याची भावना वेळोवेळी व्यक्त होते. पण त्या भागातील जनता विकासाभिमुख नेतृत्वाला नेहमीच बळ देते. याउलट विदर्भात एकमेकांचे पाय ओढण्यात आपण धन्यता मानतो. याचे चिंतन आपण करायला हवे. त्यामुळे नेमकी चूक कुठे होते याची कारणे लक्षात येतील. सध्या देश असो की राज्य यामध्ये विशिष्ट शक्ती कार्यरत झाले आहे. त्यामुळे आपण आपल्या गावाचा विकास कसा होईल, याकडे लक्ष द्यावे. माणूस हा कर्तव्याने मोठा होतो. त्यामुळे आपले कर्तव्य पार पाडणे महत्त्वाचे आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न प्रशासन पातळीवर मांडायला हवे. केवळ राज्यात सत्ता गेली म्हणून आपण शांत बसून चालणार नाही, असे ही त्या म्हणाल्या. या मेळाव्याला अमरावती तालुका कॉंग्रेस कमिटी, तिवसा विधानसभा युवक काँग्र्रेस, महिला काँग्रेस व कार्यकर्ते उपस्थित होते. संचालन हरीश मोरे यांनी, तर आभार नंद खडसे यांनी मानले. (प्रतिनिधी)